शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 03:01 IST

वाढत्या उन्हामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. खुल्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

महिन्यात दुपटीने वाढ : स्थानिक उत्पादकांकडून आवक कमीनागपूर : वाढत्या उन्हामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. खुल्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. लग्नसराईत भाज्यांची मागणी वाढली आहे. महिन्यात भाज्यांची दुपटीने दरवाढ झाली आहे. दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले की, सध्या बाजारात दररोज १०० ते १२५ टेम्पो माल येत आहे. अन्य राज्यातूनही आवक फारच कमी आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. गेल्यावर्षी या काळात दर स्थिर होते. यावर्षी हवामानामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट झाली. (प्रतिनिधी)किरकोळमध्ये महागचनागपूरपासून ३० कि.मी.च्या भागात ओलिसाचे क्षेत्र होते. पण या जागांवर सध्या बिल्डर्सचा ताबा असल्यामुळे ओलिताच्या जमिनी ओसाड पडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून उत्पादनात बरीच घट झाली आहे. उन्हाळ्यात लगतच्या उत्पादकांकडून आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात वांगे, पत्ता कोबी, फूल कोबी, टमाटर, कोथिंबीर, चवळी, पालक, मूळा आदींचे दर परवडणारे आहेत. नेहमीच्या भाज्या १५ ते ३० रुपयांदरम्यान आहेत. संगमनेर, मदनपल्ली, नाशिक येथून टमाटर, टाटानगर येथून सिमला मिरची, छिंदवाडा येथून फूलकोबी तसेच लगतच्या जिल्ह्यातून भाज्यांची आवक आहे. यापुढे ग्राहकांना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील, असे महाजन यांनी सांगितले. बटाटे, कांदे स्वस्तचयावर्षी उत्पादन वाढल्याने मार्च महिन्यात आलू स्वस्त तर कांदे सामान्यांच्या आटोक्यात आहे. जानेवारीनंतर बाजारात येणाऱ्या कांद्याची साठवणूक करता येत नाही. कळमना बाजारात पांढरा आणि लाल कांदा प्रति किलो ८ ते १० रुपयादरम्यान आहे. किरकोळमध्ये १५ रुपयांनी विक्री सुरू आहे. दररोज २० ते २५ गाड्यांची आवक आहे. सध्या चाळीसगाव, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील माल येत आहे. अकोला व अमरावती येथील चांगला माल एप्रिलमध्ये बाजारात येईल. सध्या पावसामुळे नुकसान झाले असून भाव वाढू शकतात, असे मत कळमना येथील आलू-कांदा अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षी बटाट्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने भावात घसरण झाली आहे. अलाहाबाद, कानपूर, आग्रा येथून दररोज १६ टन क्षमतेच्या २५ ते ३० ट्रकची आवक सुरू आहे. कळमन्यात भाव ८ ते १० रूपये किलो तर किरकोळमध्ये भाव १५ रुपयांवर आहेत. आवक वाढल्याने भाववाढीची शक्यता नसल्याचे वसानी म्हणाले.