शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

गरिबांचे गहू , तांदूळ बंद

By admin | Updated: July 22, 2015 03:25 IST

अन्न सुरक्षा योजनेत समावेश न करण्यात आलेल्या केशरी कार्डधारक तब्बल पावणेदोन कोटी गरीब नागरिकांचे रेशनचे धान्य राज्य सरकारने बंद केले आहे.

लोकमत विशेषकमलेश वानखेडे नागपूरअन्न सुरक्षा योजनेत समावेश न करण्यात आलेल्या केशरी कार्डधारक तब्बल पावणेदोन कोटी गरीब नागरिकांचे रेशनचे धान्य राज्य सरकारने बंद केले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून केशरी कार्ड धारक नागरिकांना रेशन दुकानातून माफक दरात गहू, तांदूळ मिळालेले नाहीत. एकीकडे महागाई व साठेबाजीमुळे धान्याचे भाव वाढत आहेत. नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. असे असताना राज्य सरकारने आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी गरिबांचे धान्य बंद करून त्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केल्याची टीका होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. राज्यात ८ कोटी ७७ लाख लोकांना स्वस्त दरात धान्यपुरवठा केला जात होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने यापैकी ७ कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा लागू केली होती. या नागरिकांना २ रुपये किलो प्रमाणे गहू व ३ रुपये किलो प्रमाणे तांदूळ दिला जातो. उर्वरित १ कोटी ७७ लाख हे एपीएल म्हणजे केशरी कार्ड धारक आहेत. या नागरिकांची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. शासकीय त्रुटींमुळे यातील अनेकांचा बीपीएलमध्ये व अन्न सुरक्षेत समावेश होऊ शकलेला नाही. या केशरी कार्डधारक (एपीएल) पावणेदोन कोटी नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून आघाडी सरकारने ७.२० रुपये प्रती किलो दराप्रमाणे १० किलो गहू व ९.६० रुपये प्रती किलो दराप्रमाणे ५ किलो तांदुळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती. स्वस्त दरात मिळणाऱ्या या धान्यामुळे एका कुटुंबाचा महिनाभराचा धान्यावरील खर्च कमी होऊन इतर जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी तोच पैसा कामी येत होता. ही योजना राबविण्यासाठी राज्य सरकारला स्वत:च्या तिजोरीतून दरमहा १२० कोटी रुपये द्यावे लागत होते. वर्षाकाठी सुमारे १४०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकारवर पडत होता. पण पावणेदोन कोटी लोकांना स्वस्तात धान्य मिळून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटत होता.