शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेचे वास्तव : ‘शबरी’ला निधी नाही, ‘रमाई’चे हप्ते मिळाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 22:02 IST

Reality of Gharkul Yojana आदिवासी जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या शबरी घरकूल योजनेला २०१४-१५ नंतर निधीच मिळालेला नाही. २०२१ पर्यंत या योजनेचे ५०० हून अधिक लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे

ठळक मुद्देलाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आदिवासी जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या शबरी घरकूल योजनेला २०१४-१५ नंतर निधीच मिळालेला नाही. २०२१ पर्यंत या योजनेचे ५०० हून अधिक लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे तर अनुसूचित जमातीसाठी असलेल्या रमाई घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना २०१९ मध्ये पहिला हप्ता मिळाला. त्यानंतर निधीच मिळाला नसल्याने या योजनेचे लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहे.

रमाई घरकूल योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्राप्त निधीमधून पहिला हप्ता दोन वर्षांपूर्वी वितरित करण्यात आला. परंतु राज्य सरकारकडून अनुदान मिळाले नसल्याने अद्यापही दुसरा हप्ता मिळाला नाही. महापालिकेतर्फे रमाई घरकूल योजना राबविण्यात येत आहे. राज्य सरकारने योजनेसाठी २०१४ ते जानेवारी २०२१ पर्यंत ४१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. यापैकी पाच टक्के प्रशासकीय खर्च वगळून ३७ कोटी ९७ लाख रुपये २ हजार ८७ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला. स्वत:चे घर होणार असल्याने या नागरिकांनी जुने घर तोडून बांधकाम सुरू केले. परंतु दोन वर्षांपासून दुसऱ्या हप्त्याचे पैसेच मिळाले नाही. त्यामुळे काही नागरिकांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे.

 शबरीला १२ वर्षात एकदाच मिळाला निधी

शहरात राहणाऱ्या आदिवासींसाठी शासनाने शबरी घरकूल योजना २००९ पासून अंमलबजावणी केली. आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्याकडे योजनेच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली. २००९ ते २०१४ या कालावधीत ३८ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात नागपूर शहर महापालिका क्षेत्राकरिता ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातून २ लाख रुपये प्रमाणे २७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तेव्हा अर्ज केलेले अकरा लाभार्थी अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. २०१५-१६ ते पासून २०२१ पर्यंत ५०० च्या जवळपास अर्ज निधीमुळे प्रलंबित आहे.

- महापौर दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात अनुदानासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. घर निर्माण समितीच्या अध्यक्ष यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना अनुदानाचे ४० कोटी रुपये मिळवून देण्यासाठी पत्र दिले आहे. निधी अजूनही अप्राप्त आहे.

राहुल घरडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग

- १२ वर्षात एकदाच शबरीसाठी निधी मिळाला. तेव्हापासून या योजनेसाठी निधीच उपलब्ध करून दिला नाही. योजनेच्या नावावर निव्वळ आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.

दिनेश शेराम, महासचिव, अ.भा. आदिवासी विकास परिषद

टॅग्स :State Governmentराज्य सरकारNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका