शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

चिमुकल्या कलावंताचे दर्जेदार सादरीकरण

By admin | Updated: December 30, 2014 00:56 IST

बालकलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य महोत्सवात सोमवारी चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

राज्य बालनाट्य स्पर्धा : नाट्यरसिक मंत्रमुग्धनागपूर : बालकलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित राज्य बालनाट्य महोत्सवात सोमवारी चार नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. हा महोत्सव सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे सुरूआहे. यात संस्कार, तमसो मा ज्योतिर्गमय, नवे गोकुळ आणि सोनेरी पान या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकात चिमुकल्या कलावंतांनी सादर केलेल्या दर्जेदार अभिनयाने उपस्थित नाट्यरसिक मंत्रमुग्ध झाले. नैतिक संस्काराची शिकवण ‘संस्कार’विद्यार्थ्यांच्या बालमनाच्या निकोप व सशक्त संवर्धनासाठी अनिवार्य अशा नैतिक संस्काराच्या शिकवणुकीचे महत्त्व विशद करणारे ‘संस्कार’ या नाटकाचे सादरीकरण छत्रपती युवक क्रीडा प्रसारक मंडळ महालतर्फे करण्यात आले. आजच्या वैज्ञानिक युगात ऱ्हास पावणाऱ्या नैतिक मूल्यांबद्दल अस्वस्थता व्यक्त करणाऱ्या या सादरीकरणात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्याधिष्ठित आदर्श जीवन प्रणालीवर भर देण्यात आला. नाटकाचे लेखन सीमा फडणवीस यांनी केले. दिग्दर्शन सुबोध आष्टीकर यांचे होते. विधी पेटकर, अंजली नंदवंशी, जान्हवी ढोके, प्राची बसाके, धनश्री भेंडे, प्रणाली मारोडकर, मिताली गौरकर, साक्षी तिजारे, जान्हवी कोंगलवार, प्राची मानापुरे, केशरी मौंदेकर, दिव्या शेळके या कलावंतांचा यात सहभाग होता. आनंदी जगण्याचा संदेश देणारे ‘तमसो मा ज्योतिर्गमय’अंध मुलांच्या दु:खी मनोभावनांवर हळुवार फुंकर घालणारे व प्राप्त परिस्थितीवर मात करून आनंदी जगण्याचा संदेश देणाऱ्या ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ नाटकाचे सादरीकरण दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा, महालतर्फे करण्यात आले. विशाल तराळ लिखित या नाटकाचे दिग्दर्शन रोशन नंदवंशी यांनी केले. यात श्रेया कुराडे, अंजली तिवारी, श्रद्धा परिहार, प्राची रणदिवे, प्रियंका वंजारी, अवंती कुर्रेवार, जान्हवी हुकरे, अमिषा निचंत, ऐश्वर्या डवरे यांनी अभिनय केला. श्रमाचे महत्त्व विशद करणारे ‘नवे गोकुळ’जीवनातील श्रमाचे महत्त्व सांगणाऱ्या गंभीर विषयाला विनोदाची जोड देऊन भरभरून मनोरंजन करणारे ‘नवे गोकुळ’ या नाटकाने रसिकांना जिंकले. नाटकातील सोंगाड्याचा अभिनय प्रशंसनीय ठरला. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ महालद्वारे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. पु. ल. देशपांडे लिखित या नाटकाची निर्मिती रवींद्र फडणवीस यांनी केली. दिग्दर्शन अर्चना घुळघुळे यांचे होते. यात युक्ता हजारे, अपूर्व देवरणकर, श्वेता बावनकुळे, सेजल पापडकर, दीपाली मानकर, वैष्णवी हुकरे, आदिती हरदास, शिप्रा विटाळकर, सेजय कोलूरवार, साक्षी तीनखेडे, अपूर्वा गवळी, धनश्री माताघरे, ऋतिका गोखे, सायली घाटोळे, खुशी गोखे, मृणाली मेरखेड, दीपाली वाघमारे, रुचिका मारघडे, कल्याणी देशमुख यांनी अभिनय केला. (प्रतिनिधी)