शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा आणि येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दगावू ...

नागपूर : कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा आणि येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दगावू नये याकरिता त्यांना प्रभावी वैद्यकीय उपचार व सुविधा पुरविण्यात याव्या, अशा विनंतीसह जनार्दन मून व इतर चार सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

राज्यघटनेतील तरतुदीनुसार नागरिकांच्या प्राणाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु, देशातील केंद्र सरकार व राज्य सरकार हे दोघेही नागरिकांना कोरोना संक्रमणापासून वाचविण्यात अपयशी ठरले आहेत. कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून कोरोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. जीवनरक्षक औषधे व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांना न्याय मिळण्यासाठी जबाबदार व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेत केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव, राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव, नागपूर महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अश्विन इंगोले कामकाज पाहणार आहेत.

------------------

घरोघरी जाऊन लसीकरण करावे

कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी सरकारने नागरिकांना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचणे आणि त्यांची ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु, सरकार तसे न करता नागरिकांना ठराविक ठिकाणी बोलवत आहे. परिणामी, कोरोना संक्रमण वाढत आहे. याशिवाय अनेक डॉक्टर कोरोना उपचार नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही असामाजिक तत्त्व आर्थिक लाभासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहे. तसेच, राज्यातील खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त घेतलेले ३६ लाख १७ हजार २८० रुपये सरकारने अद्याप वसूल करून दिले नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.