शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील एसईबीसी आरक्षणाचे संरक्षण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 19:10 IST

विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने यापुढे यासंदर्भातील कोणत्याही याचिका वा अर्जावर कोणतेही न्यायालय सुनावणी घेणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ४ जून रोजी आर्थिक दुर्बलांसाठीच्या आरक्षणाचे प्रकरण निकाली काढताना दिला होता. तो आदेश लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग (मराठा व इतर समाज) आरक्षणाविरुद्धची रिट याचिका खारीज केली. त्यामुळे हे आरक्षण कायम राहिले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्टातील याचिका खारीज : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने यापुढे यासंदर्भातील कोणत्याही याचिका वा अर्जावर कोणतेही न्यायालय सुनावणी घेणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ४ जून रोजी आर्थिक दुर्बलांसाठीच्या आरक्षणाचे प्रकरण निकाली काढताना दिला होता. तो आदेश लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग (मराठा व इतर समाज) आरक्षणाविरुद्धची रिट याचिका खारीज केली. त्यामुळे हे आरक्षण कायम राहिले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला.डॉ. समीर देशमुख यांच्यासह तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिका सुनावणीसाठी आल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या ४ जूनच्या आदेशाकडे उच्च न्यायालयाचे लक्ष वेधून हे प्रकरण या ठिकाणी ऐकले जाऊ शकत नाही असा आक्षेप घेतला तर, याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आर्थिक दुर्बलांसाठीच्या आरक्षणासंदर्भात असल्याचे सांगून तो आदेश या प्रकरणाला लागू होत नसल्याचा दावा केला. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देऊन याचिका खारीज केली.पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील एसईबीसी आरक्षणाला संरक्षण देणाऱ्या अध्यादेशाच्या वैधतेला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. सुरुवातीला पीडित वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन हा अध्यादेश अवैध ठरवून रद्द करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितल्यामुळे संबंधित याचिका मागे घेण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, ४ जूनचा आदेश या याचिकेवरील सुनावणीला बाधा ठरणार नाही असे स्पष्टीकरण मिळविण्यासाठी सागर सारडा व इतर विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. १० जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने आमचा आदेश आधीच स्पष्ट असल्याचे सांगून तो अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे उच्च न्यायालयालाच योग्य तो निर्णय घ्यायचा होता. तो निर्णय याचिकाकर्त्यांविरुद्ध गेला.उच्च न्यायालयाने आरक्षण ठरवले होते अवैधएसईबीसी आरक्षणाचा कायदा ३० नोव्हेंबर २०१८ पासून लागू झाला आहे. कायद्यातील कलम १६ (२) मध्ये हा कायदा पूर्वलक्षीप्रभावाने लागू होणार नाही अशी तरतूद होती. असे असताना, ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये १६ टक्के एसईबीसी आरक्षण लागू करण्यात आले. त्याविरुद्ध डॉ. संजना वाडेवाले व इतर विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात तीन रिट याचिका दाखल केल्या होत्या. २ मे २०१९ रोजी उच्च न्यायालयाने त्या याचिका मंजूर केल्या व ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना यावर्षीपासून एसईबीसी आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही असा निर्णय दिला. त्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे अपील फेटाळून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर सरकारने २० मे रोजी कायद्यातील दुरुस्तीचा वटहुकूम जारी केला व त्याद्वारे एसईबीसी आरक्षणाला संरक्षण दिले. सध्या या वटहुकूमासंदर्भात वाद सुरू आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयreservationआरक्षणMedicalवैद्यकीय