शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

काटोल तालुक्याला पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:12 IST

कोटाल : काटोल तालुक्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. रात्री ७ नंतर बरसलेल्या पावसाने काही तासातच नदी-नाल्यांना पूर आला. नदी ...

कोटाल : काटोल तालुक्यात बुधवारी मुसळधार पाऊस झाला. रात्री ७ नंतर बरसलेल्या पावसाने काही तासातच नदी-नाल्यांना पूर आला. नदी पात्रालगत असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास ५० कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविले. ग्रामीण भागातही पिकांचे नुकसान झाले.

पावसाळा संपत आला असल्याने तालुक्यातील जलाशयातील पाणी साठा अत्यल्प असल्याने नवीन वर्षात पाण्याची समस्या निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त केली जात होती. यातच अधून मधून येणारा पाऊस शेतमालाला संजीवनी देत असल्याचे चित्र होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसाने गत १५ दिवसाचा बॅकलॉग भरून काढला. तालुक्यातील जाम नदीला पूर आला. पुराचे पाणी पुलावरून गेल्याने काटोल-सावरगाव मार्गावरील वाहतूक रात्री बंद करण्यात आली होती. शहरातील हत्तीखाना, अन्नपूर्णा नगर, संगमनगर परिसरातील नदीलगत भागातील घरात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. नदीपात्रापासून दोन्ही बाजूस पाणी असल्याने रात्री येथील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. गुरुवारी सकाळी नदीच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर साचलेला गाळ साफ करण्यात आला. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलावरील डांबरी रस्ता उखडला.

या गावांना बसला फटका

बुधवारी सहा तासात तालुक्यात ६८.७३ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सर्वात जास्त १०७ मि.मी. पाऊस पारडसिंगा सर्कलमध्ये झाला. तालुक्यातील ढवळापूर, हातला, कुकडीपांजरा, पारडी, लिंगा, बोरगोंदी, पानवाडी, हरणखुरी या गावातील शेतामध्ये पाण्याचे तळे साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काही गावात विहिरी खचल्याची माहिती आहे. तालुक्यात झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

दोन तास राजकुमारची झुंज

पारडी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना शिवारातील शेतातून राजकुमार केशवराव शेंडे (४२) हा पूल ओलांडून पारडी येथील घरी जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. मात्र, एका तारेच्या मदतीने तो बचावला. दोन तास आरडाओरड करून मदत मागत लिंगा येथील सरपंच विनोद ठाकरे, मुकेश पाटील आदींनी त्याला पाण्याबाहेर काढले.

090921\img-20210909-wa0094.jpg~090921\img-20210909-wa0193.jpg~090921\img-20210908-wa0178.jpg

पारडसिंगा सर्कल मधील ढवळापूर शेतशिवारातील जोरदार पावसाने पिकाची अशी नासाडी झाली आहे~पारडसिंगा सर्कल मधील काही भागात शेतातील शेतपिके सम्पूर्ण नष्ट झाल्याचे चित्र आहे~जातो शहरातील अण्णाभाऊ साठे नगर ,हत्तीखाना परिसरात पुराचे पाणी शिरल्याने रात्रीला नागरिकांना घरे खाली करावी लागली यात जीवनावश्यक वस्तूंच्या मोठी नासाडी झाली आहे