शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
3
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
4
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
7
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
8
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
9
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
10
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
11
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
12
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
13
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
14
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
15
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
16
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
17
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
18
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
19
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
20
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या भूमिकेमुळे मध्यावधीची शक्यता

By admin | Updated: June 10, 2017 03:01 IST

राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे.

विनायक मेटे : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे. मात्र, संधी मिळेल तेव्हा सरकारचा विरोध करीत आहे. सरकारमध्ये राहून आंदोलन करीत आहे. शिवसेनेची ही भूमिका पाहता राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वाटते, असे मत शिवसंग्रामचे संस्थापक व भारतीय संग्राम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. शिवसंग्रामप्रणित भारतीय संग्राम परिषदेचा मेळावा व पदग्रहण सोहळा शुक्रवारी देशपांडे सभागृहात पार पडला. या वेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, भारतीय संग्राम परिषदेचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते, उदय टेकाडे, राजेश कडू आदी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला. या वेळी मेळाव्यात व नंतर पत्रकारांशी बोलताना मेटे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, असे आपले मत आहे. मात्र त्यासाठी शेतकरी व सरकारमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. नोकरदारांना ज्या प्रमाणे निवृत्ती वेतन मिळते, त्याच धर्तीवर ६० वर्र्षांंवरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा एक हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचा विमा काढून त्याचे प्रीमिअम स्वत: भरावे, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसंग्रामतर्फे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका लढविल्या जातील. भाजपाने होकार दिला तर सोबत लढू, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. गडकरी- फडणवीसांना वेळ द्या कर्जमाफीच्या मुद्यावरून काही लोक मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. सत्तेत असलेल्या राजू शेट्टींचे इशारे देणे सुरू आहे. पण मुख्यमंत्री त्यातून बाहेर पडत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर निश्चितच त्याचा विकास कामांवर परिणाम होणार आहे. असे असतानाही मुख्यमंत्री कर्जमाफीसाठी लागणाऱ्या रकमेची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास होत असून त्यांना वेळ दिला तर ते येथील चित्र निश्चितच बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्तेसाठी छत्रपतींचा वापर : सुबोध मोहिते सत्ता हवी असली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जातो. सत्ता येताच जातीपातीचे राजकारण केले जाते, अशी टीका सुबोध मोहिते यांनी सरकारवर केली. आपला शेतकरी प्रामाणिक, मेहनती व संयमी आहे. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याच्यावर संपावर जाण्याची वेळ आली, असा आरोप करीत त्यांनी सरकारवर हल्ला चढविला. अरविंद केजरीवाल, चंद्रशेखर राव हे स्वबळावर पक्ष उभारू शकतात तर शिवसंग्राम का नाही, असे सांगत येत्या चार महिन्यात गाव तेथे शिवसंग्राम दिसेल, असा दावा त्यांनी केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देश हालवून सोडला होता. मात्र, त्यांचा कुणीतरी वापर केला, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. मराठा आरक्षण कोर्टाच्या निकालावर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. उच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय अवलंबून आहे. कोपर्डीच्या मुद्यावर मराठा एकत्र आले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निघालेले मराठ्यांचे मोर्चे नेतृत्वहीन असल्याने आरक्षणाचा निर्णय होऊ शकला नाही, असेही ते म्हणाले.