शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकच नाही तर परीक्षा कशी होणार, मूल्यांकन कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 11:25 IST

नागपूर विद्यापीठ सिनेट सभा : सदस्यांनी उपस्थित केला प्रश्न

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयीन स्तरावर प्रथम, तृतीय आणि पाचव्या सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यासाठी विद्यापीठाकडून सर्व महाविद्यालयांना सामाईक प्रश्नपत्रिका दिल्या जातील, मात्र ज्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची कमतरता आहे किंवा ज्या महाविद्यालयांमध्ये नाममात्र प्राध्यापक आहेत. त्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा कशी घेतली जाईल आणि त्यांचे मूल्यमापन कसे होणार? असा प्रश्न विद्यापीठाच्या अनेक सिनेट सदस्यांनी उपस्थित केला.

बुधवारी विद्यापीठाच्या सिनेटची बैठक प्रशासकीय भवनात आयोजित करण्यात आली होती. तीत स्मिता वंजारी यांच्या प्रस्तावानुसार विद्यापीठ विषम सत्र परीक्षा घेणार असून, विद्यापीठ सम सत्र परीक्षा घेणार असल्याचे इतिवृत्तात सांगण्यात आले आहे. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, नियमन करणे आणि वितरण करणे याची जबाबदारी विद्यापीठाची राहील. त्यासाठी मानधन आणि इतर खर्चही विद्यापीठ करणार आहे. परीक्षा इनहाऊस होणार असल्याने प्राध्यापक मूल्यांकनही करतील. सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी, विष्णू चांगदे, प्राचार्य लांजे यांनी चर्चेत भाग घेताना उपरोक्त प्रश्न उपस्थित केले.

प्राचार्यांची असेल जबाबदारी

प्राध्यापकांच्या कमतरतेचा प्रश्नावर कुलगुरू प्रा. सुभाष चौधरी म्हणाले, महाविद्यालयांच्या परिस्थितीबाबत मंत्रालय स्तरावरही चर्चा झाली. संभाव्य आराखड्यात समावेश नसतानाही महाविद्यालयांना मान्यता दिली जाते. विद्यापीठाचे काम संलग्नता प्रदान करणे आहे. यावर सदस्य वाजपेयी यांनी ज्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे, अशा महाविद्यालयांची यादी विद्यापीठ प्रशासनाने जाहीर करावी, असे सांगितले. यावर कुलगुरू म्हणाले की, विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेत सर्व सेमिस्टरच्या गुणांच्या आधारे गुण दिले जातात. परीक्षा घेणे आणि योग्य मूल्यमापन करणे प्राचार्यांची जबाबदारी असेल.

‘एमकेसीएल’चे शेअर्स विकत का नाही?

सदस्यांच्या सूचनांसह लेखा व लेखापरीक्षण अहवाल सिनेटमध्ये मांडण्यात आले. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान पुन्हा एकदा ‘एमकेसीएल’चा मुद्दा पुढे आला. एका सदस्याने विचारले की, विद्यापीठाने एमकेसीएलशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत, तेव्हा त्याचे जमा झालेले शेअर्सही विकले पाहिजेत. आताही विद्यापीठाचे अनेक शेअर्स आहेत. ज्या ‘एमकेसीएल’मुळे विद्यापीठाची बदनामी झाली आणि विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाला. त्याचे शेअर्स असणे म्हणजे त्याची जाहिरात करणे होय. त्याचे शेअर्स विकून मिळालेल्या रकमेची एफडी करावी. हा निधी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च करता येईल, असेही सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ