शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वीज संकट तात्पुरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:37 IST

महाराष्ट्रात विजेचे संकट निर्माण झाल्याची बाब ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी स्वत: स्वीकारली.

ठळक मुद्देऊर्जामंत्री बावनकुळे : १५ दिवसात परिस्थिती सुधारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात विजेचे संकट निर्माण झाल्याची बाब ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी स्वत: स्वीकारली. हे केवळ १५ दिवसाचे तात्पुरते वीज संकट असून नागरिकांनी आंदोलन न करता विजेची बचत करावी, असे आवाहनही केले. तसेच दिवाळीच्या पाच दिवसात भारनियमन होणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी यावेळी वीज कंपन्यांची पाठराखण करीत कोळशाच्या कमतरतेमुळे हे संकट ओढवल्याचे सांगितले. तसेच यासाठी पाऊस जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता निर्माण झाली आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात भारनियमन केले जात आहेत. महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्राची एकूण क्षमता ९९०० मेगावॉट इतकी आहे. परंतु सध्या ४९८० मेगावॉट वीज तयार होत आहे. त्याच प्रकारे अडाणी प्रकल्पातून ३ हजार मेगावॉटपैकी केवळ १७५० मेगावॉट वीज मिळत आहे. पॉवर एक्सचेंजमधून ७०० मेगावॉट वीज घेतल्यानंतरही विजेची कमतरता भरून निघत नाही. ओपन मार्केटमध्येसुद्धा वीज उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी वीज उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे. विजेच्या बचतीने ही समस्या थोडी कमी होऊ शकते. नागरिकांनी आंदोलनाऐवजी वीज वाचवण्यावर अधिक भर द्यावा, दोन पंख्याऐवजी केवळ एकच पंखा वापरावा. एसीचा उपयोगही कमी करावा. स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा योजना व सरकारी कार्यालयात कमीत कमी विजेचा वापर करावा. पत्रपरिषदेला आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महावितरणचे नागपूरचे मुख्य अभियंता शेख उपस्थित होते.पीयूष गोयल यांच्याशी चर्चाऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, विजेच्या कमतरतेबाबत शनिवारी मुंबईत कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा कोळसा मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. स्वत: त्यांनी वेकोलिशी चर्चा करून रॅक वाढवून घेण्यास यश मिळविले. पुलिंग योजनेंंतर्गत खासगी केंद्राला महाजेनकोचा कोळसा देण्याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. रस्ते मार्गाने कोळसा वाहतुकीवर भर दिला जात आहे. वीज केंद्रांपर्यंत पाईप कन्व्हेयर बेल्ट लावून खाणीमधून कोळसा थेट वीज केंद्रापर्यंत आणण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.