शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आर. विमला नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना काळात उत्तम काम करणारे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना काळात उत्तम काम करणारे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ग्रामोन्नती अभियानाच्या सीईओ आर. विमला यांची नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या शनिवारी सकाळी पदभार स्वीकारतील. यासोबतच आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा खत्री यांची नंदूरबार, तर जलज शर्मा यांची धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ठाकरे यांना अद्याप कुठेही नियुक्ती मिळालेली नाही. तसेच खत्री आणि शर्मा यांच्या जागेवरही अद्याप कुणालाही नियुक्ती मिळालेली नाही.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी कोरोना काळात अतिशय उत्तम काम केले. ७ सप्टेंबर २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असतानाच ठाकरे यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. पुरेसा वेळ मिळाला नसतानाही ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडली. यानंतर कोरोनाच्या संकट काळात त्यांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. नागपुरात अनियंत्रणात गेलेली कोरोनाची परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणली. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुदृढ केली. कोरोना काळात रुग्णालय रुग्णांकडून जास्तीचे बिल वसूल करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या. तेव्हा मनपा प्रशासनाने ऑडिटर नियुक्त केले. याची संपूर्ण व्यवस्था अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांभाळली. त्यांच्यामुळेच अनेक रुग्णांचे बिल कमी झाले.

याशिवाय अन्नपुरवठा विभागाचे सचिव व्ही. बी. पाटील यांची कोकण विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली. नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली.

आर. विमला यांचे ग्रामोन्नती मिशनमध्ये उल्लेखनीय काम

- नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी राज्य शासनाच्या ग्रामोन्नती मिशनच्या सीईओ म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक विकासासाठी त्यांनी दशसुत्री दिल्या आहेत. ग्रामीण भागात तब्बल २ लाख महिला बचत गट त्यांनी तयार केले आहेत. ३४ जिल्ह्यातील तब्बल ३० लाख कुटुंबांना त्यांनी या बचत गटाच्या माध्यमातून जोडले आहे. यासोबतच २३ हजार युवकांना त्यांनी विविध कौशल्याचे प्रशिक्षण दिले असून, यापैकी १० हजार युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे.