शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने बळीराजा सुखावला, धरणातील पाणीसाठा अल्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:11 IST

रामटेक : तीन आठवड्यापासून पाऊस नसल्याने रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतित होते. मात्र गत दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ...

रामटेक : तीन आठवड्यापासून पाऊस नसल्याने रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतित होते. मात्र गत दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाने शेतकरी सुखावले असले तरी तालुक्यातील धरणातील साठा मात्र अद्यापही अल्पच आहे. त्यामुळे भविष्यात रबी हंगामातील सिंचनासाठी तालुक्यात आणखी पावसाची आवश्यकता आहे.

तालुक्यात गत दोन दिवसात ८६ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६२१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा तलावातील पाणीसाठा कमी आहे. तोतलाडोह धरण मध्य प्रदेशातील चौराई धरणावर अवलंबून आहे. साध्या चौरई धरणात केवळ ५० टक्के (२१२ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी येथे ७८ टक्के जलसाठा होता. चौरई धरण भरले तर ओव्हरफ्लोचे पाणी तोतलाडोहमध्ये येईल आणि पाण्याची पातळी वाढेल. बुधवारपर्यंत रामटेक खिंडसी तलावात ३६.६८ टक्के (३७ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ३२.४८ टक्के होते. नवेगाव खैरी तलावात ४१ टक्के (५९ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ९६ टक्के होते. तोतलाडोह तलावात ६२.९३ टक्के (६४० दलघमी)

पाणी साठा आहे. गतवर्षी हे प्रमाण ९३.३८ टक्के होते. मधल्या काळात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र गत २० दिवस पाऊस पडला नाही.

पेंचच्या डाव्या कालव्यातून २,६०० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून ७० क्युसेक पाणी भात लावणी आणि सिंचनासाठी सोडण्यात येत होते. पाऊस आल्याने पेंच जलाशयाचे पाणी बंद करण्यात आले. तोतलाडोह, खिंडसी आणि नवेगाव खैरी धरणात यंदा पाणीसाठी अत्यल्प आहे. गत वर्षीचा जलसाठा असल्यानेच भंडारा व नागपूर जिल्हातील पेंच धरणावर अवलंबून असलेली ७० हजार हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी झाली. त्यासाठी १२ जुलै ते १७ ऑगस्ट पर्यंत पाणी सोडल्या गेले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाला तरच पाणीसाठा वाढेल असे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता राजू बोम्बले यांनी सांगितले.