शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

बाेरगाव परिसरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : महावितरण कंपनीच्या बाेरगाव (ता. माैदा) फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : महावितरण कंपनीच्या बाेरगाव (ता. माैदा) फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव ही नित्याची बाब झाली आहे. या गावांमध्ये नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागते. गरमीमुळे घरातील लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना त्रास हाेत असल्याने ही समस्या साेडविण्याची मागणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, कुणीही दखल घेतली नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.

बाेरगाव फिडर अंतर्गत माैदा तालुक्यातील धानला, चिचाेली, बाेरगाव, मांगली (तेली), चारभा, पिपरी, खंडाळा, वीरशी, रेवराल व सुंदरगाव या गावांचा समावेश असून, या सर्व गावांमध्ये मागील २० दिवसापासून विजेच्या सततच्या लपंडावाची समस्या असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हवा जाेरात वाहायला सुरुवात झाल्यास किंवा पावसाची हलकी सर काेसळल्यास या गावांमधील वीजपुरवठा लगेच खंडित हाेताे. ताे पूर्ववत करण्यासाठी लाईनमन अथवा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी फाेनवर संपर्क साधल्यास ते कधीच प्रतिसाद देत नाहीत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागते.

दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांना रात्रभर गरमीत झाेपावे लागते. गरमीमुळे लहान मुलांना झाेप येत नसल्याने आई अथवा आजीला त्यांना पदराने हवा घालावी लागते, शिवाय डासांचा त्रासही सहन करावा लागताे. त्यामुळे त्यांना मलेरिया व तत्सम आजार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, ही समस्या नेमकी का उद्भवते याचा शाेध घेत ती साेडविण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी तसदी घेत नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ते या समस्येकडे गांभीर्याने बघत नाहीत.

काेराेना संक्रमण काळात नागरिकांच्या आराेग्याचा विचार करता, ही समस्या तातडीने साेडवावी, अशी मागणी रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर, वीरशीचे सरपंच किसना करडभाजने, पिपरीचे उपसरपंच चक्रधर गभणे, मांगलीच्या सरपंच अनसूया खंडारे, धानल्याच्या सरपंच वनिता वैद्य, मांगलीचे माजी सरपंच रवींद्र फटिंग, प्रकाश तातेने यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

अवाजवी बिले

महावितरण कंपनीच्यावतीने विजेची बिले नियमित पाठविली जात असून, ती वसूलही केली जातात. बिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा तातडीने खंडित केला जाताे. तुलनेत महावितरण कंपनी ग्राहकांना काेणतीही प्रभावी सेवा देत नाही. उलट अवाजवी बिलांची आकारणी करून ती बिले वसूल केली जात असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. विजेच्या लपंडावाची समस्या आपण महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अविनाश तांडेकर यांना सांगितली असता, नेहमीच वीजपुरवठा खंडित हाेण्याचे कारण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याची माहिती या भागातील सरपंचांनी दिली.

...

बाेरगाव फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमधील वीजपुरवठा काही कारणांमुळे खंडित हाेताे. याचे कारण शाेधून ते दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा नियमित सुरू राहिल.

रुपेश टेंभुर्णे, उपविभागीय अभियंता,

महावितरण कंपनी, माैदा.