शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
2
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
3
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
4
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
5
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
6
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
7
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
8
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
9
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
10
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
11
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
12
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
13
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
14
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
15
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
16
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
17
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
18
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
20
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

पाणीपुरवठा, पथदिव्यांच्या वीज बिलासाठी वेगळा निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : थकीत वीज बिलांमुळे गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नवीन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : थकीत वीज बिलांमुळे गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नवीन समस्या निर्माण झाली आहे. ही बिले १५ व्या वित्त आयाेगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून भरण्याची सूचना शासनाने राज्य केली आहे. मात्र, हा निधी विविध विकास कामे व सामाजिक बाबींवर खर्च करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विजेची थकीत बिले भरण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतला वेगळा निधी द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या काटाेल तालुक्यातील सदस्यांनी खंडविकास अधिकारी संजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

पूर्वी प्रत्येक गावातील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांच्या विजेची बिले जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने भरली जात हाेती. जिल्हा परिषद प्रशासनाने सन २०१६ पासून ही बिले भरणे बंद केले. त्यामुळे थकीत बिलांची रक्कम वाढत गेली. या रकमेचा भरणा करणे ग्रामपंचायत प्रशासनाच्या आवाक्याबाहेर आहे. त्यातच राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने २३ जून रोजी ही बिले १५ वा वित्त आयाेगातील निधीतून भरण्यास मंजुरी दिली. हा निधी गावाची एकूण लोकसंख्या व वार्षिक उत्पन्नाच्या आधारे मिळत असून, यातील ८० टक्के निधी ग्रामपंचायत तर प्रत्येकी १० टक्के निधी जिल्हा परिषद पंचायत समितीला दिला जाताे.

या निधीतून गावातील विविध विकास कामांसह संगणक परिचालक व कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे लागते. काही गावांना हा निधी पाच लाख रुपयांचा मिळताे तर, त्यांच्याकडे नऊ लाख रुपये विजेचे बिल थकीत आहे. या प्रकारामुळे खर्चाची सांगड घालणे शक्य हाेत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या विजेची बिले भरण्यासाठी राज्य शासनाने वेगळा निधी द्यावा, अशी मागणीही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आली आहे. या मागणीला काटाेल तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतच्या सरपंचांनी पाठिंबा दिला आहे. शिष्टमंडळात हरिदास शृंगारे, शुभांगी खरबडे, मंगला काळबांडे, मंगला महाकुलकर, कांचन सलाम, विठ्ठल उके, प्रमोद ठाकरे, रूपाली चचाने, अर्चना इंगळे, नितीन गजभिये, उर्मिला महल्ले, दिनेश मानकर, उषा काळे यांच्यासह अन्य सरपंचांचा समावेश हाेता.