शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

मोवाडसह १३ गावांतील पूरग्रस्तांना दिलासा

By admin | Updated: August 14, 2014 01:20 IST

वर्धा नदीला १९९१ मध्ये आलेल्या पुरामुळे मोवाडसह १३ गावांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना घरे बांधणीसाठी शासनाने दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याज असे एकूण १४ कोटी ७५ लाख

अनिल देशमुख : घरावरील कर्ज आणि व्याज माफ, मंत्रिमंडळाचा निर्णयनागपूर : वर्धा नदीला १९९१ मध्ये आलेल्या पुरामुळे मोवाडसह १३ गावांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्तांना घरे बांधणीसाठी शासनाने दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याज असे एकूण १४ कोटी ७५ लाख रुपये राज्य शासनाने माफ केले, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख देशमुख यांनी दिली. याबाबत मंत्रिमंडळापुढे ठेवलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला. यामुळे मोवाड भागातील नागरिकांना दिलासा मिळाला.वर्धा नदीला ३० जुलै १९९१ रोजी आलेल्या महापुरात मोवाड वाहून गेले. तर नरखेड तालुक्यातील इतर १३ गावे बाधित झाली. महापुरात २०४ नागरिकांना जलसमाधी मिळाली तर जनावरे वाहून गेली. घरांचे नुकसान झाले, नागरी सुविधा, शासकीय इमारतीचे नुकसान, व्यापारी, कारागिरांचे नुकसान तसेच शेतपिकांचेही प्रचंड नुकसान झाले. पूरग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत, अस्थायी निवारा व बाधित गावांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने तत्कालीन तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २१ आॅगस्ट १९९१ रोजी नागपूर येथे बैठक घेण्यात आली. त्यात या विषयावर आराखडा, कृतीपर कार्यक्रम आणि निर्णय घेण्यात आले. त्यानुसार पूरग्रस्तांचे पुनर्वसन, बाधित पूरग्रस्त गावाचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसनाच्या ठिकाणी घरे, घरकुलाच्या बांधकामासह नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुनर्वसनाच्या ठिकाणी शेतकरी कुटुंबाकरिता तीन हजार चौरस फूट जागेसह २५ हजार रुपये खर्चाची घरे बांधून देण्यात आली. यात १० हजार रुपये शासकीय अनुदान, १० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून तर पाच हजार रुपये कर्ज अशाप्रकारच्या खर्चातून ती घरकुले पूर्ण करण्यात आली. यासाठी शासनाचा काही निधी आणि काही कर्जपुरवठा करण्यात आला. पूरबाधित गावांचे पुनर्वसन झाले, त्या गावांमध्ये पुरेसा रोजगार नसल्याने आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे कर्ज आणि त्यावरील व्याजाची परतफेड होणे अशक्य होते. परिणामी कर्ज आणि व्याज माफ करण्याची मागणी ना. देशमुख यांनी शासनाकडे वारंवार केली होती. मुख्यमंत्र्यांसमोरही हा विषय ठेवला होता.सदर कर्ज वसूल करणे शक्य नसल्याने मुद्दल रक्कम आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा प्रस्ताव ना. देशमुख यांनी मंत्रिमंडळासमोर ठेवला. तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आला. त्यानुसार आता मोवाडसह इतर पुनर्वसित १३ गावातील नागरिकांवरील घरबांधणीचे कर्ज आणि त्यावरील व्याज पूर्णपणे माफ करण्यात आले. या निर्णयामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)