शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच

By admin | Updated: May 28, 2017 02:33 IST

आजवर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार हे राष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतापेक्षा भाजपा महायुतीला

रामदास आठवले : विरोधी पक्ष एकत्र आले तरी फरक पडणार नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजवर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार हे राष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतापेक्षा भाजपा महायुतीला १८ हजार मते कमी पडत असली तरी ती मिळविणे फार कठीण नाही. विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी फरक पडणार नाही. राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच होईल, असा दावा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ.) अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होणार असल्याची चर्चा आहे. परंतु शरद पवार यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार होऊ नये. पवार हे कधीही हरण्यासाठी निवडणूक लढत नाही. त्यामुळे ते स्वत: राष्ट्रपती पदासाठी उभे राहणार नाही, असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या ७० वर्षांत जे झाले नाही, ते गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक संविधान बदलण्यात येणार असल्याचा आरोप करतात, परंतु भारताचे संविधान बदलले जाणार नाही तसेच आरक्षणही कायम राहील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. सहारनपूर येथील घटना ही चुकीचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, बाळू घरडे आदी उपस्थित होते. दीक्षाभूमी हाच माझा संघ भाजपाचे सरकार आले तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्व वाढले आहे. केंद्र व राज्यातील मंत्री व आमदाराने एकदा तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आहे. तेव्हा आपण केंद्रात मंत्री असल्याने आपणही रास्वसंघ मुख्यालयाला भेट देणार का? अशी विचारणा पत्रकारांनी आठवले यांना केली असता, त्यांनी दीक्षाभूमी हाच माझा संघ असल्याचे स्पष्ट केले. माझ्या पक्षाने भाजपाशी युती केली आहे, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्याचा प्रश्नच येत नाही. रिपाइं ऐक्यासाठी राजीनामा द्यायला तयार रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.