शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

टेकडी गणेश मंदिर उड्डाणपुलाखालील दुकानदारांचे पुनर्वसन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : टेकडी गणेश मंदिरासमोरील उड्डाणपुलाखालील दुकानदारांचे पुनर्वसन करून त्यांना दुकानांच्या बदल्यात जागा किंवा पैसे पाहिजे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : टेकडी गणेश मंदिरासमोरील उड्डाणपुलाखालील दुकानदारांचे पुनर्वसन करून त्यांना दुकानांच्या बदल्यात जागा किंवा पैसे पाहिजे असतील, तर त्याचा मोबदला मनपाने द्यावा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मनपाला दिले. शहरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीदरम्यान ते बोलत होते.

बैठकीला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, मेट्रोचे ब्रृजेश दीक्षित, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. सध्या या उड्डाणपुलाखाली असलेल्या दुकानदारांशी मनपाने ३० वर्षाचा लीज करार केला आहे. यापैकी १० वर्षे निघून गेली आहेत. या दुकानदारांना आता हटविले तर त्यांना मोबदला द्यावा लागणार आहे. एक तर अन्य जागेवर दुकान किंवा पैसा देऊन त्यांचे पुनर्वसन करा. तसेच या पुलाच्या कामाचे नियोजन व रेल्वेस्थानक परिसराचे सौंदर्य वाढविण्याच्या नियोजनाचे काम मेट्रोकडे द्यावे, असे गडकरी यांनी सांगितले. हा उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वे, मनपा आणि सार्वजनिक बांधकाम विभागात सामंजस्य करार होणे आवश्यक असल्याचे मत काही अधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केले. बैठकीदरम्यान ब्रॉडगेज मेट्रोच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. ही संकल्पना केरळनेदेखील उचलली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

फुटाळा पार्किग प्लाझाचे मेट्रोने नासुप्रला पैसे द्यावे

फुटाळा सौंदर्यीकरण प्रकल्पाचा बैठकीत आढावा घेण्यात आला. तेथे सहा हजार चौरस मीटरवर पार्किंग प्लाझा तयार करण्यात येणार आहे. मेट्रोने संबंधित जागेचे पैसे नासुप्रला द्यावे, अशी सूचना यावेळी देण्यात आली. तसेच दाभा येथे मेट्रो, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अ‍ॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येत आहे. या केंद्रासाठी विद्यापीठाची सव्वाचौदा हजार चौरस मीटर जागा लागणार आहे. संबंधित जागा ताब्यात घेऊन त्याला कुंपण घालण्याची सूचनादेखील करण्यात आली.

केळीबाग रोडचे भूसंपादन तीन महिन्यात

केळीबाग रोडच्या कामासंबंधीचा आढावा घेण्यात आला. या रस्त्यावरील ६८ पैकी ५८ मालमत्ता हटविण्यात आल्या आहेत. मॉडेल मिलपर्यंत ४ ते ५ मालमत्तांचा अडसर आहे. पण तोही लवकरच दूर केला जाईल. या रस्त्यावर येणाऱ्या घरांमधील भाडेकरूंचा प्रश्न न्यायालयात आहे. ज्यांना जागेचा, घरांचा मोबदला दिला गेला नाही त्यांना त्वरित देण्यात यावा. या रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी करून द्यावे, असे गडकरी यांनी सांगितले. तीन महिन्यात जागेचे भूसंपादन करून मोबदला देता येईल अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली.