शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना दे धक्का..

By admin | Updated: May 12, 2015 02:27 IST

‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई : २९० शाळांना नोटीसनागपूर : ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) आरक्षित असलेल्या २५ टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या किंवा शुल्क मागणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. दरम्यान, शिक्षण विभागानेदेखील मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर लगेच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत शहरातील २९० शाळांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. ज्या शाळा यात टाळाटाळ करतील त्यांची मान्यतादेखील रद्द होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.‘आरटीई’च्या ‘आॅनलाईन’ सोडतीमध्ये क्रमांक लागूनदेखील पालकांना प्रवेशासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. कोणी ‘एन्ट्री पॉईन्ट’चे कारण दाखविले तर अनेकांनी पालकांकडून विविध नावांखाली शुल्काची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेदेखील तक्रारी गेल्या होत्या. नवी मुंबईच्या पाटणकर दाम्पत्याने त्यांच्या जुळ्या मुलींना ‘आरटीई’नुसार प्रवेश मिळत नसल्याची तक्रार मांडली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या शाळा या कायद्याच्या तरतुदीनुसार प्रवेश देत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निर्देशच त्यांनी दिले आहेत.दरम्यान, ७ मे रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी सर्व शाळांना पत्र लिहिले होते. शाळा ‘आरटीई’ अंतर्गत नर्सरी, केजी-१ व पहिल्या इयत्तेत प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत आहे. शासनाच्या ३० एप्रिल २०१५च्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शाळांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे शाळांना विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू नये असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु तरीदेखील शाळांनी याला गंभीरतेने घेतलेले नाही. त्यामुळेच २९० शाळांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनिल पारधी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)केवळ इशारे नकोतशिक्षण विभागाकडून ‘आरटीई’च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध ठोस पावले उचलण्यात येत नाहीत. केवळ इशारे देऊन काहीही होणार नाही, तर अशा शाळांवर तत्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. प्रवेश नाकारणाऱ्या सर्व शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटी’चे अध्यक्ष शाहीद शरिफ यांनी केली आहे.