शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने बळीराजा सुखावला, धरणातील पाणीसाठा अल्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:11 IST

रामटेक : तीन आठवड्यापासून पाऊस नसल्याने रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतित होते. मात्र गत दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ...

रामटेक : तीन आठवड्यापासून पाऊस नसल्याने रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतित होते. मात्र गत दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाने शेतकरी सुखावले असले तरी तालुक्यातील धरणातील साठा मात्र अद्यापही अल्पच आहे. त्यामुळे भविष्यात रबी हंगामातील सिंचनासाठी तालुक्यात आणखी पावसाची आवश्यकता आहे.

तालुक्यात गत दोन दिवसात ८६ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६२१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा तलावातील पाणीसाठा कमी आहे. तोतलाडोह धरण मध्य प्रदेशातील चौराई धरणावर अवलंबून आहे. साध्या चौरई धरणात केवळ ५० टक्के (२१२ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी येथे ७८ टक्के जलसाठा होता. चौरई धरण भरले तर ओव्हरफ्लोचे पाणी तोतलाडोहमध्ये येईल आणि पाण्याची पातळी वाढेल. बुधवारपर्यंत रामटेक खिंडसी तलावात ३६.६८ टक्के (३७ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ३२.४८ टक्के होते. नवेगाव खैरी तलावात ४१ टक्के (५९ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ९६ टक्के होते. तोतलाडोह तलावात ६२.९३ टक्के (६४० दलघमी)

पाणी साठा आहे. गतवर्षी हे प्रमाण ९३.३८ टक्के होते. मधल्या काळात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र गत २० दिवस पाऊस पडला नाही.

पेंचच्या डाव्या कालव्यातून २,६०० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून ७० क्युसेक पाणी भात लावणी आणि सिंचनासाठी सोडण्यात येत होते. पाऊस आल्याने पेंच जलाशयाचे पाणी बंद करण्यात आले. तोतलाडोह, खिंडसी आणि नवेगाव खैरी धरणात यंदा पाणीसाठी अत्यल्प आहे. गत वर्षीचा जलसाठा असल्यानेच भंडारा व नागपूर जिल्हातील पेंच धरणावर अवलंबून असलेली ७० हजार हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी झाली. त्यासाठी १२ जुलै ते १७ ऑगस्ट पर्यंत पाणी सोडल्या गेले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाला तरच पाणीसाठा वाढेल असे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता राजू बोम्बले यांनी सांगितले.