शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमुक्त नागपूरचे वचन भंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०१२ व २०१७च्या महापालिका निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ‘आमचा संकल्प हाच आमचा वचननामा’ जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०१२ व २०१७च्या महापालिका निवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ‘आमचा संकल्प हाच आमचा वचननामा’ जाहीर केला होता.

उपराजधानीला देशाला नंबर-१ स्मार्ट सिटी करण्याची घोषणा केली होती. शहराला टँकरमुक्त करण्याचे वचन दिले होते. २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्याची ग्वाही दिली. मात्र, टँकरमुक्त शहराचे वचन भंगले आहे.

मागील १५ वर्षांपासून महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. अर्थातच शहरातील विकासाची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर आहे. मागील तीन निवडणुकांत दिलेल्या आश्वासनांचा आढावा घेतला असता, बहुसंख्य आश्वसने हवेत विरली आहेत. पाच वर्षांत शहरातील सर्व भागांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात शहरातील काही भागांतच ही योजना राबविण्यात यश आले. अमृत योजनेंतर्गत शहरालगतच्या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी ४० नवीन पाण्याच्या टाक्या उभारावयाच्या होत्या. मात्र, साडेचार वर्षांत जेमतेम १६ टाक्यांचे काम शक्य झाले. उर्वरित २४ टाक्यांचे काम अजूनही सुरू झालेले नाही. जागाही उपलब्ध न केल्याने या योजनेला तीन वर्षांसाठी मुदतवाढ द्यावी लागली. त्यामुळे शहरात अजूनही २६५ टँकर सुरू आहेत.

...

ज्येष्ठांना टॅक्स माफी मिळालीच नाही

भाजपने आपल्या वचननाम्यात ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घर टॅक्स व पाणी टॅक्स माफ करण्याची घोषणा केली होती, तसेच सेवानिवृत्त व ७० वर्षांवरील नागरिकांना घर टॅक्समध्ये २० टक्के सवलतीची घोषणा केली होती. मात्र, अशा स्वरूपाचा लाभ मिळालेला नाही. सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना टॅक्समध्ये १० टक्के सवलत मिळते.

...

ऑरेज सिटी स्ट्रीट कुठे गेला

वर्धा रोडवरील हॉटेल रीडसन ब्ल्यू चौक ते जयताळा चौक परिसरात ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प उभारला जाणार होता. २०१२च्या निवडणुकीत लंडन सिटी स्ट्रीट म्हणून हा प्रकल्प राबविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. राज्य सरकार, मेट्रो रेल्वे व मनपा यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सध्यातरी हा प्रकल्प कागदावरच आहे. तो कधी पूर्ण होईल, याची शाश्वती नाही.

...

बेरोजगारांना रोजगाराचे फक्त स्वप्नच

महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना, शहरातील १५ हजार बेरोजगारांना रोजगार देण्याची ग्वाही दिली होती. १५ हजार तर दूरच एक हजारही बेरोजगारांना मागील आठ वर्षांत रोजगार मिळालेला नाही. आता लोकांनाही या आश्वासनाचा विसर पडला आहे. मागील निवडणुकीत कोणती आश्वासने दिली होती, ती किती पूर्ण झाली, याचा लेखाजोखा जनतेपुढे ठेवावा लागणार आहे.