शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आरटीईच्या प्रवेशासाठी चुकीच्या पत्त्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST

रियाज अहमद नागपूर : आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांकडून चुकीचे रहिवासी पत्ते नोंदविले जात आहेत. यासंदर्भात लोकमतला आलेल्या ...

रियाज अहमद

नागपूर : आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांकडून चुकीचे रहिवासी पत्ते नोंदविले जात आहेत. यासंदर्भात लोकमतला आलेल्या तक्रारीवरून काही रहिवासी दाखल्यांची तपासणी केली असता तिथे लाभार्थ्यांचे अस्तित्वच दिसून आले नाही.

आरटीई प्रवेशासाठी नियमानुसार पालकाचे निवासस्थान शाळेपासून १ किलोमीटरच्या आत असणे गरजेचे आहे. पण काही पालक नामांकित शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून शाळेच्यापासून १ किलोमीटरच्या आतील रहिवासी दाखले जोडतात. गेल्यावर्षीपर्यंत हा प्रकार सर्रास सुरू होता. परंतु उच्च न्यायालयाने या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी आरटीई तपासणी समिती गठित केली. या समितीचे सदस्य व आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहीद शरीफ यांच्याकडे काही पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. लोकमतच्या टीमला ही माहिती मिळाली. टीमने पालकांचे दस्तावेज तपासले व समितीच्या सदस्यांसोबत रहिवासी दाखल्याच्या ठिकाणी भेट दिली. दस्तावेजानुसार एका पालकाने आपला पत्ता सिव्हिल लाईन्स लिहिला होता. परंतु त्या पत्त्यावर कुणीच सापडले नाही. नंतर माहिती झाले की तो पालक गांधीबागमध्ये राहतो. अशाच प्रकारे एका अन्य पालकाने प्रवेशासाठी चिंचभवनचा पत्ता नोंदविला आहे. परंतु या पत्त्यावर भेट दिली असता, एक मोडकळीस आलेली इमारत होती. तिथे कुणाचेही निवासस्थान नव्हते. हा पालक सोनेगाव येथे राहत असल्याचे नंतर माहिती पडले.

न्यायालयापुढे ठेवू प्रकरणे

आरटीई तपासणी समितीचे सदस्य व अ‍ॅक्शन कमिटीचे चेअरमन शाहीद शरीफ म्हणाले की, अशा प्रकरणांना आम्ही न्यायालयापुढे ठेवू. ते म्हणाले की, आरटीई प्रवेशासाठी बोगस दाखले तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे गरजवंत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत.