शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : थकीत असलेल्या विद्युत देयकांचा वेळीच भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने माैदा तालुक्यातील ५८ पाणीपुरवठा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : थकीत असलेल्या विद्युत देयकांचा वेळीच भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने माैदा तालुक्यातील ५८ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा याेजनांतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे. धानला हे तालुक्यात महत्त्वाच्या लाेकप्रतिनिधीचे गाव असून, या गावातील पाणीपुरवठ्यासह पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

माैदा तालुक्यात एकूण १२४ गावे असून, ही सर्व गावे ६३ ग्रामपंचायत व गटग्रामपंचायत अंतर्गत विभागण्यात आली आली आहेत. या सर्व गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यात ६३ पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित आहेत. काही ठिकाणी एका पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून एकापेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा केला जाताे. यातील ५८ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तालुक्यातील बहुतांश गावांमधील पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्या गावांमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, काही गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्या गावांना रात्रभर अंधारात राहावे लागत आहेत. अंधारामुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका बळावला आहे, अशी माहिती धानलासह इतर गावांमधील नागरिकांनी दिली.

........

आमदार, जि.प. सभापतीच्या गावाचा समावेश

धानला (ता. माैदा) हे आ. टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे मूळ गाव हाेय. येथील पाणीपुरवठा याेजना आणि पथदिव्यांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. २३) खंडित करण्यात आला. धानला ग्रामपंचायतकडे ६ लाख ४५ हजार रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यात सहा लाख रुपये पाणीपुरवठा याेजनेचे तर ४५ हजार रुपयांचे पथदिव्यांचे वीजबिल असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

...

तहसील कार्यालयासह माैदा शहर अंधारात

माैदा तहसील कार्यालयाकडे दाेन लाख रुपयांचे बिल थकीत असल्याने या कार्यालयाचा वीजपुरवठा बुधवारी दुपारी खंडित करण्यात आला हाेता. प्रशासनाने सायंकाळी यातील ५० हजार रुपयांचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे कार्यालयीन कामे दिवसभर ठप्प झाली हाेती. माैदा नगरपंचायतकडे १९ लाख रुपये पाणीपुरवठ्याचे व पथदिव्यांचे ६० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या दाेहाेचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने माैदावासीयांना एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे रात्रीच्यावेळी अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे.

...

जिल्हा परिषदेने जबाबदारी झटकली

पूर्वी सर्व गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांची बिले जिल्हा परिषद प्रशासन भरायचे. भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात सन २०१६ पासून जिल्हा परिषदेने ही बिले भरणे बंद केले. त्यामुळे थकीत बिलांचा आकडा फुगत गेला. त्यातच जिल्हा परिषद प्रशासनाने ही बिले ग्रामपंचायत प्रशासनाने भरावी असा निर्णय घेतला. ग्रामपंचायत प्रशासनाने उत्पन्न लक्षात घेता, त्यांना ही बिले पुढील किमान १० वर्षे तरी भरणे शक्य नाही. युती शासनाच्या काळातील या चुकांचे परिणाम आता ग्रामीण भागातील जनतेला साेसावे लागत आहे.

...

स्थानिक स्वराज्य संस्थांना थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी वेळावेळी नाेटीस देण्यात आल्या. काही प्रमाणात का हाेईना, थकीत बिलाचा भरणा करावा, अशी सूचनाही त्यांना दिली. त्यांनी ही सूचना गांभीर्याने न घेतल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागली.

- रुपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता,

महावितरण कंपनी, माैदा.