शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पुरवणी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात घट

By admin | Updated: August 15, 2015 03:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा शुल्क फार जास्त असल्याची वारंवार टीका करण्यात येते.

नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांना ‘ई-मेल’वर मिळणार उत्तरपत्रिकांची प्रतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा शुल्क फार जास्त असल्याची वारंवार टीका करण्यात येते. विशेषत: एखाद्या पेपरमध्ये जरी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तरी त्याला पूर्ण परीक्षा शुल्क भरावे लागते व नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन विद्यापीठाने पुरवणी परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात २१ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे.या प्रस्तावानुसार पुरवणी परीक्षेसाठी एकूण परीक्षा शुल्काच्या २५ ते ३० टक्के रक्कमच विद्यार्थ्यांकडून घेण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. परंतु विषयनिहाय किंवा पेपरनिहाय परीक्षा शुल्क घेण्यात यावे, असे अनेक सदस्यांचे मत आहे. त्यामुळे नेमके शुल्क किती असावे, याबाबत विद्वत परिषदेत सखोल चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. दरम्यान, प्राधिकरणे ३१ आॅगस्ट रोजी बरखास्त होणार असल्याने विद्यापीठात बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. २१ आॅगस्ट रोजी विद्वत परिषदेची बैठक झाल्यानंतर २६ आॅगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे.(प्रतिनिधी)फेरमूल्यांकन प्रक्रिया होणार वेगवानहिवाळी परीक्षेपासून फेरमूल्यांकनाची प्रक्रिया वेगवान होणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. नोंदणी अर्ज भरताना ‘एमकेसीएल’ कडून विद्यार्थ्यांचे ‘ई-मेल’ तसेच मोबाईल क्रमांक घेण्यात येत आहेत. यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच होणार आहेत. विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना ‘स्कॅन’ झालेल्या उत्तरपत्रिकेची प्रत लगेच त्यांच्या ‘ई-मेल’वर पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गुणपत्रिका लवकरच देणारनिकाल लागून पंधरवडा ओलांडल्यावर अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. कोऱ्या गुणपत्रिका उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या हातात काही गुणपत्रिका पडत नसल्याची बाब समोर आली. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनी ही बाब मान्य केली. परंतु आता अंतिम वर्षाच्या सर्व गुणपत्रिका ‘प्रिंटिंग’ला गेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिले अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकांना प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतरच उर्वरित विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.