शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

रेशनच्या धान्याची खूल्या बाजारात विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:12 IST

श्याम नाडेकर नरखेड: केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेद्वारे गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले ...

श्याम नाडेकर

नरखेड: केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेद्वारे गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले जातात. देशातील शेवटचा माणूस भुकेला राहू नये, त्याला दोन वेळचे अन्न मिळाले पाहिजे या भावनेतून या योजना सुरू करण्यात आल्या. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला. यासाठी अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील कुटुंबाना २० किलो धान्य मोफत दिले जात आहे. या योजनेतील जवळपास ५० टक्के धान्य थेट बाजारात विकले जात असल्याचे आढळून येत आहे.

अन्न सुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. त्यात गहू २ रुपये व तांदूळ ३ रुपये प्रति किलो याप्रमाणे व प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिल्या जाते. अंत्योदय योजनेत ३५ किलो धान्य दिले जाते. प्रधानमंत्री अन्न योजनेत प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिल्या जाते. चार जणांच्या कुटुंबीयांना अंत्योदय योजनेत ५५ किलो धान्य व अन्नसुरक्षा योजनेत ४० किलो धान्य मिळते.

ग्रामीण भागातील ७५ टक्के कुटुंबाना स्वस्त धान्य दुकानातून दरमहा धान्य पुरविल्या जाते. स्वस्त धान्य दुकानदार धान्य वाटपात हेराफेरी करतात असा आरोप होता. आता लाभार्थ्याला प्रत्यक्ष दुकानात जाऊन यंत्रावर ठसा उमटवावा लागतो. त्यामुळे दुकानदारांना हेराफेरी करण्यास वाव नाही. मुळात कुटुंबाच्या गरजेपेक्षा मोफत व विकत दिले जाणारे धान्य अधिकचे मिळते. दोन वेळचे भरपेट जेवण घेतले तरी ५० टक्के धान्य वापरले जात नाही. त्यामुळे हे धान्य बाजारपेठेत विकल्या जाते.

स्वस्त धान्य दुकानातील आलेल्या धान्याचे वितरण करण्यास किमान चारपाच दिवस लागतात. वितरण झाल्यानंतर लहान व्यापारी गावखेड्यात सक्रिय होऊन लाभार्थ्यांकडून धान्य खरेदी करतात. ते तालुकास्तरावर गोळा करून विकल्या जाते. तालुकास्तरावरील व्यापारी हे धान्य मोठ्यामोठया ट्रकमध्ये लोड करून नागपूर व मध्य प्रदेशातील मोठ्या व्यापाऱ्याकडे पाठवितात.

दोन रुपये किलोने खरेदी केलेल्या गव्हाला आठ ते दहा रुपये व तीन रुपये किलोने खरेदी केलेल्या तांदळाला दहा ते बारा रुपये भाव देऊन लाभार्थ्यांकडून खरेदी केल्या जाते व नफा कमावून ते धान्य खुल्या बाजारात आणल्या जाते. गेल्या अनेक वर्षापासून हा धंदा जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही.

नरखेड तालुक्यात अंत्योदय योजनेत ८ हजार ४३९ कार्डधारक व ३४ हजार १२४ लाभार्थी आहेत. अन्न सुरक्षा योजनेत २० हजार ८७ कार्डधारक व ९०हजार ६४४ लाभार्थी आहेत. केसरी कार्डधारकांची संख्या ४ हजार ८२१ आहे. तालुक्यात एकूण ३४ हजार ६५ शिधापत्रिकाधारक असून १ लाख ५० हजार ५४६ लाभार्थी आहेत.

---

ज्यांची परिस्थिती व उत्पन्न चांगले आहे अशानाही धान्य मिळते. सधन कुटुंबे रेशनचे धान्य खात नाही. तसेच गहू ,तांदूळ गरजेपेक्षा जास्त लाभार्थ्याला मिळतो त्यामुळे खुल्या बाजारात ते विकतात. सरकारने गहू तांदूळ देण्यापेक्षा इतर धान्य दिल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो.

सुरेश बारई

अध्यक्ष, नरखेड, तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना

---

योजनेतील धान्य जर लाभार्थी खुल्या बाजारात विकताना आढळला तर त्यांचे रेशनकार्ड तात्काळ रद्द करण्याची कारवाई करण्यात येते. याबाबत प्रत्येक गावात दवंडी देऊन सूचना देण्यात आल्या आहे.

कमलेश कुंभरे

निरीक्षण अधिकारी, उपविभाग, काटोल.