शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

रुग्णांच्या आहारातून पोळी गायब

By admin | Updated: August 23, 2015 02:55 IST

नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी रुग्णांना मोजकाच आहार पुरवला जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू आहे.

मेडिकलमधील रुग्णांना मोजकाच आहार : कर्मचाऱ्यांच्या संख्येवर ठरते पोळ्यांचे ‘गणित’लोकमत विशेषसुमेध वाघमारे  नागपूरनियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी रुग्णांना मोजकाच आहार पुरवला जात असल्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, आता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर रुग्णांचा आहार अवलंबून आहे. ज्या दिवशी पूर्ण कर्मचारी हजर असतील त्याच दिवशी भाजी, पोळी, वरण-भात असा आहार मिळतो आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्यास आहारातून पोळी गायब तर कधी केवळ एकाच पोळीवर रुग्णांना समाधान मानावे लागते. आजाराला लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत योग्य आहाराची गरज असते. रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. या उद्देशानेच मेडिकलमध्ये पाकगृहाची सुरुवात झाली. सध्याच्या स्थितीत मेडिकलसह सुपर स्पेशालिटी रुग्णालय व टीबी वॉर्डातील असे एकूण सुमारे ८०० रुग्णांना नाश्त्यासह दोन वेळचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा नेहमीचा मेनू ठरला आहे. रुग्णांचा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात यावा, असा नियम आहे. मात्र, त्याचे किती पालन होते हे रोजच्या जेवणाच्या पदार्थातून दिसून येते. विशेष म्हणजे, वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ‘समाधानकारक’ असा शेरा मिळाल्यावरच पाकगृहात तयार झालेला पदार्थ रुग्णांपर्यंत पोहचतो. परंतु रुग्णांना देण्यात येणारा आहार पौष्टिक तर नाहीच उलट मोजकाच असला तरी ‘समाधानकारक’ शेरा मारणे सुरू आहे. ३२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त मेडिकलच्या पाकगृहासाठी ५२ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना तब्बल ३२ पदे रिक्त आहेत. २० कर्मचाऱ्यांच्या भरोशावर मेडिकलचे पाकगृह कसेबसे सुरू आहे. पाकगृहात दोन पाळीत आहार तयार केला जातो. पूर्वी प्रत्येक पाळीत २६ कर्मचारी असायचे परंतु वेळोवेळी रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने आता एका पाळीत केवळ १० कर्मचारी असतात. यात साप्ताहिक सुटी, तर कोणी रजेवर गेल्यास याचा सर्वाधिक प्रभाव पोळ्या तयार करण्यावर होतो. जास्त कर्मचारी सुटीवर असल्यास त्या दिवशी पोळ्याच तयार होत नाही तर कमी कर्मचारी असल्यास त्या दिवशी प्रत्येक रुग्णाला एक पोळी मिळेल अशीच व्यवस्था असते. प्रति रुग्णामागे शासन देते केवळ २५ रुपयेप्रति रुग्णाच्या नाश्त्यासह दोन वेळेच्या आहारावर शासन केवळ २५ रुपये खर्च करते. रुग्णालय प्रशासनाला प्रति रुग्णामागे साधारण ५० रुपये खर्च येतो. आधीच रुग्णालयात औषधांपासून इतर सर्व वस्तूंची चणचण असताना हा खर्च पेलवणे प्रशासनाला अवघड जात आहे. यामुळेच रुग्णाला शेंगदाण्याचा लाडू आणि उकडलेले अंडे देणे बंद झाले आहे. वरण-भात व जास्तीत जास्त वेळा भोपळ्याची भाजी तेवढीच काय रुग्णाच्या नशिबी आली आहे.