शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मागचे मिळाले नाहीत, भविष्यातही मिळणार नाही

By admin | Updated: May 2, 2015 02:21 IST

राज्यातील सरकार बदलले परंतु विदर्भाच्या भाग्यात मात्र फारसा फरक पडलेला नाही.

नागपूर : राज्यातील सरकार बदलले परंतु विदर्भाच्या भाग्यात मात्र फारसा फरक पडलेला नाही. मागच्या सरकारद्वारे विदर्भासाठी मंजूर करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांपैकी ८६ कोटी रुपये वित्तवर्ष संपल्यावरही मिळालेले नाही. दुसरीकडे नवीन सरकारने सुद्धा विदर्भाला विशेष निधी देण्याचा निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाही. दरम्यान विदर्भ विकास मंडळाने राज्य सरकारच्या नियोजन विभागाला पत्र पाठवून मागच्या वर्षीची थकीत रक्कम यावर्षी देण्याची मागणी केली आहे. परंतु सरकारतर्फे अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाही. राज्यातील वैधानिक विकास मंडळांना १०० कोटी रुपयांचा विशेष निधी २०११ पर्यंत मिळत होता. लोकसंख्येच्या आधारावर हा निधी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात वितरित केला जायचा. परंतु राज्य सरकारने हा विशेष निधी बंद केला आहे. गेल्यावर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मागच्या सरकारने तिन्ही मंडळांना प्रत्येकी १०० कोटी रुपयांचा विशेष निधी वितरित केला होता. परंतु विदर्भ वैधानिक विकास मंडळाला मात्र या निधीपैकी केवळ १४ काटी रुपयेच मिळाले. यावर्षी भाजपच्या अर्थसंकल्पात या निधीसंबंधात कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. वैधानिक विकास मंडळाचा कार्यकाळ आणखी पाच वर्षे वाढविण्यात आल्याने विशेष निधीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मंडळातील सूत्रानुसार गेल्या वर्षी खर्च करण्यात आलेल्या रकमेचा हिशोब सादर करून उर्वरित रक्कम नवीन वित्त वर्षात देण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे.