शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : थकीत असलेल्या विद्युत देयकांचा वेळीच भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने माैदा तालुक्यातील ५८ पाणीपुरवठा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : थकीत असलेल्या विद्युत देयकांचा वेळीच भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने माैदा तालुक्यातील ५८ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा याेजनांतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे. धानला हे तालुक्यात महत्त्वाच्या लाेकप्रतिनिधीचे गाव असून, या गावातील पाणीपुरवठ्यासह पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

माैदा तालुक्यात एकूण १२४ गावे असून, ही सर्व गावे ६३ ग्रामपंचायत व गटग्रामपंचायत अंतर्गत विभागण्यात आली आली आहेत. या सर्व गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यात ६३ पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित आहेत. काही ठिकाणी एका पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून एकापेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा केला जाताे. यातील ५८ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तालुक्यातील बहुतांश गावांमधील पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्या गावांमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, काही गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्या गावांना रात्रभर अंधारात राहावे लागत आहेत. अंधारामुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका बळावला आहे, अशी माहिती धानलासह इतर गावांमधील नागरिकांनी दिली.

........

आमदार, जि.प. सभापतीच्या गावाचा समावेश

धानला (ता. माैदा) हे आ. टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे मूळ गाव हाेय. येथील पाणीपुरवठा याेजना आणि पथदिव्यांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. २३) खंडित करण्यात आला. धानला ग्रामपंचायतकडे ६ लाख ४५ हजार रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यात सहा लाख रुपये पाणीपुरवठा याेजनेचे तर ४५ हजार रुपयांचे पथदिव्यांचे वीजबिल असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

...

तहसील कार्यालयासह माैदा शहर अंधारात

माैदा तहसील कार्यालयाकडे दाेन लाख रुपयांचे बिल थकीत असल्याने या कार्यालयाचा वीजपुरवठा बुधवारी दुपारी खंडित करण्यात आला हाेता. प्रशासनाने सायंकाळी यातील ५० हजार रुपयांचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे कार्यालयीन कामे दिवसभर ठप्प झाली हाेती. माैदा नगरपंचायतकडे १९ लाख रुपये पाणीपुरवठ्याचे व पथदिव्यांचे ६० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या दाेहाेचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने माैदावासीयांना एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे रात्रीच्यावेळी अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे.

...

जिल्हा परिषदेने जबाबदारी झटकली

पूर्वी सर्व गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांची बिले जिल्हा परिषद प्रशासन भरायचे. भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात सन २०१६ पासून जिल्हा परिषदेने ही बिले भरणे बंद केले. त्यामुळे थकीत बिलांचा आकडा फुगत गेला. त्यातच जिल्हा परिषद प्रशासनाने ही बिले ग्रामपंचायत प्रशासनाने भरावी असा निर्णय घेतला. ग्रामपंचायत प्रशासनाने उत्पन्न लक्षात घेता, त्यांना ही बिले पुढील किमान १० वर्षे तरी भरणे शक्य नाही. युती शासनाच्या काळातील या चुकांचे परिणाम आता ग्रामीण भागातील जनतेला साेसावे लागत आहे.

...

स्थानिक स्वराज्य संस्थांना थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी वेळावेळी नाेटीस देण्यात आल्या. काही प्रमाणात का हाेईना, थकीत बिलाचा भरणा करावा, अशी सूचनाही त्यांना दिली. त्यांनी ही सूचना गांभीर्याने न घेतल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागली.

- रुपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता,

महावितरण कंपनी, माैदा.