बंगालच्या उपसागरात सध्या ‘गुलाब’ चक्रीवादळ घाेंगावत असून ते उत्तर आंध्रप्रदेश व दक्षिण ओरिसा किनारपट्टीकडे ताशी १९ किमीच्या वेगाने सरकत आहे. देशातील अनेक भागांसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र व विदर्भावरही परिणाम हाेत आहेत. दुसरीकडे मध्य प्रदेश व आसपासच्या परिसरात समुद्र सपाटीपासून ४.५ किमी वर सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. त्यामुळे विदर्भावर गेल्या काही दिवसापासून पावसाचे सावट पसरले आहे. दरराेज विदर्भातील काेणत्या ना काेणत्या जिल्ह्यात पाऊस हाेत आहे. वातावरणाची ही स्थिती २९ सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याची शक्यता वेधशाळेची आहे.
मात्र साेमवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात जाेराचा पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अति पाऊस हाेण्याची शक्यता व्यक्त करीत रेड अलर्ट देऊन प्रशासनाला अॅक्शन माेडवर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दुसरीकडे गडचिराेली आणि यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता असून येथे ऑरेंज अलर्ट जारी करून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर नागपूर, वर्धा, अमरावती, अकाेला, भंडारा, गाेंदिया जिल्ह्यातही जाेराचा पाऊस हाेण्याची शक्यता असून येलाे अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर २८, २९ सप्टेंबरला सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेणार असल्याचा अंदाज विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान रविवारी नागपुरात पावसाने दिवसभर उघाड दिला पण सायंकाळ आकाशात ढगांनी गर्दी केली. राेजच्या प्रमाणे रात्री पावसाने हजेरी लावलीच. रविवारी सकाळपर्यंत ३८.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ५१ मिमी पाऊस झाला. अमरावतीमध्येही २८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. गाेंदिया जिल्ह्यात रविवारी दिवभरात ८ मिमी पावसाची नाेंद झाली. इतर जिल्यात दिवसभर उघाड हाेती.