शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : थकीत असलेल्या विद्युत देयकांचा वेळीच भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने माैदा तालुक्यातील ५८ पाणीपुरवठा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : थकीत असलेल्या विद्युत देयकांचा वेळीच भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने माैदा तालुक्यातील ५८ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा याेजनांतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे. धानला हे तालुक्यात महत्त्वाच्या लाेकप्रतिनिधीचे गाव असून, या गावातील पाणीपुरवठ्यासह पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

माैदा तालुक्यात एकूण १२४ गावे असून, ही सर्व गावे ६३ ग्रामपंचायत व गटग्रामपंचायत अंतर्गत विभागण्यात आली आली आहेत. या सर्व गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यात ६३ पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित आहेत. काही ठिकाणी एका पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून एकापेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा केला जाताे. यातील ५८ पाणीपुरवठा याेजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तालुक्यातील बहुतांश गावांमधील पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्या गावांमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, काही गावांमधील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्या गावांना रात्रभर अंधारात राहावे लागत आहेत. अंधारामुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका बळावला आहे, अशी माहिती धानलासह इतर गावांमधील नागरिकांनी दिली.

........

आमदार, जि.प. सभापतीच्या गावाचा समावेश

धानला (ता. माैदा) हे आ. टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे मूळ गाव हाेय. येथील पाणीपुरवठा याेजना आणि पथदिव्यांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. २३) खंडित करण्यात आला. धानला ग्रामपंचायतकडे ६ लाख ४५ हजार रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. यात सहा लाख रुपये पाणीपुरवठा याेजनेचे तर ४५ हजार रुपयांचे पथदिव्यांचे वीजबिल असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

...

तहसील कार्यालयासह माैदा शहर अंधारात

माैदा तहसील कार्यालयाकडे दाेन लाख रुपयांचे बिल थकीत असल्याने या कार्यालयाचा वीजपुरवठा बुधवारी दुपारी खंडित करण्यात आला हाेता. प्रशासनाने सायंकाळी यातील ५० हजार रुपयांचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे कार्यालयीन कामे दिवसभर ठप्प झाली हाेती. माैदा नगरपंचायतकडे १९ लाख रुपये पाणीपुरवठ्याचे व पथदिव्यांचे ६० लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या दाेहाेचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने माैदावासीयांना एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे रात्रीच्यावेळी अंधाराचा सामना करण्याची वेळ आली आहे.

...

जिल्हा परिषदेने जबाबदारी झटकली

पूर्वी सर्व गावांमधील पाणीपुरवठा याेजना व पथदिव्यांची बिले जिल्हा परिषद प्रशासन भरायचे. भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात सन २०१६ पासून जिल्हा परिषदेने ही बिले भरणे बंद केले. त्यामुळे थकीत बिलांचा आकडा फुगत गेला. त्यातच जिल्हा परिषद प्रशासनाने ही बिले ग्रामपंचायत प्रशासनाने भरावी असा निर्णय घेतला. ग्रामपंचायत प्रशासनाने उत्पन्न लक्षात घेता, त्यांना ही बिले पुढील किमान १० वर्षे तरी भरणे शक्य नाही. युती शासनाच्या काळातील या चुकांचे परिणाम आता ग्रामीण भागातील जनतेला साेसावे लागत आहे.

...

स्थानिक स्वराज्य संस्थांना थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी वेळावेळी नाेटीस देण्यात आल्या. काही प्रमाणात का हाेईना, थकीत बिलाचा भरणा करावा, अशी सूचनाही त्यांना दिली. त्यांनी ही सूचना गांभीर्याने न घेतल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागली.

- रुपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता,

महावितरण कंपनी, माैदा.