शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या धान्याची खूल्या बाजारात विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:12 IST

श्याम नाडेकर नरखेड: केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेद्वारे गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले ...

श्याम नाडेकर

नरखेड: केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनेद्वारे गेल्या काही वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले जातात. देशातील शेवटचा माणूस भुकेला राहू नये, त्याला दोन वेळचे अन्न मिळाले पाहिजे या भावनेतून या योजना सुरू करण्यात आल्या. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला. यासाठी अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील कुटुंबाना २० किलो धान्य मोफत दिले जात आहे. या योजनेतील जवळपास ५० टक्के धान्य थेट बाजारात विकले जात असल्याचे आढळून येत आहे.

अन्न सुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. त्यात गहू २ रुपये व तांदूळ ३ रुपये प्रति किलो याप्रमाणे व प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिल्या जाते. अंत्योदय योजनेत ३५ किलो धान्य दिले जाते. प्रधानमंत्री अन्न योजनेत प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिल्या जाते. चार जणांच्या कुटुंबीयांना अंत्योदय योजनेत ५५ किलो धान्य व अन्नसुरक्षा योजनेत ४० किलो धान्य मिळते.

ग्रामीण भागातील ७५ टक्के कुटुंबाना स्वस्त धान्य दुकानातून दरमहा धान्य पुरविल्या जाते. स्वस्त धान्य दुकानदार धान्य वाटपात हेराफेरी करतात असा आरोप होता. आता लाभार्थ्याला प्रत्यक्ष दुकानात जाऊन यंत्रावर ठसा उमटवावा लागतो. त्यामुळे दुकानदारांना हेराफेरी करण्यास वाव नाही. मुळात कुटुंबाच्या गरजेपेक्षा मोफत व विकत दिले जाणारे धान्य अधिकचे मिळते. दोन वेळचे भरपेट जेवण घेतले तरी ५० टक्के धान्य वापरले जात नाही. त्यामुळे हे धान्य बाजारपेठेत विकल्या जाते.

स्वस्त धान्य दुकानातील आलेल्या धान्याचे वितरण करण्यास किमान चारपाच दिवस लागतात. वितरण झाल्यानंतर लहान व्यापारी गावखेड्यात सक्रिय होऊन लाभार्थ्यांकडून धान्य खरेदी करतात. ते तालुकास्तरावर गोळा करून विकल्या जाते. तालुकास्तरावरील व्यापारी हे धान्य मोठ्यामोठया ट्रकमध्ये लोड करून नागपूर व मध्य प्रदेशातील मोठ्या व्यापाऱ्याकडे पाठवितात.

दोन रुपये किलोने खरेदी केलेल्या गव्हाला आठ ते दहा रुपये व तीन रुपये किलोने खरेदी केलेल्या तांदळाला दहा ते बारा रुपये भाव देऊन लाभार्थ्यांकडून खरेदी केल्या जाते व नफा कमावून ते धान्य खुल्या बाजारात आणल्या जाते. गेल्या अनेक वर्षापासून हा धंदा जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही.

नरखेड तालुक्यात अंत्योदय योजनेत ८ हजार ४३९ कार्डधारक व ३४ हजार १२४ लाभार्थी आहेत. अन्न सुरक्षा योजनेत २० हजार ८७ कार्डधारक व ९०हजार ६४४ लाभार्थी आहेत. केसरी कार्डधारकांची संख्या ४ हजार ८२१ आहे. तालुक्यात एकूण ३४ हजार ६५ शिधापत्रिकाधारक असून १ लाख ५० हजार ५४६ लाभार्थी आहेत.

---

ज्यांची परिस्थिती व उत्पन्न चांगले आहे अशानाही धान्य मिळते. सधन कुटुंबे रेशनचे धान्य खात नाही. तसेच गहू ,तांदूळ गरजेपेक्षा जास्त लाभार्थ्याला मिळतो त्यामुळे खुल्या बाजारात ते विकतात. सरकारने गहू तांदूळ देण्यापेक्षा इतर धान्य दिल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो.

सुरेश बारई

अध्यक्ष, नरखेड, तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना

---

योजनेतील धान्य जर लाभार्थी खुल्या बाजारात विकताना आढळला तर त्यांचे रेशनकार्ड तात्काळ रद्द करण्याची कारवाई करण्यात येते. याबाबत प्रत्येक गावात दवंडी देऊन सूचना देण्यात आल्या आहे.

कमलेश कुंभरे

निरीक्षण अधिकारी, उपविभाग, काटोल.