शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

पोलिसांचा अनोखा ‘मोबाईल व्हॅलेन्टाईन डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST

अलीकडे मोबाईल हा प्रत्येकाचाच ‘जिवलग’ झाला आहे. तो जवळ नसला की माणूस (स्त्री असो की पुरुष) अस्वस्थ होतो. मोबाईल ...

अलीकडे मोबाईल हा प्रत्येकाचाच ‘जिवलग’ झाला आहे. तो जवळ नसला की माणूस (स्त्री असो की पुरुष) अस्वस्थ होतो. मोबाईल हरविला किंवा चोरीला गेला तर संबंधित व्यक्तीची अवस्था शब्दातीत असते. या अवस्थेची कारणे वेगवेगळी असली तरी मोबाईलमधील महत्त्वाचा डाटा, संपर्क क्रमांक, फोटोच्या रूपातील मधुर आठवणी ही तीन समान कारणे अस्वस्थतेत दडलेली असतात. नको ती माहिती, फोटो, अथवा व्हिडिओ आणि मेसेज दुसऱ्याच्या नजरेस पडू नयेत, हेदेखील एक कारण असते. त्यामुळे मोबाईल हरविलेल्या किंवा चोरीला गेलेल्या व्यक्तीची अवस्था काही वेळेसाठी का होईना वेडापिसा झाल्यासारखी असते. लगेच त्याला त्याचा फोन मिळाला तर तो आनंदही काही औरच असतो. ते ध्यानात घेत गुन्हे शाखा सायबर ठाण्यातील पोलिसांनी १११ जणांचे मोबाईल शोधून त्यांना व्हॅलेन्टाईन पर्वावर १३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता पोलीस जिमखान्यात हजर राहण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून अनेक मोबाईलधारक आपले मोबाईल परत घेण्यासाठी हजर राहिले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, ईओडब्ल्यूचे उपायुक्त विवेक मासाळ आणि सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक बागुल यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित व्यक्तींना परत करण्यात आले.

---

गृहमंत्र्यांकडून प्रशंसा

पोलिसांच्या या उपक्रमाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशंसा केली. अशा उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये प्रेम आणि विश्वासाचे संबंध निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करणारे ट्विट देशमुख यांनी केले.

---