शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोराडी औष्णिक केंद्राच्या हिश्श्याचे शुद्ध पाणी रोज सोडावे लागते नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST

नागपूर : कोराडी-खापरखेडा औष्णिक वीज केंद्रासाठी महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या पाण्याचे नवे प्रकरण उजेडात आले आहे. करारानुसार मनपा वीज केंद्रासाठी ...

नागपूर : कोराडी-खापरखेडा औष्णिक वीज केंद्रासाठी महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या पाण्याचे नवे प्रकरण उजेडात आले आहे. करारानुसार मनपा वीज केंद्रासाठी दररोज पाणी शुद्ध करते. मात्र केंद्राकडून तेवढे पाणी उचलले जात नसल्याने शुद्ध केलेले १९० मिलियन लिटर पाणी रोज नदीत सोडावे लागत आहे. हा प्रकार जून महिन्यापासून सुरू आहे.

कोराडी-खापरखेडा औष्णिक वीज केंद्रासाठी पेंच प्रकल्पातून ६७ दलघमी पाणी आरक्षित आहे. प्रकल्प तयार होतानाच असा करार झाला आहे. हे पाणी महानगरपालिकेने शुद्ध करून औष्णिक केंद्राला द्यावे, असा महाजनकोसोबत करारही आहे. मात्र अलीकडे महाजनको अन्य स्रोतांच्या माध्यामातून पाणी उचलत आहे. सोबतच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या वापरामुळे वीजनिर्मितीसाठी पूर्वीसारखे जास्त पाणी लागत नाही. यामुळे वीज केंद्राची पाण्याची मागणी हळूहळू कमी होत असल्याने पाणी पूर्णत: उचलले जात नाही.

असे असले तरी महाजनकोसोबत झालेल्या करारनुसार पेंचमधून उचलले जाणारे पाणी मनपा रोज शुद्ध करते. ६७ दलघमी पाणी आरक्षित असल्याने तेवढे शुद्ध केले जाते. परंतु केंद्राकडून फक्त ४७ दलघमी पाणी वापरले जात असल्याने उर्वारित शुद्ध पाणी दररोज अशुद्ध पाण्यासोबत नदीत सोडावे लागत आहे. मागील जून महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे.

...

जून महिन्यापासूनचे बिल वादात

करारानुसार रोज पूर्ण पाणी देण्याची मनपाची तयारी आहे. मात्र केंद्राकडून त्याची उचल होत नाही. आम्ही पाणी द्यायला तयार आहेत, मात्र केंद्र ते उचलत नाही, असे मनपाचे म्हणणे आहे. जून महिन्यापासून केंद्राने पाणी वापर कमी केला असला तरी मनपा त्यांच्यासाठी पूर्ण पाणी शुद्ध करीत आहे. त्यामुळे मनपाने पाण्याचे बिल महाजनकोकडे पाठविले. मात्र आम्ही पाणी तेवढे वापरत नसल्याने बिल पूर्ण पाण्याचे का द्यावे, असा मुद्दा महाजनकोचा आहे.

...

पेंच पाणी बंद करणार?

हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. शेतकऱ्यांच्या वापराचे पाणी केंद्राला देण्यासाठी मनपा उचलत आहे. मात्र ते केंद्र उचलत नसल्याने शुद्ध पाणी नदीत सोडावे लागत आहे. यात पेंच प्रकल्पाचा तोटा होत आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचे बिल कुणी द्यावे, हा सुद्धा नवा पेच या प्रसंगामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रासाठी आरक्षित असलेले पाणी मनपाला देणे बंद करण्याचा निर्णय भविष्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येत असल्याने यावर ते काय निर्णय घेतात, हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

...