शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

पोलिसांचा अनोखा ‘मोबाईल व्हॅलेन्टाईन डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST

अलीकडे मोबाईल हा प्रत्येकाचाच ‘जिवलग’ झाला आहे. तो जवळ नसला की माणूस (स्त्री असो की पुरुष) अस्वस्थ होतो. मोबाईल ...

अलीकडे मोबाईल हा प्रत्येकाचाच ‘जिवलग’ झाला आहे. तो जवळ नसला की माणूस (स्त्री असो की पुरुष) अस्वस्थ होतो. मोबाईल हरविला किंवा चोरीला गेला तर संबंधित व्यक्तीची अवस्था शब्दातीत असते. या अवस्थेची कारणे वेगवेगळी असली तरी मोबाईलमधील महत्त्वाचा डाटा, संपर्क क्रमांक, फोटोच्या रूपातील मधुर आठवणी ही तीन समान कारणे अस्वस्थतेत दडलेली असतात. नको ती माहिती, फोटो, अथवा व्हिडिओ आणि मेसेज दुसऱ्याच्या नजरेस पडू नयेत, हेदेखील एक कारण असते. त्यामुळे मोबाईल हरविलेल्या किंवा चोरीला गेलेल्या व्यक्तीची अवस्था काही वेळेसाठी का होईना वेडापिसा झाल्यासारखी असते. लगेच त्याला त्याचा फोन मिळाला तर तो आनंदही काही औरच असतो. ते ध्यानात घेत गुन्हे शाखा सायबर ठाण्यातील पोलिसांनी १११ जणांचे मोबाईल शोधून त्यांना व्हॅलेन्टाईन पर्वावर १३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता पोलीस जिमखान्यात हजर राहण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून अनेक मोबाईलधारक आपले मोबाईल परत घेण्यासाठी हजर राहिले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, ईओडब्ल्यूचे उपायुक्त विवेक मासाळ आणि सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक बागुल यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित व्यक्तींना परत करण्यात आले.

---

गृहमंत्र्यांकडून प्रशंसा

पोलिसांच्या या उपक्रमाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशंसा केली. अशा उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये प्रेम आणि विश्वासाचे संबंध निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करणारे ट्विट देशमुख यांनी केले.

---