शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

बाेरगाव परिसरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : महावितरण कंपनीच्या बाेरगाव (ता. माैदा) फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : महावितरण कंपनीच्या बाेरगाव (ता. माैदा) फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव ही नित्याची बाब झाली आहे. या गावांमध्ये नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागते. गरमीमुळे घरातील लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना त्रास हाेत असल्याने ही समस्या साेडविण्याची मागणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, कुणीही दखल घेतली नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.

बाेरगाव फिडर अंतर्गत माैदा तालुक्यातील धानला, चिचाेली, बाेरगाव, मांगली (तेली), चारभा, पिपरी, खंडाळा, वीरशी, रेवराल व सुंदरगाव या गावांचा समावेश असून, या सर्व गावांमध्ये मागील २० दिवसापासून विजेच्या सततच्या लपंडावाची समस्या असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हवा जाेरात वाहायला सुरुवात झाल्यास किंवा पावसाची हलकी सर काेसळल्यास या गावांमधील वीजपुरवठा लगेच खंडित हाेताे. ताे पूर्ववत करण्यासाठी लाईनमन अथवा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी फाेनवर संपर्क साधल्यास ते कधीच प्रतिसाद देत नाहीत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागते.

दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांना रात्रभर गरमीत झाेपावे लागते. गरमीमुळे लहान मुलांना झाेप येत नसल्याने आई अथवा आजीला त्यांना पदराने हवा घालावी लागते, शिवाय डासांचा त्रासही सहन करावा लागताे. त्यामुळे त्यांना मलेरिया व तत्सम आजार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, ही समस्या नेमकी का उद्भवते याचा शाेध घेत ती साेडविण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी तसदी घेत नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ते या समस्येकडे गांभीर्याने बघत नाहीत.

काेराेना संक्रमण काळात नागरिकांच्या आराेग्याचा विचार करता, ही समस्या तातडीने साेडवावी, अशी मागणी रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर, वीरशीचे सरपंच किसना करडभाजने, पिपरीचे उपसरपंच चक्रधर गभणे, मांगलीच्या सरपंच अनसूया खंडारे, धानल्याच्या सरपंच वनिता वैद्य, मांगलीचे माजी सरपंच रवींद्र फटिंग, प्रकाश तातेने यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

अवाजवी बिले

महावितरण कंपनीच्यावतीने विजेची बिले नियमित पाठविली जात असून, ती वसूलही केली जातात. बिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा तातडीने खंडित केला जाताे. तुलनेत महावितरण कंपनी ग्राहकांना काेणतीही प्रभावी सेवा देत नाही. उलट अवाजवी बिलांची आकारणी करून ती बिले वसूल केली जात असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. विजेच्या लपंडावाची समस्या आपण महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अविनाश तांडेकर यांना सांगितली असता, नेहमीच वीजपुरवठा खंडित हाेण्याचे कारण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याची माहिती या भागातील सरपंचांनी दिली.

...

बाेरगाव फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमधील वीजपुरवठा काही कारणांमुळे खंडित हाेताे. याचे कारण शाेधून ते दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा नियमित सुरू राहिल.

रुपेश टेंभुर्णे, उपविभागीय अभियंता,

महावितरण कंपनी, माैदा.