शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या भूमिकेमुळे मध्यावधीची शक्यता

By admin | Updated: June 10, 2017 03:01 IST

राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे.

विनायक मेटे : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे. मात्र, संधी मिळेल तेव्हा सरकारचा विरोध करीत आहे. सरकारमध्ये राहून आंदोलन करीत आहे. शिवसेनेची ही भूमिका पाहता राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वाटते, असे मत शिवसंग्रामचे संस्थापक व भारतीय संग्राम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. शिवसंग्रामप्रणित भारतीय संग्राम परिषदेचा मेळावा व पदग्रहण सोहळा शुक्रवारी देशपांडे सभागृहात पार पडला. या वेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, भारतीय संग्राम परिषदेचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते, उदय टेकाडे, राजेश कडू आदी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला. या वेळी मेळाव्यात व नंतर पत्रकारांशी बोलताना मेटे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, असे आपले मत आहे. मात्र त्यासाठी शेतकरी व सरकारमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. नोकरदारांना ज्या प्रमाणे निवृत्ती वेतन मिळते, त्याच धर्तीवर ६० वर्र्षांंवरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा एक हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचा विमा काढून त्याचे प्रीमिअम स्वत: भरावे, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसंग्रामतर्फे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका लढविल्या जातील. भाजपाने होकार दिला तर सोबत लढू, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. गडकरी- फडणवीसांना वेळ द्या कर्जमाफीच्या मुद्यावरून काही लोक मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. सत्तेत असलेल्या राजू शेट्टींचे इशारे देणे सुरू आहे. पण मुख्यमंत्री त्यातून बाहेर पडत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर निश्चितच त्याचा विकास कामांवर परिणाम होणार आहे. असे असतानाही मुख्यमंत्री कर्जमाफीसाठी लागणाऱ्या रकमेची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास होत असून त्यांना वेळ दिला तर ते येथील चित्र निश्चितच बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्तेसाठी छत्रपतींचा वापर : सुबोध मोहिते सत्ता हवी असली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जातो. सत्ता येताच जातीपातीचे राजकारण केले जाते, अशी टीका सुबोध मोहिते यांनी सरकारवर केली. आपला शेतकरी प्रामाणिक, मेहनती व संयमी आहे. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याच्यावर संपावर जाण्याची वेळ आली, असा आरोप करीत त्यांनी सरकारवर हल्ला चढविला. अरविंद केजरीवाल, चंद्रशेखर राव हे स्वबळावर पक्ष उभारू शकतात तर शिवसंग्राम का नाही, असे सांगत येत्या चार महिन्यात गाव तेथे शिवसंग्राम दिसेल, असा दावा त्यांनी केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देश हालवून सोडला होता. मात्र, त्यांचा कुणीतरी वापर केला, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. मराठा आरक्षण कोर्टाच्या निकालावर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. उच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय अवलंबून आहे. कोपर्डीच्या मुद्यावर मराठा एकत्र आले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निघालेले मराठ्यांचे मोर्चे नेतृत्वहीन असल्याने आरक्षणाचा निर्णय होऊ शकला नाही, असेही ते म्हणाले.