शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

समस्या निकाली न काढता परीक्षाच रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागांंतर्गत जागांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेतील समस्या आधीच निकाली न काढता परीक्षा रातोरात पुढे ढकलण्या ...

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागांंतर्गत जागांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेतील समस्या आधीच निकाली न काढता परीक्षा रातोरात पुढे ढकलण्या निर्णयाचा मेयो, मेडिकलमधील पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला. शनिवारी विद्यार्थ्यांनी काळी रिबीन बांधून रुग्णसेवा दिली तर काहींनी मेडिकलच्या समोर नारे-निदर्शने केली.

आरोग्य विभागाच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी ‘गट क’ संवर्गातील २ हजार ७३९ पदांसाठी तर, २६ सप्टेंबर ‘गट ड संवर्गातील ३ हजार ४६६’ पदांसाठी रोजी लेखी परीक्षा होणार होती. या परीक्षेच्या ‘हॉल तिकीट’चा गोंधळ आधीपासूनच चर्चेत होता. काहींच्या नावात घोळ होता. बहुसंख्य विद्यार्थ्यांना हवे ते सेंटर मिळाले नव्हते. काही विद्यार्थ्यांना तर महाराष्ट्राबाहेर परीक्षा केंद्र देण्यात आले होते. याच्या तक्रारीही झाल्या. परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर नाईलाजेपोटी विद्यार्थी एक दिवसापूर्वीच केंद्राच्या ठिकाणी पोहचले. परंतु शुक्रवारी रात्री अचानक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या बाह्यस्रोत संस्था ‘न्यासा कम्युनिकेशन’च्या अकार्यक्षमतेचे कारण देत, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.

याचा निषेध म्हणून शनिवारी सकाळी ‘पॅरामेडिकल स्टुडंट वेलफेअर ॲण्ड ॲल्युमिना असोसिएशन’च्या वतीने मेयो व मेडिकलच्या पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांनी मेडिकलच्या परिसरात नारे-निदर्शने केली. जे विद्यार्थी रुग्णसेवेत होते त्यांनी काळी रिबीन बांधून सेवा दिली. पॅरामेडिकल स्टुडंट वेलफेअर ॲण्ड ॲल्युमिना असोसिएशनचे राज्याध्यक्ष अक्षय गायधने म्हणाले, सरकारने विद्यार्थ्यांशी चालविला खेळ थांबवायला हवा. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला, त्याची परतफेड व्हायला हवी.

नागपूर विभागातून ६४ हजार ७४९ विद्यार्थी देणार होते परीक्षा

सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गासाठी शनिवारी होणाऱ्या परीक्षेत नागपूर विभागातून ३८ हजार ६६७ तर ‘गट ड’ संवर्गासाठी रविवारी होणाऱ्या परीक्षेत ६४ हजार ७४९ विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

विभागानुसार व्हायला हव्यात परीक्षा

आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, राज्यात आठ विभाग आहेत. पदभरतीच्या परीक्षा या विभागानुसार व्हायला हव्यात. यामुळे परीक्षेचे नियोजन करणे सोपे ठरते. सोबतच येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करता येतात. शिवाय, एखाद्या विभागात काही समस्या निर्माण झाल्यास केवळ त्याच विभागातील परीक्षा रद्द करता येतात.