शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जनता हीच महापौरांची शक्ती

By admin | Updated: September 5, 2014 01:11 IST

जनता हीच महापौरांची खरी शक्ती असते. जनतेने योग्य प्रतिसाद दिला तरच कोणताही प्रकल्प, मोहीम यशस्वी होत असते. माझ्या कार्यकाळात जनतेने मला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच लोकसहभागातून

महापौर सोले यांनी घेतला निरोप : सेवेसाठी वेळ दिलानागपूर : जनता हीच महापौरांची खरी शक्ती असते. जनतेने योग्य प्रतिसाद दिला तरच कोणताही प्रकल्प, मोहीम यशस्वी होत असते. माझ्या कार्यकाळात जनतेने मला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळेच लोकसहभागातून मी मोठमोठी कामे करू शकलो, अशा शब्दात महापौर अनिल सोले यांनी नागपूरकरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.अनिल सोले यांचा महापौरपदाचा कार्यकाळ आज पूर्ण झाला. सोले यांनी पत्रकारांशी हितगुज करीत अडीच वर्षांत केलेल्या कामांचा आलेख माडला. ते म्हणाले, नागनदी स्वच्छता अभियानाची पंतप्रधान नरेंद मोदी यांनी प्रशंसा केली. नागपूरकरांनी या मोहिमेत सहकार्य दिले नसते तर हे शक्य नव्हते. पीओपीच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याच्या आपल्या आवाहनालाही नागपूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एका दिवसात एक लाख झाडे लावण्याचा उपक्रमही जनतेमुळे यशस्वी झाला. आपल्या कार्यकाळात आपण २८९ बैठका घेतल्या. ७४० शिष्टमंडळांचे म्हणणे ऐकून घेतले. २३ सर्वसाधारण व ९ विशेष सभा घेतल्या. २६२ ठराव पारित केले. आपण आपला जास्तीतजास्त वेळ महापालिकेच्या कामासाठी दिला. लाड कमिटीअंतर्गत कर्मचाऱ्यांची नियुक्ती, शिक्षित सफाई कर्मचाऱ्यांना योग्य काम देणे, ऐवजदारांना वाढीव पगार, कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदी निर्णय घेतले गेले. नामांतर शहीद स्मारकाचे लोकार्पण झाले, तर आरबीआय चौकाचे संविधान चौक असे नामकरण करण्यात आले. एलबीटीमुळे महापालिकेसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. बीओटी तत्त्वावरील प्रकल्पांना राज्य सरकारने त्वरित मंजुरी दिली नाही. वाढीव पाणी बिल निर्लेखित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचा समारोप राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याचा आपला प्रयत्न होता. पण आपल्या कार्यकाळात होऊ शकला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)निरोप घेताना ‘सर’ गहिवरले महापौर अनिल सोले प्राध्यापक होते. त्यामुळे सर्व त्यांना आदराने ‘सर’ असेच संबोधायचे. ते तसे हळव्या मनाचे. आज सर्वांचा निरोप घेताना त्यांच्यातील हळवेपणा दिसून आला. सर्वांशी नमस्कार घेत ‘अलविदा’ म्हणताना त्यांना गहिवरून आले. सोले यांनी महापालिकेतील त्यांचे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांपासून ते वाहन चालकापर्यंत सर्वांची भेट घेत आभार मानले. माणूस पदावर गेला की त्याचे विरोधक वाढतात. विविध आरोप लागतात, प्रतिमा मलीन होते, आदर कमी होतो, असे पाहायला मिळते. मात्र, सोले सरांनी गेल्या अडीच वर्षांत सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले. सर्वांना जपले. त्यामुळे पद सोडतानाही त्यांच्याविषयीचा आदर अधिक वाढला आहे, अशी प्रतिक्रिया कर्मचारी,अधिकारी व्यक्त करीत होते.