शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जेल शिपायाची आत्महत्या मानसिक छळातून ?

By admin | Updated: October 21, 2015 03:15 IST

जेल शिपाई राजाभाऊ शंकरराव वानखेडे यांनी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली असून

नागपूर : जेल शिपाई राजाभाऊ शंकरराव वानखेडे यांनी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली असून आत्महत्येचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. राजाभाऊ वानखेडे यांनी सोमवारच्या रात्री आपल्या महाल झेंडा चौक येथील राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांनी पलायन केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कारागृहातून मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यामुळे संशय घेऊन या कारागृहातील १५ शिपायांना एप्रिलमध्ये अन्य कारागृहांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. राजाभाऊ यांना चंद्रपूर कारागृहात पाठविण्यात आले होते. प्रतिनियुक्तीचा काळ एक-दोन महिन्याचा असतो. तरीही अन्यत्र पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा काळ लोटूनही त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी परत बोलावण्यात आले नाही. या शिवाय त्यांच्या रजाही बंद करण्यात आल्या आहेत. सुमारे दीडशेवर कर्मचाऱ्यांच्या रजेचे अर्ज अद्यापही वरिष्ठांच्या टेबलवर धूळखात पडून आहेत. राजाभाऊ वानखेडे यांना रजा तर मिळत नव्हतीच, शिवाय चार महिन्यापासून त्यांचा पगारही रोखण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या जीपीएफमधून एक लाख रुपये काढले होते. रजा आणि वेतन अडविण्यात आल्याने ते मानसिक त्रस्त झाले होते. त्यामुळे मद्याच्या आहारी जाऊन त्यांनी आत्महत्या केली, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)