शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

शारजाह येथून परतलेले २२ प्रवासी क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विमानतळावर रविवारी पहाटे ३.४५ ला शारजाहवरून ६० यात्रेकरू परतले. या प्रवाशांना विमानातून उतरवून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर विमानतळावर रविवारी पहाटे ३.४५ ला शारजाहवरून ६० यात्रेकरू परतले. या प्रवाशांना विमानातून उतरवून जवळपास सव्वातास त्यांची पडताळणी करून क्वारंटाईनसाठी पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्या निगराणीत २२ यात्रेकरूंना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले, तर ३८ जणांना क्वारंटाईनमधून सूट दिली. परंतु त्यांना नियमांचे पालन करीत आठवडाभर होम आयसोलेशन राहावे लागणार आहे. आंतराष्ट्रीय प्रवासावरून परतणाऱ्या प्रवाशांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. रविवारी शिवाय २१ व २८ फेब्रुवारीला शाहजाह येथून यात्रेकरू परतणार आहेत. त्यांनाही क्वारंटाईन केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शारजाह येथून एअर अरेबियाच्या विमानाने ६१ प्रवासी येणार होते. परंतु एक प्रवासी काही कारणास्तव नागपूरला परतला नाही. उर्वरित १४ प्रवासी नागपूर शहराबाहेरचे असून, ४६ नागपूरचे आहेत. ज्या ३८ जणांना क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे, त्यांना मनपाने निर्धारित केलेल्या पाच मानकांची पूर्तता केली. त्यानंतर त्यांना क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली.

मनपाचे उपअभियंता आनंद मोखाडे, कनिष्ठ अभियंता दीपक मेश्राम, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संजय बिसेन यांची प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आपली बसचे पाच व १० एनडीएस पथकातील जवान तैनात करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, मनपाच्या आदेशानुसार पाच प्रकारच्या लोकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात ६५ वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्ती, गर्भवती महिला, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे पालक, कॅन्सर रुग्ण, दिव्यांग, मानसिक रुग्ण, सेलेब्रल पाल्सीग्रस्त आदींच्या सोबत ज्यांच्या कुटुंबातील कुणी गंभीर आजारी आहेत. गंभीर दुर्घटनाग्रस्त, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास अशा व्यक्तींना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावे लागतील. त्यांना होम क्वारंटाईन राहावे लागेल. कोविड नियमांचे पालन करावे लागेल.

....

यात्रेकरूंनी केले सहकार्य - निपाणे

यात्रेकरूंनी मनपा प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. पाच मानकानुसार त्यांनी कागदपत्रे सादर केली. क्वारंटाईन नियमाचे प्रवाशांना पालन करावे लागेल. २२ पैकी ८ यात्रेकरूंना व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले. उर्वरित यात्रेकरूंना हॉटेलमध्ये असलेल्या क्वारंटाईन केंद्रावर पाठविण्यात आल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी दिली.

-