शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या आहारातून पोळी गायब

By admin | Updated: August 23, 2015 02:55 IST

नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी रुग्णांना मोजकाच आहार पुरवला जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू आहे.

मेडिकलमधील रुग्णांना मोजकाच आहार : कर्मचाऱ्यांच्या संख्येवर ठरते पोळ्यांचे ‘गणित’लोकमत विशेषसुमेध वाघमारे  नागपूरनियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी रुग्णांना मोजकाच आहार पुरवला जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, आता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर रुग्णांचा आहार अवलंबून आहे. ज्या दिवशी पूर्ण कर्मचारी हजर असतील त्याच दिवशी भाजी, पोळी, वरण-भात असा आहार मिळतो आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्यास आहारातून पोळी गायब तर कधी केवळ एकाच पोळीवर रुग्णांना समाधान मानावे लागते. आजाराला लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत योग्य आहाराची गरज असते. रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. या उद्देशानेच मेडिकलमध्ये पाकगृहाची सुरुवात झाली. सध्याच्या स्थितीत मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील असे एकूण सुमारे ८०० रुग्णांना नाश्त्यासह दोन वेळचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा नेहमीचा मेनू ठरला आहे. रुग्णांचा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात यावा, असा नियम आहे. मात्र, त्याचे किती पालन होते हे रोजच्या जेवणाच्या पदार्थातून दिसून येते. विशेष म्हणजे, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ‘समाधानकारक’ असा शेरा मिळाल्यावरच पाकगृहात तयार झालेला पदार्थ रुग्णांपर्यंत पोहचतो. परंतु रुग्णांना देण्यात येणारा आहार पौष्टिक तर नाहीच उलट मोजकाच असला तरी ‘समाधानकारक’ शेरा मारणे सुरू आहे. ३२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त मेडिकलच्या पाकगृहासाठी ५२ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना तब्बल ३२ पदे रिक्त आहेत. २० कर्मचाऱ्यांच्या भरोशावर मेडिकलचे पाकगृह कसेबसे सुरू आहे. पाकगृहात दोन पाळीत आहार तयार केला जातो. पूर्वी प्रत्येक पाळीत २६ कर्मचारी असायचे परंतु वेळोवेळी रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने आता एका पाळीत केवळ १० कर्मचारी असतात. यात साप्ताहिक सुटी, तर कोणी रजेवर गेल्यास याचा सर्वाधिक प्रभाव पोळ्या तयार करण्यावर होतो. जास्त कर्मचारी सुटीवर असल्यास त्या दिवशी पोळ्याच तयार होत नाही तर कमी कर्मचारी असल्यास त्या दिवशी प्रत्येक रुग्णाला एक पोळी मिळेल अशीच व्यवस्था असते. प्रति रुग्णामागे शासन देते केवळ २५ रुपयेप्रति रुग्णाच्या नाश्त्यासह दोन वेळेच्या आहारावर शासन केवळ २५ रुपये खर्च करते. रुग्णालय प्रशासनाला प्रति रुग्णामागे साधारण ५० रुपये खर्च येतो. आधीच रुग्णालयात औषधांपासून इतर सर्व वस्तूंची चणचण असताना हा खर्च पेलवणे प्रशासनाला अवघड जात आहे. यामुळेच रुग्णाला शेंगदाण्याचा लाडू आणि उकडलेले अंडे देणे बंद झाले आहे. वरण-भात व जास्तीत जास्त वेळा भोपळ्याची भाजी तेवढीच काय रुग्णाच्या नशिबी आली आहे.