शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बाेरगाव परिसरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : महावितरण कंपनीच्या बाेरगाव (ता. माैदा) फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : महावितरण कंपनीच्या बाेरगाव (ता. माैदा) फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मागील काही दिवसापासून विजेचा लपंडाव ही नित्याची बाब झाली आहे. या गावांमध्ये नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागते. गरमीमुळे घरातील लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना त्रास हाेत असल्याने ही समस्या साेडविण्याची मागणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, कुणीही दखल घेतली नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.

बाेरगाव फिडर अंतर्गत माैदा तालुक्यातील धानला, चिचाेली, बाेरगाव, मांगली (तेली), चारभा, पिपरी, खंडाळा, वीरशी, रेवराल व सुंदरगाव या गावांचा समावेश असून, या सर्व गावांमध्ये मागील २० दिवसापासून विजेच्या सततच्या लपंडावाची समस्या असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हवा जाेरात वाहायला सुरुवात झाल्यास किंवा पावसाची हलकी सर काेसळल्यास या गावांमधील वीजपुरवठा लगेच खंडित हाेताे. ताे पूर्ववत करण्यासाठी लाईनमन अथवा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी फाेनवर संपर्क साधल्यास ते कधीच प्रतिसाद देत नाहीत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागते.

दिवसभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांना रात्रभर गरमीत झाेपावे लागते. गरमीमुळे लहान मुलांना झाेप येत नसल्याने आई अथवा आजीला त्यांना पदराने हवा घालावी लागते, शिवाय डासांचा त्रासही सहन करावा लागताे. त्यामुळे त्यांना मलेरिया व तत्सम आजार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, ही समस्या नेमकी का उद्भवते याचा शाेध घेत ती साेडविण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी तसदी घेत नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ते या समस्येकडे गांभीर्याने बघत नाहीत.

काेराेना संक्रमण काळात नागरिकांच्या आराेग्याचा विचार करता, ही समस्या तातडीने साेडवावी, अशी मागणी रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर, वीरशीचे सरपंच किसना करडभाजने, पिपरीचे उपसरपंच चक्रधर गभणे, मांगलीच्या सरपंच अनसूया खंडारे, धानल्याच्या सरपंच वनिता वैद्य, मांगलीचे माजी सरपंच रवींद्र फटिंग, प्रकाश तातेने यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

अवाजवी बिले

महावितरण कंपनीच्यावतीने विजेची बिले नियमित पाठविली जात असून, ती वसूलही केली जातात. बिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा तातडीने खंडित केला जाताे. तुलनेत महावितरण कंपनी ग्राहकांना काेणतीही प्रभावी सेवा देत नाही. उलट अवाजवी बिलांची आकारणी करून ती बिले वसूल केली जात असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. विजेच्या लपंडावाची समस्या आपण महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अविनाश तांडेकर यांना सांगितली असता, नेहमीच वीजपुरवठा खंडित हाेण्याचे कारण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याची माहिती या भागातील सरपंचांनी दिली.

...

बाेरगाव फिडर अंतर्गत येणाऱ्या गावांमधील वीजपुरवठा काही कारणांमुळे खंडित हाेताे. याचे कारण शाेधून ते दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा नियमित सुरू राहिल.

रुपेश टेंभुर्णे, उपविभागीय अभियंता,

महावितरण कंपनी, माैदा.