शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
3
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
4
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
5
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
6
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
7
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
8
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
9
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
10
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
11
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
12
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
13
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
14
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
15
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
16
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
17
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
18
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
19
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
20
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!

खासगी शाळांत शिक्षकांची पदभरती आरक्षणानुसारच

By admin | Updated: May 5, 2017 02:44 IST

खासगी शाळांमध्ये शिक्षक, कर्मचारी भरतीच्या नियमावलीत राज्य शासनातर्फे सुधारणा करण्यात आली असून

राज्य शासनातर्फे अधिनियम जारी : बिंदुनामावलीचे पालन शाळा व्यवस्थापनांना बंधनकारक नागपूर : खासगी शाळांमध्ये शिक्षक, कर्मचारी भरतीच्या नियमावलीत राज्य शासनातर्फे सुधारणा करण्यात आली असून आता नवीन अधिनियम जारी करण्यात आले आहे. यानुसार खासगी शाळांमध्ये शिक्षक, कर्मचाऱ्यांची भरती आरक्षणानुसारच होणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्रांतील पात्र उमेदवारांनादेखील वाढीव आरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात ५७ वर्षांनंतर मागासवर्गीयांना न्याय मिळाला असून कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने हा विषय सातत्याने लावून धरला होता. १९६० मध्ये राज्य शासनाने खासगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती जारी केल्या होत्या. त्यानंतर १९७७ साली महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी विनियमन अधिनियम जारी करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने २००४ मध्ये अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गासाठी शिक्षण व शासकीय सेवेतील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला. या कायद्यात प्रवर्गनिहाय आरक्षणाची टक्केवारी निश्चित केली होती. मात्र अनेक खासगी शाळांमध्ये शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया चालत होती. यातील ‘रोस्टर’मुळे आरक्षित गटांवर अन्याय होत होता. शिवाय प्रत्येक शाळेतच आरक्षण दिले जाईल, याची शाश्वती नव्हती. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने याबाबत वारंवार आवाज उठविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतदेखील त्यांची चर्चा झाली. यानंतर शालेय शिक्षण विभागाने कायद्यात बदल करण्याचे ठरविले. १५ मार्च रोजी यासंदर्भातील राजपत्र जारी करण्यात आले. यानुसार खासगी शाळांतील कर्मचारी नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार शासनाने जिल्हानिहाय पदांची बिंदुनामावली दिली असून त्याचे अनुसरण करणे शाळांना अनिवार्य ठरणार आहे. यात सरळसेवा भरती, नामनिर्देशन व पदोन्नतीच्या पदांचा समावेश आहे. सोबतच ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांतील अनुसूचित क्षेत्रातील शिक्षकांची पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येणार आहेत. सोबतच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा भरतीतील आदिवासींचे आरक्षण वाढविण्यात आले आहे.(प्रतिनिधी) लाखो शिक्षकांना फायदा : इंगळे यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या सुधारणांचे स्वागत केले आहे. अगोदर शासन निर्णयानुसार बिंदुनामावली ठरविण्यात येत होती. यामुळे आपापल्या सोयींनुसार खासगी शाळांत भरती व्हायची व आरक्षणाला बगल देण्यात यायची. विशेषत: आदिवासीबहुल जिल्ह्यांत तर अन्यायच व्हायचा. मुख्यमंत्र्यांनी यात पुढाकार घेतल्यामुळे आमच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश मिळाले आहे. ५७ वर्षांपासून याबाबत विविध माध्यमातून आवाज उठविण्यात आला व आता याचा लाखो शिक्षकांना भरती व पदोन्नती प्रक्रियेत फायदा मिळेल असे मत इंगळे यांनी व्यक्त केले.