शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
3
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
4
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
5
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
6
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
7
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
8
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
9
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
10
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
11
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
12
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
13
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
14
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
15
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
16
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
17
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
18
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
19
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
20
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण

घरच्यांवरील रागात, शहरांच्या आकर्षणात लहान मुले घरून काढतात पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:11 IST

दयानंद पाईकराव नागपूर : अभ्यास कर म्हणून रागावले की बालकांना राग येतो. वेगवेगळ्या पद्धतीने ते आपला राग व्यक्त करतात. ...

दयानंद पाईकराव

नागपूर : अभ्यास कर म्हणून रागावले की बालकांना राग येतो. वेगवेगळ्या पद्धतीने ते आपला राग व्यक्त करतात. मोबाईल घेऊन दिला नाही, मित्रांसोबत खेळू दिले नाही अशा कारणांमुळे अल्पवयीन मुले रागाच्या भरात घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. गेल्या दोन वर्षात अशी घर सोडून आलेली तब्बल ८१२ बालक रेल्वे चाईल्ड लाईनला आढळल्याची धक्कादायक माहिती आहे. रेल्वे चाईल्ड लाईनने या बालकांची आस्थेने चौकशी करून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.

वरदान संस्थेच्यावतीने संचालित रेल्वे चाईल्ड लाईन नागपूर ही बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने कार्यरत संस्था नागपूर रेल्वेस्थानकावर ३६५ दिवस २४ तास कार्यरत आहे. आतापर्यंत रेल्वे चाईल्ड लाईन नागपूरने २६०० बालकांना आपल्या सेवा दिल्या. यातील ९५ टक्के बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविले. परंतु पाच टक्के बालकांच्या आईवडिलांचा पत्ता न मिळाल्यामुळे या बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्या-त्या जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. सन २०१९ ते २०२१ या दोन वर्षाच्या कालावधीत नागपूर रेल्वेस्थानकावर एकूण ८१२ बालक मिळाले. यात महाराष्ट्रातील २४५ बालकांचा समावेश आहे. इतर बालकात मध्य प्रदेशातील १३१, छत्तीसगड ११३, उत्तर प्रदेश ८५, बिहार ६८, ओदिशा २९, राजस्थान २२, झारखंड २०, आंध्र प्रदेश १५, दिल्ली १५, पश्चिम बंगाल १९, तेलंगाणा १२, पंजाब ११, गुजरात १०, तामिळनाडु ४, आसाम २, हरियाणा ३, कर्नाटक ३, उत्तराखंड १, नेपाळ २ आणि अनोळखी ठिकाणावरून आलेल्या १४ बालकांचा समावेश आहे. अनेकदा रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस, रेल्वे कर्मचारी, व्हेंडर, कुली हे सुद्धा पळून आलेले बालक दिसताच लगेच रेल्वे चाईल्ड लाईनकडे सुपूर्द करतात. तसेच १०९८ या हेल्पलाईनवरही माहिती मिळाल्यास पळून आलेल्या बालकांची सुटका करण्यात येते. वरदान संस्थेच्या अध्यक्षा, सचिव तसेच वरिष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे चाईल्ड लाईन टीमच्या समन्वयिका अंजली शेरेकर, प्रज्ञा घनमोडे, दीपाली ढमगये, रोशनी मेश्राम, सीमा गोडे, संयोगिता दुर्गे, खेमू रासेकर, विक्की डहारे, रणजित कुंभारे, नितेश सांगोळे, गोविंद देशमुख, कैलाश पुरकाम ही चमू २४ तास रेल्वेस्थानकावर घरून पळून येणाऱ्या बालकांच्या संरक्षणासाठी आपल्या सेवा देत आहे.

..............

मुलांना मुंबई, दिल्लीचे आकर्षण

- घरात मुंबई, दिल्ली अशा मेट्रोसिटीवर नेहमी चर्चा होत असते. लहान मुले ही चर्चा ऐकतात व त्यांना या शहरांचे आकर्षण वाटू लागते. त्यामुळे ‘घरातून निघून जाण्याचा विचार आला की ते आपल्या गावातील रेल्वेस्थानक गाठतात. घरातून आजवर निघून आलेल्या बालकांपैकी अनेकांनी मुंबई, दिल्ली तसेच पुण्याला जायचे असल्याचे सांगितले.

बालकांनी घर सोडण्याची ही आहेत कारणे...

- शहराविषयी आकर्षण वाटणे

- चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी

- वडिलांनी मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून

- अभ्यास कर म्हणून रागावल्याने

- अल्पवयात प्रेमात पडल्यामुळे

- मौजमजा करण्यासाठी शहरात जाण्यासाठी

- घरातील आर्थिक अडचणींमुळे

- वडील दारू पिऊन मारत असल्यामुळे

- आईवडील मित्रांसोबत खेळू देत नाहीत

---------------

चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी सोडले घर

- फेब्रुवारी २०२१ मध्ये नागपूरमधीलच १७ वर्षांच्या अवंतीने (बदललेले नाव) टीव्ही सीरियलमध्ये काम करण्यासाठी आणि चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी घर सोडले. मुंबईला जाण्यासाठी ती नागपूर रेल्वेस्थानकावर आली. त्यानंतर रेल्वे चाईल्ड लाइनची नजर तिच्यावर केली. लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या मदतीने या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

- गेम खेळू न दिल्यामुळे पलायन

नागपुरातील १२ वर्षांचा रोहन (बदललेले नाव) याला आईवडिलांनी मोबाइलवर गेम खेळू नको म्हटल्याने राग आला. डिसेंबर २०२० मध्ये त्याने शाळेत जातो असे सांगून त्याने थेट नागपूर रेल्वेस्थानक गाठले. तो कोणत्या तरी गाडीत बसून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे चाईल्ड लाइनच्या टीमने त्याला रोखले आणि आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने आईवडिलांच्या सुपुर्द केले.

...........