शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पोलीस वाहनेच सीटबेल्टविना

By admin | Updated: April 5, 2016 05:07 IST

वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली

सुमेध वाघमारे ल्ल नागपूरवाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच सीटबेल्टची उपयुक्तता समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी ३६ हजार १०८ चालकांवर कारवाई केली. धक्कादायक म्हणजे, कायद्याच्या पालनासाठी कारवाई करणाऱ्या पोलीस खात्यात विनासीटबेल्टची ३५ टक्के वाहने आहेत. २०००सालातील ही वाहने अद्यापही कंडम करण्यात आलेली नाहीत.सीटबेल्ट (सेफ्टीबेल्ट) १२५ केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९३ ए १ नुसार पुढील आसनाला सीटबेल्ट बसवणं वाहन उत्पादकाला कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वाहनात समोर बसलेल्या व्यक्तींसाठीच नव्हे तर गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनीही सीट बेल्ट बांधणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, अपघात झालाच तरसीटबेल्ट वापरणारी व्यक्ती तो न वापरणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत वाचण्याची शक्यता ७० टक्के जास्त असते. याचे गांभीर्य आता ओळखून वाहतूक पोलीस विभागाने सीटबेल्ट कारवाईची मोहीम हाती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यात ३६ हजार १०८ चालकांवर सीटबेल्ट नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई करणारे बहुतांश पोलीसच सीटबेल्ट लावत नसल्याचे वास्तव आहे. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल यांच्या लक्षात ही बाब आली असता त्यांनी १०० या क्रमांकावर दूरध्वनी करून पोलीस वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करीत नसल्याची तक्रार केली. यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने अनेक जुन्या वाहनांना सीटबेल्टच नसल्याची माहिती दिली. या संदर्भात ‘लोकमत’ने अधिक माहिती जाणून घेतली असता, पोलीस खात्यात २००० सालातील २०५ वाहने आहेत. ही वाहने निकामी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यातील ३५ टक्के वाहने अद्यापही रस्त्यावर धावत आहेत. परंतु या वाहनांमध्ये सीटबेल्टच नाही. परिणामी, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पोलिसांना विनासीटबेल्टमुळे आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.सीटबेल्टची गरज काय?४ कारची स्थिर वस्तूला अथवा दुसऱ्या वाहनाला धडक बसल्यानंतर अंदाजे एक दशांश सेकंदात कारची गती अचानक थांबते. ज्यांनी सीटबेल्ट लावलेला नाही ते प्रवासी जडत्वाच्या नियमानुसार कारच्या वेगाने जाऊन एखाद्या मानवी क्षेपणास्राप्रमाणे पुढील काच किंवा डॅशबोर्डवर आपटतात. गंभीर जखमी अथवा मृत्युमुखी पडतात.