शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

रिफायनरीने सुपीक जमीन, लाेकांच्या आराेग्याला धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:11 IST

नागपूर : काेकणातून विराेध हाेत असताना महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी काही नेत्यांकडून केली जात आहे. या प्रकल्पामुळे ...

नागपूर : काेकणातून विराेध हाेत असताना महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी काही नेत्यांकडून केली जात आहे. या प्रकल्पामुळे हजाराे तरुणांना राेजगार मिळेल, असे बाेलले जात आहे. विदर्भातील किती तरुणांना राेजगार मिळेल याची शाश्वती नाही; पण, हा प्रकल्प उभारल्यास प्रदेशातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आणि लाेकांचे आराेग्य निश्चित धाेक्यात येइल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रिफायनरीज विदर्भात व्यवहार्य का नाही?

रिफायनरीजमध्ये मोठ्या प्रमाणात वाफ व थंड पाण्याचा वापर आवश्यक असते. साधारणपणे एक बॅरेल (१५९ लीटर) कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी दीड बॅरल पाणी लागते. त्यामुळे त्यांना पाण्याचा मुबलक स्रोत असणे आवश्यक आहे. म्हणूनच बहुतेक ऑइल रिफायनरीज समुद्रकिनारी, जेथे नदी समुद्रात मिळते तेथे आहेत. ८० टक्क्यांहून जास्त कच्चे तेल समुद्रामार्गे भारतात येते. समुद्र किनारपट्टीवरून ७०० किमी अंतर पार करून विदर्भात आणणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही.

प्रदूषणाची माेठी समस्या

ऑइल रिफायनरीमध्ये कच्चा तेलाचे रूपांतर पेट्रोल, डिझेलमध्ये करताना विविध रासायनिक प्रक्रियांचा समावेश असतो. ज्यामधून माेठ्या प्रमाणात प्रदूषके बाहेर पडतात. हानिकारक कचऱ्यामुळे जमीन प्रदूषित होते. रासायनिक पदार्थांच्या उत्सर्जनामुळे जलप्रदूषण होते. रिफायनरीच्या १० किलोमीटरपर्यंत राहणे तसे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. उत्सर्जित होणारे बरेच वायू मानवासाठी हानिकारक असतात. दमा, खोकला, छातीत दुखणे, त्वचेची जळजळ, मळमळ, डोळ्यांच्या समस्या, डोकेदुखी, जन्मदोष, रक्ताचा कर्करोग अशा प्रकारच्या अनेक आजारांसाठी हे प्रदूषण कारणीभूत ठरणारे आहे. अभ्यासानुसार रिफायनरीशेजारी असलेल्या शाळेतील मुलांना ३० ते ४० टक्के श्वसनाचा जास्त त्रास सहन करावा लागतो.

वीज प्रकल्पाचा अनुभव लक्षात घ्या

- महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या विजेमध्ये ५९ टक्के वाटा विदर्भाचा आहे. त्यासाठी लागणारे मुबलक पाणी येथील जनतेला, शेतकऱ्यांना न मिळता ते वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. वीजनिर्मितीत होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणामही विदर्भवासीयांना भोगावे लागतात. शिवाय हक्काची वीजही मिळत नाही. आधीच विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष १ लाख ६० हजार हेक्टरपेक्षा अधिकचा आहे. त्यात रिफायनरी प्रकल्प फायदेशीर ठरणार नाही.

............

रिफायनरीमुळे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. पण, निर्माण होणारा रोजगार फक्त विदर्भातील युवकांनाच मिळेल याची काय शाश्वती, त्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी, सिंचनाचे पाणी वापरून आणि प्रदूषणाने आरोग्य धोक्यात घालणे कितपत योग्य ठरेल, विदर्भाच्या विकासासाठी, आर्थिक प्रगती व रोजगार उपलब्धतेसाठी रिफायनरीसारखे प्रकल्प येथे होण्याची व्यवहार्यता तपासणे आवश्यक आहे.

- डाॅ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.