शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

अर्थसंकल्पात जुनी कामे पूर्ण करण्याला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:08 IST

मनपाचा शुक्रवारी अर्थसंकल्प : कोरोना संकटाचा उत्पन्नाला फटका लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी ...

मनपाचा शुक्रवारी अर्थसंकल्प : कोरोना संकटाचा उत्पन्नाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी महापालिकेच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. प्रशासकीय यंत्रणा कोविड नियंत्रणात व्यस्त आहे. दुसरीकडे वेळोवेळी लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे करवसुलीवर परिणाम झाला. मनपाची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. शासनाच्या अनुदानावर निर्भर असल्याची परिस्थिती आहे. त्यात कोरोना संकटाचा विचार करता आरोग्य सुविधासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षात निवडणुकीला सामोरे जाताना नवीन कामे श्क्य नसल्याने किमान रखडलेली जुनी विकास कामे पूर्ण व्हावी, यासाठी तरतूद असलेला मनपाचा वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर शुक्रवारी विशेष सभेत सादर करणार आहेत.

माजी स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी वर्ष २०२०-२१ चा २७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. पुढील वर्षाचा अर्थसंकल्पही २७५० कोटींच्या आसपास राहील. गेल्या दीड वर्षात शहरात कोणत्याही स्वरूपाची विकास कामे झालेली नाही. यामुळे नागरिकात असलेला रोष व निवडणुकीचा विचार करता अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश न करता प्रभागातील रखडलेली विकास कामे, गडरलाईन, रस्ते, पथदिवे यासाठी ३०० ते ३५० कोटींची तरतूद करण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी या कामांना मंजुरी मिळावी. यासाठी अर्थसंकल्प लवकर सादर केला जात आहे.

दोन वर्षापूर्वी मंजुरी देण्यात आली. परंतु पूर्ण न झालेल्या कामांसाठी तरतूद केली जाणार आहे. महापौरांनी घोषणा केलेले आरोग्य केंद्र व शिक्षण विभागाच्या इंग्रजी शाळा असे काही मोजके उपक्रम वगळता अर्थसंकल्पात नवीन करण्याला फारशी संधी नाही.

...

नवीन करवाढ नाही

कोरोना संकट व पुढील वर्षात होणारी निवडणूक लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणत्याही स्वरूपाची करवाढ लादण्यात येणार नसल्याचे संकेत सत्तापक्षाने दिले आहे. आधीच कोरोनामुळे मालमत्ता, जलप्रदाय, बाजार, स्थावर, नगररचना यांसारख्या उत्पन्नाच्या स्रोतांचे लक्ष्यही गाठता आलेले नाही. जुनी वसुली होत नसताना नवीन करवाढ करून करण्याचा विचार नाही.

....

नव्या प्रकल्पांची घोषणा नाही

प्रभागातील विकास कामांनाच निधी मिळत नसताना नवीन प्रकल्पाची घोषणा करून उपयोग नसल्याने अर्थसंकल्पात नवीन प्रकल्पाची घोषणा करण्याची शक्यता दिसत नाही. सरकारी अनुदान १६०० कोटींच्या आसपास सरकारी अनुदान मिळत आहे. सोबतच मेट्रो, सिमेंट रस्ते, स्मार्ट सिटी प्रकल्प, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प व इतर प्रकल्पांचा वाटा देताना होणारी दमछाक लक्षात घेता नव्या योजनांचा समावेश शक्य नाही.