शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

पाणीपुरवठा, पथदिव्यांच्या वीज बिलासाठी वेगळा निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : थकीत वीज बिलांमुळे गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नवीन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : थकीत वीज बिलांमुळे गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नवीन समस्या निर्माण झाली आहे. ही बिले १५ व्या वित्त आयाेगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून भरण्याची सूचना शासनाने राज्य केली आहे. मात्र, हा निधी विविध विकास कामे व सामाजिक बाबींवर खर्च करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विजेची थकीत बिले भरण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतला वेगळा निधी द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या काटाेल तालुक्यातील सदस्यांनी खंडविकास अधिकारी संजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

पूर्वी प्रत्येक गावातील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांच्या विजेची बिले जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने भरली जात हाेती. जिल्हा परिषद प्रशासनाने सन २०१६ पासून ही बिले भरणे बंद केले. त्यामुळे थकीत बिलांची रक्कम वाढत गेली. या रकमेचा भरणा करणे ग्रामपंचायत प्रशासनाच्या आवाक्याबाहेर आहे. त्यातच राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने २३ जून रोजी ही बिले १५ वा वित्त आयाेगातील निधीतून भरण्यास मंजुरी दिली. हा निधी गावाची एकूण लोकसंख्या व वार्षिक उत्पन्नाच्या आधारे मिळत असून, यातील ८० टक्के निधी ग्रामपंचायत तर प्रत्येकी १० टक्के निधी जिल्हा परिषद पंचायत समितीला दिला जाताे.

या निधीतून गावातील विविध विकास कामांसह संगणक परिचालक व कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे लागते. काही गावांना हा निधी पाच लाख रुपयांचा मिळताे तर, त्यांच्याकडे नऊ लाख रुपये विजेचे बिल थकीत आहे. या प्रकारामुळे खर्चाची सांगड घालणे शक्य हाेत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या विजेची बिले भरण्यासाठी राज्य शासनाने वेगळा निधी द्यावा, अशी मागणीही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आली आहे. या मागणीला काटाेल तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतच्या सरपंचांनी पाठिंबा दिला आहे. शिष्टमंडळात हरिदास शृंगारे, शुभांगी खरबडे, मंगला काळबांडे, मंगला महाकुलकर, कांचन सलाम, विठ्ठल उके, प्रमोद ठाकरे, रूपाली चचाने, अर्चना इंगळे, नितीन गजभिये, उर्मिला महल्ले, दिनेश मानकर, उषा काळे यांच्यासह अन्य सरपंचांचा समावेश हाेता.