शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

खासगी बसभाडे वाढले

By admin | Updated: June 26, 2015 02:43 IST

मागील आठवड्यात इटारसीजवळ आरआरआय केबिनमध्ये आग लागल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

रेल्वेला होतोय विलंब : बस व्यवस्थापनाला लाभनागपूर : मागील आठवड्यात इटारसीजवळ आरआरआय केबिनमध्ये आग लागल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने उपराजधानीतील खासगी बस व्यवस्थापनाने अचानक १० ते १५ टक्क््याची वाढ त्यांच्या बसभाड्यात केली आहे. पावसामुळे बहुतांश रेल्वेगाड्या रद्द होत आहेत किंवा विलंबाने धावत आहेत. अनेक प्रवासी रेल्वेचे तिकीट रद्दही करीत आहेत. त्यामुळे अपरिहार्यतेने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा सहारा घ्यावा लागतो आहे. रेल्वे वाहतूक पावसाने प्रभावित होत असल्याने प्रवाशांच्या गरजेचा खासगी बसचालक लाभ घेत आहेत. खासगी बसेसमध्ये एसी बसेसचे बुकिंग अधिक करण्यात येत आहे. शहरातील गीतांजली चौक, बोले पेट्रोल पंप, बैद्यनाथ चौक, जाधव चौक, वर्धमाननगर, मानेवाडा आदी ठिकाणांहून खासगी बसेसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी प्रयत्न करीत आहेत. साधारणत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बसभाड्यात घट होते. बसने पावसात जाण्याचे प्रवासी टाळतात. पण इटारसीच्या आरआरआय केबिनमध्ये लागलेली आग आणि मुंबईला झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. बसेसच्या वाढलेल्या भाड्याबाबत विचारणा केली असता महाराष्ट्र बस, ट्रक, टेंपो वाहतूक महासंघाचे महासचिव महेंद्र लुले म्हणाले, खासगी बसचे भाडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कमी आहे. खासगी बसेसला सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो. एस. टी. ला टोल माफ करण्यात आला आहे. आम्हीदेखील समान सेवाच देतो पण आम्हाला या सुविधा मिळत नाहीत. अनेक मार्गावर एसटीच्या सामान्य बसच्या भाड्याच्या तुलनेत खासगी एसी बसेसचे भाडे कमी आहे. तरीही खासगी बसेसवर नेहमीच टीका केली जाते. काही विशेष प्रसंगात १० ते १५ टक्के वाढ होते. (प्रतिनिधी)