शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

रिफाईंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:13 IST

नागपूर : रिफाईंड तेलामुळे चरबी वाढत असल्याने आता लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या ...

नागपूर : रिफाईंड तेलामुळे चरबी वाढत असल्याने आता लाकडी घाण्यावरील कच्च्या घाणीच्या तेलाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या तेलात रसायनांचा व अग्निचा वापर होत नसल्याने हे नैसर्गिक आहे. त्यामुळे अनेकांचा कल याकडे वाढल्याचे दिसत आहे.

तेल हा सर्वच घरांमध्ये स्वयंपाकातला महत्त्वाचा घटक आहे. पण आरोग्याचा विचार करता तेल अतिप्रमाणात खाणे, चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेल वापरणे, हॉटेलमधील तळलेले पदार्थ वारंवार खाणे, घट्ट आलेले ते वापरणे, अधिक दिवसाचे घाणीचे तेल वापरणे या सगळ्याच गोष्टी अपायकारक ठरतात. त्यामुळे खवय्येगिरी आवरून आहारामध्ये मोजून मापूनच तेलाचा वापर योग्य असल्याचे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

...

म्हणून वाढत आहेत हृदयरोगी

तेलाचा अतिवापर करणे आरोग्यासाठी घातकच आहे. अलीकडे घाणीच्या तेलाचा अधिक वापर करणारे हृदयरुग्ण वाढल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. बदलून तेलाचा आहारात वापर न करता एकच एक तेल सातत्याने वापरले जाते. त्यामुळे एकप्रकारचे घटक तेलातून मिळते. बदलती जीवनशैली, जंक फूड हे सुद्धा यामागील कारण आहे.

...

लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय

नागपुरात साधारण २० ते ३० वर्षांपूर्वी घाणीवरूनच तेल आणले जायचे. दरम्यानच्या काळात विविध कंपन्यांचे रिफार्ईंड तेल बाजारात आले. ते स्वस्त असल्याने घाणीच्या तेलाची मागणी घटली. परिणामी, अनेक घाण्या बंद पडल्या. सध्या नागपुरात चार ते पाच घाणी आहेत. तर ग्रामीण भागात कळमेश्वर, काटोल या तालुक्यातही तेलघाणी आहेत.

...

रिफाईंड तेल घातक का?

रिफाईंड तेल अजिबात घातक नाही. ते आहारातील समतोल राखते. मात्र अतिप्रमाणात तेलाचा वापर आहारात करणे धोक्याचेच आहे. घाणीच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असल्याने त्याचाही वापर मर्यादित हवा.

- डॉ. सुहास कानफाडे, नागपूर

...

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

रसायनांचा व अग्निचा वापर नसल्याने गुणकारी आहे. मात्र अधिक प्रमाणात वापर नको, मर्यादित हवा. घाणीचे तेल ताजे वापरा, घट्ट आलेले हृदयासाठी धोकादायक असते. तेल बदलून रोटेशनमध्ये वापरा. वारंवार गरम केलेले तेल वापरू नका.

- कविता गुप्ता, आहारतज्ज्ञ

...