शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

भाज्यांचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 03:01 IST

वाढत्या उन्हामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. खुल्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

महिन्यात दुपटीने वाढ : स्थानिक उत्पादकांकडून आवक कमीनागपूर : वाढत्या उन्हामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. खुल्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. लग्नसराईत भाज्यांची मागणी वाढली आहे. महिन्यात भाज्यांची दुपटीने दरवाढ झाली आहे. दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले की, सध्या बाजारात दररोज १०० ते १२५ टेम्पो माल येत आहे. अन्य राज्यातूनही आवक फारच कमी आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. गेल्यावर्षी या काळात दर स्थिर होते. यावर्षी हवामानामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट झाली. (प्रतिनिधी)किरकोळमध्ये महागचनागपूरपासून ३० कि.मी.च्या भागात ओलिसाचे क्षेत्र होते. पण या जागांवर सध्या बिल्डर्सचा ताबा असल्यामुळे ओलिताच्या जमिनी ओसाड पडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून उत्पादनात बरीच घट झाली आहे. उन्हाळ्यात लगतच्या उत्पादकांकडून आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात वांगे, पत्ता कोबी, फूल कोबी, टमाटर, कोथिंबीर, चवळी, पालक, मूळा आदींचे दर परवडणारे आहेत. नेहमीच्या भाज्या १५ ते ३० रुपयांदरम्यान आहेत. संगमनेर, मदनपल्ली, नाशिक येथून टमाटर, टाटानगर येथून सिमला मिरची, छिंदवाडा येथून फूलकोबी तसेच लगतच्या जिल्ह्यातून भाज्यांची आवक आहे. यापुढे ग्राहकांना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील, असे महाजन यांनी सांगितले. बटाटे, कांदे स्वस्तचयावर्षी उत्पादन वाढल्याने मार्च महिन्यात आलू स्वस्त तर कांदे सामान्यांच्या आटोक्यात आहे. जानेवारीनंतर बाजारात येणाऱ्या कांद्याची साठवणूक करता येत नाही. कळमना बाजारात पांढरा आणि लाल कांदा प्रति किलो ८ ते १० रुपयादरम्यान आहे. किरकोळमध्ये १५ रुपयांनी विक्री सुरू आहे. दररोज २० ते २५ गाड्यांची आवक आहे. सध्या चाळीसगाव, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील माल येत आहे. अकोला व अमरावती येथील चांगला माल एप्रिलमध्ये बाजारात येईल. सध्या पावसामुळे नुकसान झाले असून भाव वाढू शकतात, असे मत कळमना येथील आलू-कांदा अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षी बटाट्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने भावात घसरण झाली आहे. अलाहाबाद, कानपूर, आग्रा येथून दररोज १६ टन क्षमतेच्या २५ ते ३० ट्रकची आवक सुरू आहे. कळमन्यात भाव ८ ते १० रूपये किलो तर किरकोळमध्ये भाव १५ रुपयांवर आहेत. आवक वाढल्याने भाववाढीची शक्यता नसल्याचे वसानी म्हणाले.