शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्राध्यापकच नाही तर परीक्षा कशी होणार, मूल्यांकन कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 11:25 IST

नागपूर विद्यापीठ सिनेट सभा : सदस्यांनी उपस्थित केला प्रश्न

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयीन स्तरावर प्रथम, तृतीय आणि पाचव्या सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यासाठी विद्यापीठाकडून सर्व महाविद्यालयांना सामाईक प्रश्नपत्रिका दिल्या जातील, मात्र ज्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची कमतरता आहे किंवा ज्या महाविद्यालयांमध्ये नाममात्र प्राध्यापक आहेत. त्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा कशी घेतली जाईल आणि त्यांचे मूल्यमापन कसे होणार? असा प्रश्न विद्यापीठाच्या अनेक सिनेट सदस्यांनी उपस्थित केला.

बुधवारी विद्यापीठाच्या सिनेटची बैठक प्रशासकीय भवनात आयोजित करण्यात आली होती. तीत स्मिता वंजारी यांच्या प्रस्तावानुसार विद्यापीठ विषम सत्र परीक्षा घेणार असून, विद्यापीठ सम सत्र परीक्षा घेणार असल्याचे इतिवृत्तात सांगण्यात आले आहे. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, नियमन करणे आणि वितरण करणे याची जबाबदारी विद्यापीठाची राहील. त्यासाठी मानधन आणि इतर खर्चही विद्यापीठ करणार आहे. परीक्षा इनहाऊस होणार असल्याने प्राध्यापक मूल्यांकनही करतील. सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी, विष्णू चांगदे, प्राचार्य लांजे यांनी चर्चेत भाग घेताना उपरोक्त प्रश्न उपस्थित केले.

प्राचार्यांची असेल जबाबदारी

प्राध्यापकांच्या कमतरतेचा प्रश्नावर कुलगुरू प्रा. सुभाष चौधरी म्हणाले, महाविद्यालयांच्या परिस्थितीबाबत मंत्रालय स्तरावरही चर्चा झाली. संभाव्य आराखड्यात समावेश नसतानाही महाविद्यालयांना मान्यता दिली जाते. विद्यापीठाचे काम संलग्नता प्रदान करणे आहे. यावर सदस्य वाजपेयी यांनी ज्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे, अशा महाविद्यालयांची यादी विद्यापीठ प्रशासनाने जाहीर करावी, असे सांगितले. यावर कुलगुरू म्हणाले की, विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेत सर्व सेमिस्टरच्या गुणांच्या आधारे गुण दिले जातात. परीक्षा घेणे आणि योग्य मूल्यमापन करणे प्राचार्यांची जबाबदारी असेल.

‘एमकेसीएल’चे शेअर्स विकत का नाही?

सदस्यांच्या सूचनांसह लेखा व लेखापरीक्षण अहवाल सिनेटमध्ये मांडण्यात आले. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान पुन्हा एकदा ‘एमकेसीएल’चा मुद्दा पुढे आला. एका सदस्याने विचारले की, विद्यापीठाने एमकेसीएलशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत, तेव्हा त्याचे जमा झालेले शेअर्सही विकले पाहिजेत. आताही विद्यापीठाचे अनेक शेअर्स आहेत. ज्या ‘एमकेसीएल’मुळे विद्यापीठाची बदनामी झाली आणि विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाला. त्याचे शेअर्स असणे म्हणजे त्याची जाहिरात करणे होय. त्याचे शेअर्स विकून मिळालेल्या रकमेची एफडी करावी. हा निधी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च करता येईल, असेही सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ