शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

राजकीय पक्षच समाजात भेद पाडतात

By admin | Updated: July 9, 2016 03:05 IST

जाती ही विकृती आहे, त्यामुळे मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात देश भरडला जात आहे.

भय्याजी जोशी : अस्पृश्यता हा समाजातील मानसिक आजारनागपूर : जाती ही विकृती आहे, त्यामुळे मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात देश भरडला जात आहे. वर्तमानात या सामाजिक प्रश्नांना राजकीय रूप येत आहे. देशातील कुठलाही राजकीय पक्ष जाती, वर्ण व्यवस्थेला दूर करू शकत नाही. उलट राजकीय पक्षांचा स्वभाव हा समाजात भेद पाडण्याचा आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात केली. भारत मंगलम या संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त व रा.स्व.संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘सामाजिक समरसता’ या विषयावर भय्याजी जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवारी संत रविदास सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जोशी यांनी राजकीय पक्षांवर कडाडून टीका केली. राजकीय पक्ष सामाजिक प्रश्न दूर करण्याऐवजी ते टिकून कसे राहतील हाच प्रयत्न करतात. त्यामुळेच ते जातीचे गणित मांडतात. सामाजिक प्रश्न हे समाजानेच सोडवायचे आहे. राजकीय पक्षांकडून सामाजिक समरसतेची अपेक्षाच करू नये. जोशी यावेळी म्हणाले की, ईश्वर एक शक्ती आहे. मूर्तीतर तुम्हीआम्ही घडविल्या आहेत. जगाच्या कल्याणाचा जो विचार करतो तोच खरा ईश्वरनिष्ठ आहे. या ईश्वरनिष्ठ मंडळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब देवरस आहेत. कालप्रवाहात अनेक गोष्टी विसंगत होत गेल्या. तत्त्वज्ञान हे ग्रंथातच राहिले. तत्त्व आणि व्यवहारात अंतर पडले. त्यातून रुढी, परंपरा, कर्मकांड प्रस्थापित झाले. यालाच लोक धर्म समजू लागले. तत्त्वाशी विसंगत करणारा समाज होत गेला. त्यामुळे समाजात भेद निर्माण झाले. जाती, उपजाती निर्माण झाल्या आणि त्या समाजाच्या अंतर्मनात खोलवर रुजल्या. त्यातूनच अस्पृश्यता हा शब्द उदयास आला. अस्पृश्यता ही आजारासारखी समाजात पसरली. ही अस्पृश्यता, जाती व्यवस्था समाजावर लागलेला काळा डाग आहे. ते दूर करण्याचे काम समाजानेच करायचे आहे. त्यासाठी मानसिकता तयार करण्याची गरज आहे. ही जाती व्यवस्था, अस्पृश्यता संपविण्यासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजनैतिक क्षेत्रातील विषमता संपविल्या पाहिजे. सर्वांना समान विकासाच्या संधी दिल्या पाहिजे. समान संधीचा विचार करताना, जो मागे आहे, त्याला काही विशेष संधी द्यायला पाहिजे. समाजात मागे राहिलेला वर्ग एकाच रेषेत आल्यास तरच देशात सामाजिक समरसता निर्माण होईल, असे मत जोशी यांनी व्यक्त केले. समाज जीवन सुधारण्यासाठी १८०० ते १९०० या काळात देशात अनेक सुधारकांची मालिकाच उभी राहिली. परंतु या सुधारकांना जातीत विभागून टाकले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समाज पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. जाती व्यवस्थेला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. अशा व्यवस्थेवर समाज जीवन जगू शकत नाही, अशी भूमिका संघाचीआहे. व्याख्यानाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चिचोलीचे संजय पाटील, भारत मंगलमचे अध्यक्ष गिरीश हरकरे, कार्याध्यक्ष संतोष माहूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष माहूरकर यांनी केले. आभार दीपक काळी यांनी मानले. (प्रतिनिधी)