शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

सुशासनाद्वारे सुटतील समस्या

By admin | Updated: December 26, 2014 00:55 IST

राज्यासमोर आजच्या घडीला निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक समस्या आहेत. हे सर्व प्रश्न सुशासनाद्वारे सोडविल्या जाऊ शकतात, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस : विद्यापीठात सुशासन दिन नागपूर : राज्यासमोर आजच्या घडीला निरनिराळ्या क्षेत्रांतील अनेक समस्या आहेत. हे सर्व प्रश्न सुशासनाद्वारे सोडविल्या जाऊ शकतात, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने दीक्षांत सभागृहात सुशासनविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.कार्यशाळेच्या या उद्घाटनप्रसंगी राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे, निवृत्त प्रशासकीय अधिकारी सदानंद भावे, विभागीय आयुक्त अनुपकुमार , जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, महानगरपालिका आयुक्त श्याम वर्धने, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे हे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्यावेळेला प्रस्थापित व्यवस्था सुशासन देऊ शकत नाहीत, तेव्हा जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो. एखाद्या व्यक्तिविशिष्टापेक्षा व्यवस्थेला मजबूत करण्याची आवश्यकता आहे. राज्य शासनासमोर पारदर्शक प्रशासन चालविण्याचे आव्हान आहे. हीच पारदर्शकता हा सुशासनाचा मूळ गाभा आहे. याकरिता माहिती तंत्रज्ञानाचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करता येऊ शकतो, असे फडणवीस म्हणाले. पुढील अधिवेशनात सेवा हमी विधेयक आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकौशल्याचे वैशिष्ट्य विषद केले.अनुपकुमार यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडली तर डॉ. देशपांडे यांनी आभार मानले. नागपूर विद्यापीठ कर्मचारी कृती समितीतर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. दुपारी आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘प्रोजेक्टर’च्या माध्यमातून सुशासनावर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)