शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीने सुपीक जमीन, लाेकांच्या आराेग्याला धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

नागपूर : काेकणातून विराेध हाेत असताना महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी काही नेत्यांकडून केली जात आहे. या प्रकल्पामुळे ...

नागपूर : काेकणातून विराेध हाेत असताना महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी काही नेत्यांकडून केली जात आहे. या प्रकल्पामुळे हजाराे तरुणांना राेजगार मिळेल, असे बाेलले जात आहे. विदर्भातील किती तरुणांना राेजगार मिळेल याची शाश्वती नाही; पण, हा प्रकल्प उभारल्यास प्रदेशातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आणि लाेकांचे आराेग्य निश्चित धाेक्यात येइल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रिफायनरीज विदर्भात व्यवहार्य का नाही?

रिफायनरीजमध्ये मोठ्या प्रमाणात वाफ व थंड पाण्याचा वापर आवश्यक असते. साधारणपणे एक बॅरेल (१५९ लीटर) कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी दीड बॅरल पाणी लागते. त्यामुळे त्यांना पाण्याचा मुबलक स्रोत असणे आवश्यक आहे. म्हणूनच बहुतेक ऑइल रिफायनरीज समुद्रकिनारी, जेथे नदी समुद्रात मिळते तेथे आहेत. ८० टक्क्यांहून जास्त कच्चे तेल समुद्रामार्गे भारतात येते. समुद्र किनारपट्टीवरून ७०० किमी अंतर पार करून विदर्भात आणणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही.

प्रदूषणाची माेठी समस्या

ऑइल रिफायनरीमध्ये कच्चा तेलाचे रूपांतर पेट्रोल, डिझेलमध्ये करताना विविध रासायनिक प्रक्रियांचा समावेश असतो. ज्यामधून माेठ्या प्रमाणात प्रदूषके बाहेर पडतात. हानिकारक कचऱ्यामुळे जमीन प्रदूषित होते. रासायनिक पदार्थांच्या उत्सर्जनामुळे जलप्रदूषण होते. रिफायनरीच्या १० किलोमीटरपर्यंत राहणे तसे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. उत्सर्जित होणारे बरेच वायू मानवासाठी हानिकारक असतात. दमा, खोकला, छातीत दुखणे, त्वचेची जळजळ, मळमळ, डोळ्यांच्या समस्या, डोकेदुखी, जन्मदोष, रक्ताचा कर्करोग अशा प्रकारच्या अनेक आजारांसाठी हे प्रदूषण कारणीभूत ठरणारे आहे. अभ्यासानुसार रिफायनरीशेजारी असलेल्या शाळेतील मुलांना ३० ते ४० टक्के श्वसनाचा जास्त त्रास सहन करावा लागतो.

वीज प्रकल्पाचा अनुभव लक्षात घ्या

- महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या विजेमध्ये ५९ टक्के वाटा विदर्भाचा आहे. त्यासाठी लागणारे मुबलक पाणी येथील जनतेला, शेतकऱ्यांना न मिळता ते वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. वीजनिर्मितीत होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणामही विदर्भवासीयांना भोगावे लागतात. शिवाय हक्काची वीजही मिळत नाही. आधीच विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष १ लाख ६० हजार हेक्टरपेक्षा अधिकचा आहे. त्यात रिफायनरी प्रकल्प फायदेशीर ठरणार नाही.

............

रिफायनरीमुळे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. पण, निर्माण होणारा रोजगार फक्त विदर्भातील युवकांनाच मिळेल याची काय शाश्वती, त्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी, सिंचनाचे पाणी वापरून आणि प्रदूषणाने आरोग्य धोक्यात घालणे कितपत योग्य ठरेल, विदर्भाच्या विकासासाठी, आर्थिक प्रगती व रोजगार उपलब्धतेसाठी रिफायनरीसारखे प्रकल्प येथे होण्याची व्यवहार्यता तपासणे आवश्यक आहे.

- डाॅ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.