शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

खासगी एजन्सी येईल वीज कापून जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST

कमल शर्मा नागपूर : महावितरणच्या थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यास राजकीय विरोध होत असताना यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत बाहेरील ...

कमल शर्मा

नागपूर : महावितरणच्या थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यास राजकीय विरोध होत असताना यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत बाहेरील शक्तींची साथ घेण्यात येत आहे. खासगी एजन्सीजचे कर्मचारी घरोघरी जाऊन वीज कापण्याची धमकी देत वसुली करीत आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही बाब मान्य करून कर्मचारी कमी असल्यामुळे आऊटसोर्सिगची (खाजगी एजन्सी) मदत घेण्यात येत असल्याचे सांगितले.

महावितरणने ८ सप्टेंबर २०२० रोजी शहरातील तीन विभाग गांधीबाग, सिव्हील लाईन्स आणि महालचे कामकाज फ्रेंचाईसी एनएनडीएलने सांभाळले. कर्मचारी कमी असल्यामुळे फ्रेंचाईसीच्या कर्मचाऱ्यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून देखभालीच्या व दुरुस्तीच्या कामासाठी ठेवण्यात आले. आजही केसंस व न्युक्लियस नावाच्या दोन एजन्सी या कामासाठी मनुष्यबळ पुरवित आहेत. जवळपास ३५० कर्मचारी या कामासाठी तैनात आहेत. निविदेनुसार हे कर्मचारी विशेषत्वाने मेन्टेनन्स (देखभाल आणि दुरुस्ती) साठी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु आता त्यांना वसुलीसारख्या संवेदनशील मोहिमेत सामील करून घेण्यात आले आहे. हे कर्मचारी आता घरोघरी जात आहेत. त्यांना याबाबत कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांसोबत अभद्र व्यवहार केल्याच्या तक्रारी आहेत. ते स्वत:ला महावितरणचा कर्मचारी सांगून हे काम करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून मोहिमेत असामाजिक तत्व सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणच्या सूत्रांनुसार वसुलीसारख्या संवेदनशील कामात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच तैनात करण्याचा नियम आहे. महावितरणचे बहुतांश कर्मचारी मागील वर्षी शहरात रुजू झाले. अशा स्थितीत ते शहरातील वस्त्यांशी अनभिज्ञ आहेत. ते आपल्या स्तरावर खाजगी कर्मचाऱ्यांची मदत घेत आहेत.

...........

काम एका कंपनीत, ओळखपत्र दुसऱ्या कंपनीचे

खासगी एजन्सीत अनेक कर्मचाऱ्यांकडे वैध ओळखपत्र सुद्धा नाही. दोन दिवसांपूर्वी असेच दोन कर्मचारी छापरुनगर चौकातील एका अपार्टमेंटमध्ये वसुलीसाठी गेले. त्यांच्याशी बातचीत करताना ग्राहकाला त्यांच्यावर संशय आला. त्यांना ओळखपत्र मागितले असता त्यांनी ते दिले. परंतु त्यांच्याजवळ जे ओळखपत्र होते, त्या कंपनीचे कंत्राट आधीच संपले होते. या ओळखपत्रावर नियम धाब्यावर बसवून महावितरणच्या लोगोचा उपयोग करण्यात आला आहे.

संशय असल्यास ओळखपत्र मागा

महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी सांगितले की २०१९ मध्ये पूर्ण शहरात कंपनीने कामकाज सांभाळले आहे. एनएनडीएलच्या कर्मचाऱ्यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना संशय आल्यास वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र मागण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

..........