शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वीच पोलखोल!

By admin | Updated: June 11, 2017 02:07 IST

अद्याप पावसाळा सुरू व्हायचाच आहे. मुसळधार पाऊ स बरसलेला नाही. परंतु सिमेंट रोडची कामे करताना पावसाळी नाल्या,

सिमेंट रोडच्या त्रुटी बनल्या समस्या अर्धवट व निकृष्ट काम पाणी तुंबणार; नागरिक होणार त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अद्याप पावसाळा सुरू व्हायचाच आहे. मुसळधार पाऊ स बरसलेला नाही. परंतु सिमेंट रोडची कामे करताना पावसाळी नाल्या, जुन्या नाल्या व सिवेज लाईनच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट त्या कचरा व मलब्यामुळे बुजवण्याचेच काम करण्यात आले. त्यातच अर्धवट व निकृष्ट कामामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे सिमेंट रोडवर पाणी तुंबण्याला सुरुवात झाली आहे. शनिवारी शहराच्या विविध भागात याचा प्रत्यय आला. सिमेंट रोडची उंची रोडलगतची घरे व दुकानापेक्षा अधिक ठेवण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यात आजूबाजूच्या वस्त्यात पाणी शिरणार असल्याबाबत वृत्त प्रकाशित करून लोकमतने याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु याची वेळीच दखल न घेतल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. दक्षिण नागपुरातील ईश्वरनगर-रमणा मारोती रोडचे सिमेंटीकरणाचे काम अर्धवट असल्याने शनिवारी जोराचा पाऊ स झाला नाही तरीही रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. रोडच्या सिमेंटीकरणाचे काम मध्य भागातून सुरू करण्यात आले. परंतु हा भाग समतल करण्यात आलेला नाही. यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता रोडवर तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे. ज्या भागातील रोडचे सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही तेथील भागात खोदकाम करुन अर्धवट सोडण्यात आले आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचत आहे. यातून वाहन चालविणे अवघड झाले आहे. खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. रोडवर पाणी साचल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. सुभाननगर, भारतनगरात घरात शिरले पाणी सुभाननगर, भारतनगरात भागात काही दिवसापूर्वी बनविण्यात आलेले सिमेंट रोड नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. पूर्व नागपुरात शनिवारी पाऊ स झाला. मात्र मुसळधार पाऊ स झाला नसतानाही सुभाननगर, भारतनगर येथील सिमेंट रोडलगतच्या घरात पाणी शिरले. सिमेंट रोडची कामे नागरिकांना सुविधा व्हावी. म्हणून हाती घेण्यात आलेली आहेत. परंतु हेच सिमेंट रोड नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रज्जाक पटेल यांनी व्यक्त केली. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुसळधार पावसात काय होईल ? सिमेंट रोडचे काम रोडच्या मध्य भागातून सुरू करण्यात आले आहे. रोडच्या दोन्ही टोकाकडून कामाला सुरुवात केली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनुराग राघोर्ते यांनी दिली. रोडच्या मध्येच काम सुरू केल्याने खड्डे निर्माण झालेले आहेत. यात पावसाचे पाणी साचत आहे. रोडलगतच्या घरापुढे पाणी तुंबले आहे. थोड्याशा पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली; मुसळधार पाऊ स आला तर काय होईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पादचाऱ्यांत भीती सिमेंट रोडचे काम करताना कंत्राटदाराने रोडच्या दोन्ही बाजूंना पावसाळी नाल्या व सिवेज लाईनसाटी चेंबर ठेवलेले नाही. यामुळे रोडवर पाणी साचले आहे. खोल खड्ड्यात पाणी साचल्याने यात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे पादचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंत्राटदाराच्या चुकीच्या कामामुळे निरपराध नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. याकडे स्थानिक आमदारांचेही दुर्लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.