शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सुशासनाद्वारे सुटतील समस्या

By admin | Updated: December 26, 2014 00:55 IST

राज्यासमोर आजच्या घडीला निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक समस्या आहेत. हे सर्व प्रश्न सुशासनाद्वारे सोडविल्या जाऊ शकतात, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस : विद्यापीठात सुशासन दिन नागपूर : राज्यासमोर आजच्या घडीला निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक समस्या आहेत. हे सर्व प्रश्न सुशासनाद्वारे सोडविल्या जाऊ शकतात, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने दीक्षांत सभागृहात सुशासनविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.कार्यशाळेच्या या उद्घाटनप्रसंगी राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे, निवृत्त प्रशासकीय अधिकारी सदानंद भावे, विभागीय आयुक्त अनुपकुमार , जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, महानगरपालिका आयुक्त श्याम वर्धने, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे हे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्यावेळेला प्रस्थापित व्यवस्था सुशासन देऊ शकत नाहीत, तेव्हा जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो. एखाद्या व्यक्तिविशिष्टापेक्षा व्यवस्थेला मजबूत करण्याची आवश्यकता आहे. राज्य शासनासमोर पारदर्शक प्रशासन चालविण्याचे आव्हान आहे. हीच पारदर्शकता हा सुशासनाचा मूळ गाभा आहे. याकरिता माहिती तंत्रज्ञानाचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करता येऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले. पुढील अधिवेशनात सेवा हमी विधेयक आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकौशल्याचे वैशिष्ट्य विषद केले.अनुपकुमार यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडली तर डॉ. देशपांडे यांनी आभार मानले. नागपूर विद्यापीठ कर्मचारी कृती समितीतर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. दुपारी आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘प्रोजेक्टर’च्या माध्यमातून सुशासनावर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)