शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

भाज्यांचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 03:01 IST

वाढत्या उन्हामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. खुल्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

महिन्यात दुपटीने वाढ : स्थानिक उत्पादकांकडून आवक कमीनागपूर : वाढत्या उन्हामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. खुल्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. लग्नसराईत भाज्यांची मागणी वाढली आहे. महिन्यात भाज्यांची दुपटीने दरवाढ झाली आहे. दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कॉटन मार्केट आडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले की, सध्या बाजारात दररोज १०० ते १२५ टेम्पो माल येत आहे. अन्य राज्यातूनही आवक फारच कमी आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. गेल्यावर्षी या काळात दर स्थिर होते. यावर्षी हवामानामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट झाली. (प्रतिनिधी)किरकोळमध्ये महागचनागपूरपासून ३० कि.मी.च्या भागात ओलिसाचे क्षेत्र होते. पण या जागांवर सध्या बिल्डर्सचा ताबा असल्यामुळे ओलिताच्या जमिनी ओसाड पडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून उत्पादनात बरीच घट झाली आहे. उन्हाळ्यात लगतच्या उत्पादकांकडून आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात वांगे, पत्ता कोबी, फूल कोबी, टमाटर, कोथिंबीर, चवळी, पालक, मूळा आदींचे दर परवडणारे आहेत. नेहमीच्या भाज्या १५ ते ३० रुपयांदरम्यान आहेत. संगमनेर, मदनपल्ली, नाशिक येथून टमाटर, टाटानगर येथून सिमला मिरची, छिंदवाडा येथून फूलकोबी तसेच लगतच्या जिल्ह्यातून भाज्यांची आवक आहे. यापुढे ग्राहकांना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील, असे महाजन यांनी सांगितले. बटाटे, कांदे स्वस्तचयावर्षी उत्पादन वाढल्याने मार्च महिन्यात आलू स्वस्त तर कांदे सामान्यांच्या आटोक्यात आहे. जानेवारीनंतर बाजारात येणाऱ्या कांद्याची साठवणूक करता येत नाही. कळमना बाजारात पांढरा आणि लाल कांदा प्रति किलो ८ ते १० रुपयादरम्यान आहे. किरकोळमध्ये १५ रुपयांनी विक्री सुरू आहे. दररोज २० ते २५ गाड्यांची आवक आहे. सध्या चाळीसगाव, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील माल येत आहे. अकोला व अमरावती येथील चांगला माल एप्रिलमध्ये बाजारात येईल. सध्या पावसामुळे नुकसान झाले असून भाव वाढू शकतात, असे मत कळमना येथील आलू-कांदा अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षी बटाट्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने भावात घसरण झाली आहे. अलाहाबाद, कानपूर, आग्रा येथून दररोज १६ टन क्षमतेच्या २५ ते ३० ट्रकची आवक सुरू आहे. कळमन्यात भाव ८ ते १० रूपये किलो तर किरकोळमध्ये भाव १५ रुपयांवर आहेत. आवक वाढल्याने भाववाढीची शक्यता नसल्याचे वसानी म्हणाले.