शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आर. विमला नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना काळात उत्तम काम करणारे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना काळात उत्तम काम करणारे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ग्रामोन्नती अभियानाच्या सीईओ आर. विमला यांची नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या शनिवारी सकाळी पदभार स्वीकारतील. यासोबतच आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा खत्री यांची नंदूरबार, तर जलज शर्मा यांची धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ठाकरे यांना अद्याप कुठेही नियुक्ती मिळालेली नाही. तसेच खत्री आणि शर्मा यांच्या जागेवरही अद्याप कुणालाही नियुक्ती मिळालेली नाही.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी कोरोना काळात अतिशय उत्तम काम केले. ७ सप्टेंबर २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असतानाच ठाकरे यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. पुरेसा वेळ मिळाला नसतानाही ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडली. यानंतर कोरोनाच्या संकट काळात त्यांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. नागपुरात अनियंत्रणात गेलेली कोरोनाची परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणली. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुदृढ केली. कोरोना काळात रुग्णालय रुग्णांकडून जास्तीचे बिल वसूल करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या. तेव्हा मनपा प्रशासनाने ऑडिटर नियुक्त केले. याची संपूर्ण व्यवस्था अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सांभाळली. त्यांच्यामुळेच अनेक रुग्णांचे बिल कमी झाले.

याशिवाय अन्नपुरवठा विभागाचे सचिव व्ही. बी. पाटील यांची कोकण विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली. नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली.

आर. विमला यांचे ग्रामोन्नती मिशनमध्ये उल्लेखनीय काम

- नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी राज्य शासनाच्या ग्रामोन्नती मिशनच्या सीईओ म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक विकासासाठी त्यांनी दशसुत्री दिल्या आहेत. ग्रामीण भागात तब्बल २ लाख महिला बचत गट त्यांनी तयार केले आहेत. ३४ जिल्ह्यातील तब्बल ३० लाख कुटुंबांना त्यांनी या बचत गटाच्या माध्यमातून जोडले आहे. यासोबतच २३ हजार युवकांना त्यांनी विविध कौशल्याचे प्रशिक्षण दिले असून, यापैकी १० हजार युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे.