मंगेश तलमले/चक्रधर गभणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
खात/रेवराल : मुंबई-नागपूर-काेलकाता रेल्वेमार्गावरील खात (ता. माैदा) गावाजवळ असलेल्या रेल्वे फटकाजवळील वाहतूक काेंडीची समस्या साेडविण्यासाठी केंद्र सरकारचा रेल्वे विभाग आणि राज्य शासनाच्या वतीने ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या कामाला सुरुवात करण्यात आली. या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या कामाचा वेग अतिशय संथ असल्याने अडीच वर्षातही पूर्ण करण्यात आले नाही. परिणामी, येथून ये-जा करणारे वाहनचालकांना त्रास हाेत असल्याने ते वैतागले असून, दुसरीकडे या कामाचा दर्जा सुमार असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
मुंबई-नागपूर-काेलकाता रेल्वेमार्ग रामटेक-खात-भंडारा मार्गाला छेदून जात असल्याने तसेच खात येथील रेल्वे फाटकाजवळ वाहतूक काेंडी हाेत असल्याने याठिकाणी ‘रेल्वे ओव्हरब्रिज’ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा मार्ग नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला जाेडला असल्याने रायपूरहून जबलपूरकडे जाणारी सर्व वाहने भंडारा-खात-रामटेक मार्गे याच मार्गावरून धावत असल्याने या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते.
या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या बांधकामाचे कंत्राट बंका कन्स्ट्रक्शन इंजिनिअर्स ॲण्ड काॅन्ट्रॅक्टर, मुंबई नामक कंपनीला दिले आहे. त्यांना हे काम सुरुवात केल्यापासून दाेन वर्षात पूर्ण करावयाचे हाेते. शिवाय, बांधकाम पूर्ण झाल्यापासून नंतरची पाच वर्षे या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही त्यांच्यावर साेपविण्यात आली आहे. हे काम करताना कंत्राटदार कंपनीने याेग्य काळजी न घेतल्याने वळण रस्त्याची दैनावस्था झाली आहे.
वाहनांमुळे वळण रस्त्यावर माेठमाेठे खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. शिवाय, चिखलही तयार झाला आहे. चिखलामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात हाेत आहेत, तर खड्ड्यांमुळे मालकांना वाहनांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या बांधकामात वीज केंद्रातील ‘फ्लाय ॲश’चा वापर केला जात असल्याने काेरड्या दिवसात वाहनचालक व नागरिकांना ‘फ्लाय ॲश’चा त्रास सहन करावा लागताे.
या कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार दर्जाची आहे. याबाबत कंत्राटदार कंपनी व शासनाच्या अभियंत्यांशी अनेकदा चर्चा केली. परंतु, ही बाब कुणीही गांभीर्याने घेतली नाही. ते मनमर्जीने काम करीत असून, स्थानिकांना सहकार्य करायला तयार नाहीत. स्थानिक लाेकप्रतिनिधी व राजकीय पक्षाचे नेते या दर्जाकडे लक्ष देण्यास तयार नाही, असा आराेप ग्रामपंचायत सदस्य महेश गिरीपुंजे यांच्यासह या भागातील नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कुणीही प्रतिसाद दिला नाही.
...
अडीच वर्षात ५० टक्के काम पूर्ण
९०० मीटर लांबीच्या या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या निर्मितीसाठी शासनाने ४५ काेटी ८२ लाख रुपये मंजूर केले. या कामाला डिसेंबर २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली असून, ते दाेन वर्षात म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण करावयाचे हाेते. टाळेबंंदीमुळे सात ते आठ महिने बांधकाम बंद हाेते. वास्तवात, या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’चे आजवर पूर्ण केवळ ५० ते ५५ टक्के बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
.......
विना राॅयल्टी रेतीचा वापर
या ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या कामासाठी वापरली जाणारी रेती ही विना राॅयल्टी असल्याचा आराेप नागरिकांनी केला असून, याला जाणकार व्यक्तींनी खासगीत दुजाेरा दिला आहे. ‘रेल्वे ओव्हरब्रिज’च्या वळणमार्गावरील खड्डे धाेकादायक बनल्याने मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे मत खातच्या सरपंच ज्याेती डहाके यांनी व्यक्त केले. खड्डे व चिखलामुळे आपण दुचाकीसह अनेकदा पडलाे असून, दुखापत झाल्याचे खात येथील दुकानदार नरेश तलमले यांनी सांगितले.
...
ट्रॅक्टर उलटला
रामटेकहून खात मार्गे भंडाऱ्याच्या दिशेने तांदळाची पाेती घेऊन जाणारा एमएच-४०/बी-०६४५ क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्राॅलीसह याच ‘रेल्वे ओव्हरब्रिज’जवळील वळणमार्गावर गुरुवारी (दि. २) सकाळी ९ वाजताच्या सुमारास उलटला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, तांदूळ व ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी असे अपघात वारंवार घडतात.
310821\1750191-img-20210831-wa0005.jpg
उड़ाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे फोटो