शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा, पथदिव्यांच्या वीज बिलासाठी वेगळा निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : थकीत वीज बिलांमुळे गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नवीन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : थकीत वीज बिलांमुळे गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नवीन समस्या निर्माण झाली आहे. ही बिले १५ व्या वित्त आयाेगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून भरण्याची सूचना शासनाने राज्य केली आहे. मात्र, हा निधी विविध विकास कामे व सामाजिक बाबींवर खर्च करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विजेची थकीत बिले भरण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतला वेगळा निधी द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या काटाेल तालुक्यातील सदस्यांनी खंडविकास अधिकारी संजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

पूर्वी प्रत्येक गावातील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांच्या विजेची बिले जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने भरली जात हाेती. जिल्हा परिषद प्रशासनाने सन २०१६ पासून ही बिले भरणे बंद केले. त्यामुळे थकीत बिलांची रक्कम वाढत गेली. या रकमेचा भरणा करणे ग्रामपंचायत प्रशासनाच्या आवाक्याबाहेर आहे. त्यातच राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने २३ जून रोजी ही बिले १५ वा वित्त आयाेगातील निधीतून भरण्यास मंजुरी दिली. हा निधी गावाची एकूण लोकसंख्या व वार्षिक उत्पन्नाच्या आधारे मिळत असून, यातील ८० टक्के निधी ग्रामपंचायत तर प्रत्येकी १० टक्के निधी जिल्हा परिषद पंचायत समितीला दिला जाताे.

या निधीतून गावातील विविध विकास कामांसह संगणक परिचालक व कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे लागते. काही गावांना हा निधी पाच लाख रुपयांचा मिळताे तर, त्यांच्याकडे नऊ लाख रुपये विजेचे बिल थकीत आहे. या प्रकारामुळे खर्चाची सांगड घालणे शक्य हाेत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या विजेची बिले भरण्यासाठी राज्य शासनाने वेगळा निधी द्यावा, अशी मागणीही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आली आहे. या मागणीला काटाेल तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतच्या सरपंचांनी पाठिंबा दिला आहे. शिष्टमंडळात हरिदास शृंगारे, शुभांगी खरबडे, मंगला काळबांडे, मंगला महाकुलकर, कांचन सलाम, विठ्ठल उके, प्रमोद ठाकरे, रूपाली चचाने, अर्चना इंगळे, नितीन गजभिये, उर्मिला महल्ले, दिनेश मानकर, उषा काळे यांच्यासह अन्य सरपंचांचा समावेश हाेता.