शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पुरवणी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात घट

By admin | Updated: August 15, 2015 03:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा शुल्क फार जास्त असल्याची वारंवार टीका करण्यात येते.

नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांना ‘ई-मेल’वर मिळणार उत्तरपत्रिकांची प्रतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा शुल्क फार जास्त असल्याची वारंवार टीका करण्यात येते. विशेषत: एखाद्या पेपरमध्ये जरी विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तरी त्याला पूर्ण परीक्षा शुल्क भरावे लागते व नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन विद्यापीठाने पुरवणी परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात २१ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे.या प्रस्तावानुसार पुरवणी परीक्षेसाठी एकूण परीक्षा शुल्काच्या २५ ते ३० टक्के रक्कमच विद्यार्थ्यांकडून घेण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. परंतु विषयनिहाय किंवा पेपरनिहाय परीक्षा शुल्क घेण्यात यावे, असे अनेक सदस्यांचे मत आहे. त्यामुळे नेमके शुल्क किती असावे, याबाबत विद्वत परिषदेत सखोल चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. दरम्यान, प्राधिकरणे ३१ आॅगस्ट रोजी बरखास्त होणार असल्याने विद्यापीठात बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. २१ आॅगस्ट रोजी विद्वत परिषदेची बैठक झाल्यानंतर २६ आॅगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे.(प्रतिनिधी)फेरमूल्यांकन प्रक्रिया होणार वेगवानहिवाळी परीक्षेपासून फेरमूल्यांकनाची प्रक्रिया वेगवान होणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. नोंदणी अर्ज भरताना ‘एमकेसीएल’ कडून विद्यार्थ्यांचे ‘ई-मेल’ तसेच मोबाईल क्रमांक घेण्यात येत आहेत. यंदा उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच होणार आहेत. विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना ‘स्कॅन’ झालेल्या उत्तरपत्रिकेची प्रत लगेच त्यांच्या ‘ई-मेल’वर पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गुणपत्रिका लवकरच देणारनिकाल लागून पंधरवडा ओलांडल्यावर अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. कोऱ्या गुणपत्रिका उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या हातात काही गुणपत्रिका पडत नसल्याची बाब समोर आली. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता त्यांनी ही बाब मान्य केली. परंतु आता अंतिम वर्षाच्या सर्व गुणपत्रिका ‘प्रिंटिंग’ला गेल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिले अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकांना प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतरच उर्वरित विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.