शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

शारजाह येथून परतलेले २२ प्रवासी क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विमानतळावर रविवारी पहाटे ३.४५ ला शारजाहवरून ६० यात्रेकरू परतले. या प्रवाशांना विमानातून उतरवून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर विमानतळावर रविवारी पहाटे ३.४५ ला शारजाहवरून ६० यात्रेकरू परतले. या प्रवाशांना विमानातून उतरवून जवळपास सव्वातास त्यांची पडताळणी करून क्वारंटाईनसाठी पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्या निगराणीत २२ यात्रेकरूंना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले, तर ३८ जणांना क्वारंटाईनमधून सूट दिली. परंतु त्यांना नियमांचे पालन करीत आठवडाभर होम आयसोलेशन राहावे लागणार आहे. आंतराष्ट्रीय प्रवासावरून परतणाऱ्या प्रवाशांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. रविवारी शिवाय २१ व २८ फेब्रुवारीला शाहजाह येथून यात्रेकरू परतणार आहेत. त्यांनाही क्वारंटाईन केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शारजाह येथून एअर अरेबियाच्या विमानाने ६१ प्रवासी येणार होते. परंतु एक प्रवासी काही कारणास्तव नागपूरला परतला नाही. उर्वरित १४ प्रवासी नागपूर शहराबाहेरचे असून, ४६ नागपूरचे आहेत. ज्या ३८ जणांना क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे, त्यांना मनपाने निर्धारित केलेल्या पाच मानकांची पूर्तता केली. त्यानंतर त्यांना क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली.

मनपाचे उपअभियंता आनंद मोखाडे, कनिष्ठ अभियंता दीपक मेश्राम, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संजय बिसेन यांची प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आपली बसचे पाच व १० एनडीएस पथकातील जवान तैनात करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, मनपाच्या आदेशानुसार पाच प्रकारच्या लोकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात ६५ वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्ती, गर्भवती महिला, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे पालक, कॅन्सर रुग्ण, दिव्यांग, मानसिक रुग्ण, सेलेब्रल पाल्सीग्रस्त आदींच्या सोबत ज्यांच्या कुटुंबातील कुणी गंभीर आजारी आहेत. गंभीर दुर्घटनाग्रस्त, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास अशा व्यक्तींना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावे लागतील. त्यांना होम क्वारंटाईन राहावे लागेल. कोविड नियमांचे पालन करावे लागेल.

....

यात्रेकरूंनी केले सहकार्य - निपाणे

यात्रेकरूंनी मनपा प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. पाच मानकानुसार त्यांनी कागदपत्रे सादर केली. क्वारंटाईन नियमाचे प्रवाशांना पालन करावे लागेल. २२ पैकी ८ यात्रेकरूंना व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले. उर्वरित यात्रेकरूंना हॉटेलमध्ये असलेल्या क्वारंटाईन केंद्रावर पाठविण्यात आल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी दिली.

-