शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

लाल कांदे महाग, पांढरे कांदे व बटाटे स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

नागपूर : दहा दिवसापूर्वी कळमना ठोक बाजारात २५ रुपये किलोपर्यंत कमी झालेले लाल कांद्याचे भाव आता दर्जानुसार ३५ ते ...

नागपूर : दहा दिवसापूर्वी कळमना ठोक बाजारात २५ रुपये किलोपर्यंत कमी झालेले लाल कांद्याचे भाव आता दर्जानुसार ३५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत. याउलट पांढऱ्या कांंदे २० ते २२ रुपये किलोपर्यंत कमी झाले आहेत. नाशिकमध्ये लाल कांद्याचे पीक निघण्यास उशीर झाल्याने राज्यात सर्वत्र भाव वाढले आहेत. त्यामुळे लोक पांढऱ्या कांद्याची जास्त खरेदी करीत आहेत. त्यातच कळमन्यात बटाटे दर्जानुसार ७ ते १२ रुपये किलो आहेत.

ठोक बाजारातील भावानुसार किरकोळमध्ये लाल कांदे ५० रुपये किलो तर पांढरे कांदे ३५ ते ४० रुपये किलो विक्रीस आहेत. याशिवाय ठोकमध्ये बटाटे ७ ते १२ रुपये किलो असतानाही किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे ग्राहकांना महागाईचा अनुभव येत आहे.

लाल कांद्याचे दर लवकरच कमी होणार

कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, दहा दिवसापूर्वी आटोक्यात असलेले लाल कांद्याचे भाव आवकीअभावी वाढले आहेत. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात पुढील दोन आठवड्यात पीक निघाल्यानंतर भाव कमी होतील. पण आता भाव जास्त आहेत. कळमन्यात नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून माल येत आहे. दररोज ९ ते १० ट्रकची (एक ट्रक दहा टन) आवक आहे. याशिवाय पांढऱ्या कांद्याची आवक गुजरात राज्याच्या महुआ आणि भावनगर येथून आहे. दररोज ८ ते १० ट्रक (एक ट्रक २५ टन) कळमन्यात येत आहेत. महाराष्ट्र वगळता पांढरे कांदे देशात अन्य राज्यात फार कमी विकले जातात. पण आता लाल कांदे महाग झाल्याने सर्वच राज्यात पांढऱ्या कांद्याची मागणी वाढली आहे. यंदा गुजरात राज्यात पांढऱ्या कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आले असून, येथून सर्वच राज्यात विक्रीसाठी जात असल्याचे वसानी यांनी सांगितले.

यंदा बटाट्याचे बम्पर पीक

गेल्यावर्षी पावसामुळे बटाटे पिकाला फटका बसल्यानंतर जानेवारीत भाव ठोकमध्ये ४० रुपये तर किरकोळमध्ये ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे उत्तर प्रदेशात बम्पर पीक आले आहे. कळमन्यात दररोज प्रयागराज, कानपूर आणि आग्रा येथून २० ट्रकची आवक आहे. किरकोळ बाजारात २५ ते ३० रुपये किलो भाव आहेत. नवीन बटाटे लवकर शिजत नसल्याच्या गृहिणींच्या तक्रारी आहेत.

लसणाचे भाव उतरले

कळमना ठोक बाजारात दहा दिवसापूर्वी दर्जानुसार १०० ते १२५ रुपयांवर गेलेले लसणाचे भाव आता आवक वाढल्याने ७५ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. किरकोळमध्ये २०० रुपयांवर पोहोचलेल्या लसणाचे भाव किरकोळमध्ये १२५ ते १४० रुपये किलो आहेत. यावर्षी लसणाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्याचा परिणाम म्हणून सध्या बाजारात आवक वाढली आहे. मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पीक निघाले आहे. जावरा, मनसोर, छिंदवाडा येथून दररोज चार ते पाच ट्रकची (एक ट्रक दहा टन) आवक आहे. लसणासोबतच अद्रकाचे भाव कमी झाले असून, किरकोळमध्ये ४० रुपये किलो भाव आहे. कळमन्यात दररोज छिंदवाडा, औरंगाबाद आणि केरळ येथून तीन ते चार ट्रक येत आहेत.