शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

गणेशनगरीतील पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : बाेखारा ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गणेशनगरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. परिणामी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : बाेखारा ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गणेशनगरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. परिणामी याठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने वसाहतीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा याेजनेचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असल्याने ग्रामपंचायतीने बिलाचा भरणा करण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली. मात्र ग्रामपंचायतीने आठ लाखांचे थकीत बिल भरण्यास हतबलता दाखविल्याने नागरिकांनी आता ऊर्जा तथा पालकमंत्री नितीन राऊत यांना साकडे घातले आहे.

गणेशनगरी या वसाहतीला बिल्डरच्या वतीने स्वतंत्र पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित करण्यात आली. ग्रामपंचायतशी २००६ मध्ये झालेल्या करारानुसार या याेजनेचे वीजबिल भरण्याबाबत ग्रामपंचायतीने मान्य केले. तेव्हापासून ग्रामपंचायत पाणीपुरवठा याेजनेचे बिल भरत आहे. सध्या विद्युत बिलापाेटी आठ लाखांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे वसाहतीत पाणी समस्या निर्माण झाली. नागरिकांनी सरपंच अनिता पंडित व ग्रामविकास अधिकारी निमजे यांच्याकडे बिलाचा भरणा करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली असता, निधी उपलब्ध नसल्याचे सांगून ग्रामपंचायतीने हतबलता दाखविली.

त्यामुळे या वसाहतीला पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला. सरपंच अनिता बाबा पंडित व ग्रामविकास अधिकारी निमजे यांच्याकडे नागरिकांनी विजेचे बिल भरून पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली असता ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल भरण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीने हतबलता दाखवली. दरम्यान, नागरिकांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना रामदास बडवाईक, किशोर मेश्राम, एस. आर. दुधे, के. पी. राऊत शिशुपाल कनोजे, समीर ढोरे, राहुल भटकर, सतीशचंद्र जोशी, दिनेशकुमार सिंग, शंकर कुशवाह, पी. पी. मुंगसे, एस. बी. देशमुख, दिलीप धकाते आदी उपस्थित हाेते.

यासंदर्भात सरपंच अनिता पंडित यांच्याशी संपर्क साधला असता, काेराेनामुळे ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आहे. वीजबिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नाही. अशा स्थितीत महावितरणने पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा याेजनेचे वीज कनेक्शन कापले आहे. ऊर्जामंत्र्यांनी संबंधितांना आदेश देऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा. गणेशनगरीसह बाेखारावासीयांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने साकारलेली याेजना लवकर कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी प्राथमिकता असल्याचे मत सरपंच अनिता पंडित यांनी व्यक्त केले.