शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

पावसाने बळीराजा सुखावला, धरणातील पाणीसाठा अल्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:11 IST

रामटेक : तीन आठवड्यापासून पाऊस नसल्याने रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतित होते. मात्र गत दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ...

रामटेक : तीन आठवड्यापासून पाऊस नसल्याने रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतित होते. मात्र गत दोन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाने शेतकरी सुखावले असले तरी तालुक्यातील धरणातील साठा मात्र अद्यापही अल्पच आहे. त्यामुळे भविष्यात रबी हंगामातील सिंचनासाठी तालुक्यात आणखी पावसाची आवश्यकता आहे.

तालुक्यात गत दोन दिवसात ८६ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ६२१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा तलावातील पाणीसाठा कमी आहे. तोतलाडोह धरण मध्य प्रदेशातील चौराई धरणावर अवलंबून आहे. साध्या चौरई धरणात केवळ ५० टक्के (२१२ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी येथे ७८ टक्के जलसाठा होता. चौरई धरण भरले तर ओव्हरफ्लोचे पाणी तोतलाडोहमध्ये येईल आणि पाण्याची पातळी वाढेल. बुधवारपर्यंत रामटेक खिंडसी तलावात ३६.६८ टक्के (३७ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ३२.४८ टक्के होते. नवेगाव खैरी तलावात ४१ टक्के (५९ दलघमी) पाणीसाठा आहे. गत वर्षी हे प्रमाण ९६ टक्के होते. तोतलाडोह तलावात ६२.९३ टक्के (६४० दलघमी)

पाणी साठा आहे. गतवर्षी हे प्रमाण ९३.३८ टक्के होते. मधल्या काळात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र गत २० दिवस पाऊस पडला नाही.

पेंचच्या डाव्या कालव्यातून २,६०० क्युसेक आणि उजव्या कालव्यातून ७० क्युसेक पाणी भात लावणी आणि सिंचनासाठी सोडण्यात येत होते. पाऊस आल्याने पेंच जलाशयाचे पाणी बंद करण्यात आले. तोतलाडोह, खिंडसी आणि नवेगाव खैरी धरणात यंदा पाणीसाठी अत्यल्प आहे. गत वर्षीचा जलसाठा असल्यानेच भंडारा व नागपूर जिल्हातील पेंच धरणावर अवलंबून असलेली ७० हजार हेक्टर क्षेत्रातील धान रोवणी झाली. त्यासाठी १२ जुलै ते १७ ऑगस्ट पर्यंत पाणी सोडल्या गेले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाला तरच पाणीसाठा वाढेल असे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता राजू बोम्बले यांनी सांगितले.