शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

खासगी शाळांत शिक्षकांची पदभरती आरक्षणानुसारच

By admin | Updated: May 5, 2017 02:44 IST

खासगी शाळांमध्ये शिक्षक, कर्मचारी भरतीच्या नियमावलीत राज्य शासनातर्फे सुधारणा करण्यात आली असून

राज्य शासनातर्फे अधिनियम जारी : बिंदुनामावलीचे पालन शाळा व्यवस्थापनांना बंधनकारक नागपूर : खासगी शाळांमध्ये शिक्षक, कर्मचारी भरतीच्या नियमावलीत राज्य शासनातर्फे सुधारणा करण्यात आली असून आता नवीन अधिनियम जारी करण्यात आले आहे. यानुसार खासगी शाळांमध्ये शिक्षक, कर्मचाऱ्यांची भरती आरक्षणानुसारच होणार आहे. तसेच आदिवासी क्षेत्रांतील पात्र उमेदवारांनादेखील वाढीव आरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात ५७ वर्षांनंतर मागासवर्गीयांना न्याय मिळाला असून कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने हा विषय सातत्याने लावून धरला होता. १९६० मध्ये राज्य शासनाने खासगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती जारी केल्या होत्या. त्यानंतर १९७७ साली महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी विनियमन अधिनियम जारी करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने २००४ मध्ये अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गासाठी शिक्षण व शासकीय सेवेतील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला. या कायद्यात प्रवर्गनिहाय आरक्षणाची टक्केवारी निश्चित केली होती. मात्र अनेक खासगी शाळांमध्ये शासन निर्णयानुसार भरती प्रक्रिया चालत होती. यातील ‘रोस्टर’मुळे आरक्षित गटांवर अन्याय होत होता. शिवाय प्रत्येक शाळेतच आरक्षण दिले जाईल, याची शाश्वती नव्हती. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने याबाबत वारंवार आवाज उठविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतदेखील त्यांची चर्चा झाली. यानंतर शालेय शिक्षण विभागाने कायद्यात बदल करण्याचे ठरविले. १५ मार्च रोजी यासंदर्भातील राजपत्र जारी करण्यात आले. यानुसार खासगी शाळांतील कर्मचारी नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार शासनाने जिल्हानिहाय पदांची बिंदुनामावली दिली असून त्याचे अनुसरण करणे शाळांना अनिवार्य ठरणार आहे. यात सरळसेवा भरती, नामनिर्देशन व पदोन्नतीच्या पदांचा समावेश आहे. सोबतच ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांतील अनुसूचित क्षेत्रातील शिक्षकांची पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येणार आहेत. सोबतच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा भरतीतील आदिवासींचे आरक्षण वाढविण्यात आले आहे.(प्रतिनिधी) लाखो शिक्षकांना फायदा : इंगळे यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या सुधारणांचे स्वागत केले आहे. अगोदर शासन निर्णयानुसार बिंदुनामावली ठरविण्यात येत होती. यामुळे आपापल्या सोयींनुसार खासगी शाळांत भरती व्हायची व आरक्षणाला बगल देण्यात यायची. विशेषत: आदिवासीबहुल जिल्ह्यांत तर अन्यायच व्हायचा. मुख्यमंत्र्यांनी यात पुढाकार घेतल्यामुळे आमच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश मिळाले आहे. ५७ वर्षांपासून याबाबत विविध माध्यमातून आवाज उठविण्यात आला व आता याचा लाखो शिक्षकांना भरती व पदोन्नती प्रक्रियेत फायदा मिळेल असे मत इंगळे यांनी व्यक्त केले.