शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गणेशनगरीतील पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : बाेखारा ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गणेशनगरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. परिणामी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : बाेखारा ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गणेशनगरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. परिणामी याठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने वसाहतीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा याेजनेचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असल्याने ग्रामपंचायतीने बिलाचा भरणा करण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली. मात्र ग्रामपंचायतीने आठ लाखांचे थकीत बिल भरण्यास हतबलता दाखविल्याने नागरिकांनी आता ऊर्जा तथा पालकमंत्री नितीन राऊत यांना साकडे घातले आहे.

गणेशनगरी या वसाहतीला बिल्डरच्या वतीने स्वतंत्र पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित करण्यात आली. ग्रामपंचायतशी २००६ मध्ये झालेल्या करारानुसार या याेजनेचे वीजबिल भरण्याबाबत ग्रामपंचायतीने मान्य केले. तेव्हापासून ग्रामपंचायत पाणीपुरवठा याेजनेचे बिल भरत आहे. सध्या विद्युत बिलापाेटी आठ लाखांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे वसाहतीत पाणी समस्या निर्माण झाली. नागरिकांनी सरपंच अनिता पंडित व ग्रामविकास अधिकारी निमजे यांच्याकडे बिलाचा भरणा करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली असता, निधी उपलब्ध नसल्याचे सांगून ग्रामपंचायतीने हतबलता दाखविली.

त्यामुळे या वसाहतीला पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला. सरपंच अनिता बाबा पंडित व ग्रामविकास अधिकारी निमजे यांच्याकडे नागरिकांनी विजेचे बिल भरून पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली असता ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल भरण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीने हतबलता दाखवली. दरम्यान, नागरिकांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना रामदास बडवाईक, किशोर मेश्राम, एस. आर. दुधे, के. पी. राऊत शिशुपाल कनोजे, समीर ढोरे, राहुल भटकर, सतीशचंद्र जोशी, दिनेशकुमार सिंग, शंकर कुशवाह, पी. पी. मुंगसे, एस. बी. देशमुख, दिलीप धकाते आदी उपस्थित हाेते.

यासंदर्भात सरपंच अनिता पंडित यांच्याशी संपर्क साधला असता, काेराेनामुळे ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आहे. वीजबिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नाही. अशा स्थितीत महावितरणने पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा याेजनेचे वीज कनेक्शन कापले आहे. ऊर्जामंत्र्यांनी संबंधितांना आदेश देऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा. गणेशनगरीसह बाेखारावासीयांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने साकारलेली याेजना लवकर कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी प्राथमिकता असल्याचे मत सरपंच अनिता पंडित यांनी व्यक्त केले.