शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

शिवसेनेच्या भूमिकेमुळे मध्यावधीची शक्यता

By admin | Updated: June 10, 2017 03:01 IST

राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे.

विनायक मेटे : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे. मात्र, संधी मिळेल तेव्हा सरकारचा विरोध करीत आहे. सरकारमध्ये राहून आंदोलन करीत आहे. शिवसेनेची ही भूमिका पाहता राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वाटते, असे मत शिवसंग्रामचे संस्थापक व भारतीय संग्राम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. शिवसंग्रामप्रणित भारतीय संग्राम परिषदेचा मेळावा व पदग्रहण सोहळा शुक्रवारी देशपांडे सभागृहात पार पडला. या वेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, भारतीय संग्राम परिषदेचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते, उदय टेकाडे, राजेश कडू आदी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला. या वेळी मेळाव्यात व नंतर पत्रकारांशी बोलताना मेटे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, असे आपले मत आहे. मात्र त्यासाठी शेतकरी व सरकारमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. नोकरदारांना ज्या प्रमाणे निवृत्ती वेतन मिळते, त्याच धर्तीवर ६० वर्र्षांंवरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा एक हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचा विमा काढून त्याचे प्रीमिअम स्वत: भरावे, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसंग्रामतर्फे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका लढविल्या जातील. भाजपाने होकार दिला तर सोबत लढू, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. गडकरी- फडणवीसांना वेळ द्या कर्जमाफीच्या मुद्यावरून काही लोक मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. सत्तेत असलेल्या राजू शेट्टींचे इशारे देणे सुरू आहे. पण मुख्यमंत्री त्यातून बाहेर पडत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर निश्चितच त्याचा विकास कामांवर परिणाम होणार आहे. असे असतानाही मुख्यमंत्री कर्जमाफीसाठी लागणाऱ्या रकमेची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास होत असून त्यांना वेळ दिला तर ते येथील चित्र निश्चितच बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्तेसाठी छत्रपतींचा वापर : सुबोध मोहिते सत्ता हवी असली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जातो. सत्ता येताच जातीपातीचे राजकारण केले जाते, अशी टीका सुबोध मोहिते यांनी सरकारवर केली. आपला शेतकरी प्रामाणिक, मेहनती व संयमी आहे. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याच्यावर संपावर जाण्याची वेळ आली, असा आरोप करीत त्यांनी सरकारवर हल्ला चढविला. अरविंद केजरीवाल, चंद्रशेखर राव हे स्वबळावर पक्ष उभारू शकतात तर शिवसंग्राम का नाही, असे सांगत येत्या चार महिन्यात गाव तेथे शिवसंग्राम दिसेल, असा दावा त्यांनी केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देश हालवून सोडला होता. मात्र, त्यांचा कुणीतरी वापर केला, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. मराठा आरक्षण कोर्टाच्या निकालावर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. उच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय अवलंबून आहे. कोपर्डीच्या मुद्यावर मराठा एकत्र आले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निघालेले मराठ्यांचे मोर्चे नेतृत्वहीन असल्याने आरक्षणाचा निर्णय होऊ शकला नाही, असेही ते म्हणाले.