शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पावसाने बळीराजा सुखावला, धरणातील पाणीसाठा अल्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:11 IST

रामटेक : तीन आठवड्यापासून पाऊस नसल्याने रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतित होते. मात्र गत दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ...

रामटेक : तीन आठवड्यापासून पाऊस नसल्याने रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतित होते. मात्र गत दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाने शेतकरी सुखावले असले तरी तालुक्यातील धरणातील साठा मात्र अद्यापही अल्पच आहे. त्यामुळे भविष्यात रबी हंगामातील सिंचनासाठी तालुक्यात आणखी पावसाची आवश्यकता आहे.

तालुक्यात गत दोन दिवसात ८६ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६२१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा तलावातील पाणीसाठा कमी आहे. तोतलाडोह धरण मध्य प्रदेशातील चौराई धरणावर अवलंबून आहे. साध्या चौरई धरणात केवळ ५० टक्के (२१२ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी येथे ७८ टक्के जलसाठा होता. चौरई धरण भरले तर ओव्हरफ्लोचे पाणी तोतलाडोहमध्ये येईल आणि पाण्याची पातळी वाढेल. बुधवारपर्यंत रामटेक खिंडसी तलावात ३६.६८ टक्के (३७ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ३२.४८ टक्के होते. नवेगाव खैरी तलावात ४१ टक्के (५९ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ९६ टक्के होते. तोतलाडोह तलावात ६२.९३ टक्के (६४० दलघमी)

पाणी साठा आहे. गतवर्षी हे प्रमाण ९३.३८ टक्के होते. मधल्या काळात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र गत २० दिवस पाऊस पडला नाही.

पेंचच्या डाव्या कालव्यातून २,६०० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून ७० क्युसेक पाणी भात लावणी आणि सिंचनासाठी सोडण्यात येत होते. पाऊस आल्याने पेंच जलाशयाचे पाणी बंद करण्यात आले. तोतलाडोह, खिंडसी आणि नवेगाव खैरी धरणात यंदा पाणीसाठी अत्यल्प आहे. गत वर्षीचा जलसाठा असल्यानेच भंडारा व नागपूर जिल्हातील पेंच धरणावर अवलंबून असलेली ७० हजार हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी झाली. त्यासाठी १२ जुलै ते १७ ऑगस्ट पर्यंत पाणी सोडल्या गेले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाला तरच पाणीसाठा वाढेल असे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता राजू बोम्बले यांनी सांगितले.