शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

शिवसेनेच्या भूमिकेमुळे मध्यावधीची शक्यता

By admin | Updated: June 10, 2017 03:01 IST

राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे.

विनायक मेटे : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यभरात शेतकरी आंदोलनाचे लोण पेटले आहे. या मुद्यावरून आता सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहे. शिवसेना सत्तेत भागीदार आहे. मात्र, संधी मिळेल तेव्हा सरकारचा विरोध करीत आहे. सरकारमध्ये राहून आंदोलन करीत आहे. शिवसेनेची ही भूमिका पाहता राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वाटते, असे मत शिवसंग्रामचे संस्थापक व भारतीय संग्राम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी व्यक्त केले. शिवसंग्रामप्रणित भारतीय संग्राम परिषदेचा मेळावा व पदग्रहण सोहळा शुक्रवारी देशपांडे सभागृहात पार पडला. या वेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, भारतीय संग्राम परिषदेचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते, उदय टेकाडे, राजेश कडू आदी उपस्थित होते. यावेळी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला. या वेळी मेळाव्यात व नंतर पत्रकारांशी बोलताना मेटे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, असे आपले मत आहे. मात्र त्यासाठी शेतकरी व सरकारमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. नोकरदारांना ज्या प्रमाणे निवृत्ती वेतन मिळते, त्याच धर्तीवर ६० वर्र्षांंवरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा एक हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचा विमा काढून त्याचे प्रीमिअम स्वत: भरावे, अशी मागणीही त्यांनी केली. शिवसंग्रामतर्फे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका लढविल्या जातील. भाजपाने होकार दिला तर सोबत लढू, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. गडकरी- फडणवीसांना वेळ द्या कर्जमाफीच्या मुद्यावरून काही लोक मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. सत्तेत असलेल्या राजू शेट्टींचे इशारे देणे सुरू आहे. पण मुख्यमंत्री त्यातून बाहेर पडत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर निश्चितच त्याचा विकास कामांवर परिणाम होणार आहे. असे असतानाही मुख्यमंत्री कर्जमाफीसाठी लागणाऱ्या रकमेची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास होत असून त्यांना वेळ दिला तर ते येथील चित्र निश्चितच बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्तेसाठी छत्रपतींचा वापर : सुबोध मोहिते सत्ता हवी असली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जातो. सत्ता येताच जातीपातीचे राजकारण केले जाते, अशी टीका सुबोध मोहिते यांनी सरकारवर केली. आपला शेतकरी प्रामाणिक, मेहनती व संयमी आहे. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याच्यावर संपावर जाण्याची वेळ आली, असा आरोप करीत त्यांनी सरकारवर हल्ला चढविला. अरविंद केजरीवाल, चंद्रशेखर राव हे स्वबळावर पक्ष उभारू शकतात तर शिवसंग्राम का नाही, असे सांगत येत्या चार महिन्यात गाव तेथे शिवसंग्राम दिसेल, असा दावा त्यांनी केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देश हालवून सोडला होता. मात्र, त्यांचा कुणीतरी वापर केला, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. मराठा आरक्षण कोर्टाच्या निकालावर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. उच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय अवलंबून आहे. कोपर्डीच्या मुद्यावर मराठा एकत्र आले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निघालेले मराठ्यांचे मोर्चे नेतृत्वहीन असल्याने आरक्षणाचा निर्णय होऊ शकला नाही, असेही ते म्हणाले.