शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

घरकूल योजनेचे वास्तव : ‘शबरी’ला निधी नाही, ‘रमाई’चे हप्ते मिळाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 22:02 IST

Reality of Gharkul Yojana आदिवासी जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या शबरी घरकूल योजनेला २०१४-१५ नंतर निधीच मिळालेला नाही. २०२१ पर्यंत या योजनेचे ५०० हून अधिक लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे

ठळक मुद्देलाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आदिवासी जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या शबरी घरकूल योजनेला २०१४-१५ नंतर निधीच मिळालेला नाही. २०२१ पर्यंत या योजनेचे ५०० हून अधिक लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे तर अनुसूचित जमातीसाठी असलेल्या रमाई घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना २०१९ मध्ये पहिला हप्ता मिळाला. त्यानंतर निधीच मिळाला नसल्याने या योजनेचे लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहे.

रमाई घरकूल योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्राप्त निधीमधून पहिला हप्ता दोन वर्षांपूर्वी वितरित करण्यात आला. परंतु राज्य सरकारकडून अनुदान मिळाले नसल्याने अद्यापही दुसरा हप्ता मिळाला नाही. महापालिकेतर्फे रमाई घरकूल योजना राबविण्यात येत आहे. राज्य सरकारने योजनेसाठी २०१४ ते जानेवारी २०२१ पर्यंत ४१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. यापैकी पाच टक्के प्रशासकीय खर्च वगळून ३७ कोटी ९७ लाख रुपये २ हजार ८७ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला. स्वत:चे घर होणार असल्याने या नागरिकांनी जुने घर तोडून बांधकाम सुरू केले. परंतु दोन वर्षांपासून दुसऱ्या हप्त्याचे पैसेच मिळाले नाही. त्यामुळे काही नागरिकांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे.

 शबरीला १२ वर्षात एकदाच मिळाला निधी

शहरात राहणाऱ्या आदिवासींसाठी शासनाने शबरी घरकूल योजना २००९ पासून अंमलबजावणी केली. आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्याकडे योजनेच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली. २००९ ते २०१४ या कालावधीत ३८ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात नागपूर शहर महापालिका क्षेत्राकरिता ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातून २ लाख रुपये प्रमाणे २७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तेव्हा अर्ज केलेले अकरा लाभार्थी अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. २०१५-१६ ते पासून २०२१ पर्यंत ५०० च्या जवळपास अर्ज निधीमुळे प्रलंबित आहे.

- महापौर दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात अनुदानासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. घर निर्माण समितीच्या अध्यक्ष यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना अनुदानाचे ४० कोटी रुपये मिळवून देण्यासाठी पत्र दिले आहे. निधी अजूनही अप्राप्त आहे.

राहुल घरडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग

- १२ वर्षात एकदाच शबरीसाठी निधी मिळाला. तेव्हापासून या योजनेसाठी निधीच उपलब्ध करून दिला नाही. योजनेच्या नावावर निव्वळ आदिवासींच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.

दिनेश शेराम, महासचिव, अ.भा. आदिवासी विकास परिषद

टॅग्स :State Governmentराज्य सरकारNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका