शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच

By admin | Updated: May 28, 2017 02:33 IST

आजवर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार हे राष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतापेक्षा भाजपा महायुतीला

रामदास आठवले : विरोधी पक्ष एकत्र आले तरी फरक पडणार नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजवर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार हे राष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतापेक्षा भाजपा महायुतीला १८ हजार मते कमी पडत असली तरी ती मिळविणे फार कठीण नाही. विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी फरक पडणार नाही. राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच होईल, असा दावा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ.) अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होणार असल्याची चर्चा आहे. परंतु शरद पवार यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार होऊ नये. पवार हे कधीही हरण्यासाठी निवडणूक लढत नाही. त्यामुळे ते स्वत: राष्ट्रपती पदासाठी उभे राहणार नाही, असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या ७० वर्षांत जे झाले नाही, ते गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक संविधान बदलण्यात येणार असल्याचा आरोप करतात, परंतु भारताचे संविधान बदलले जाणार नाही तसेच आरक्षणही कायम राहील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. सहारनपूर येथील घटना ही चुकीचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, बाळू घरडे आदी उपस्थित होते. दीक्षाभूमी हाच माझा संघ भाजपाचे सरकार आले तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्व वाढले आहे. केंद्र व राज्यातील मंत्री व आमदाराने एकदा तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आहे. तेव्हा आपण केंद्रात मंत्री असल्याने आपणही रास्वसंघ मुख्यालयाला भेट देणार का? अशी विचारणा पत्रकारांनी आठवले यांना केली असता, त्यांनी दीक्षाभूमी हाच माझा संघ असल्याचे स्पष्ट केले. माझ्या पक्षाने भाजपाशी युती केली आहे, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्याचा प्रश्नच येत नाही. रिपाइं ऐक्यासाठी राजीनामा द्यायला तयार रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.