शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: September 16, 2016 03:17 IST

चौकात पार्क केलेली कार हटविण्यास सांगितल्यामुळे एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

आरोपी ठाण्यातून गायब : चार दिवसांतील तिसरी घटना नागपूर : चौकात पार्क केलेली कार हटविण्यास सांगितल्यामुळे एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी सकाळी झांशी राणी चौकात घडली. गुन्हा दाखल करण्याची माहिती होताच आरोपी युवक सीताबर्डी पोलीस ठाण्यातून गायब झाला. यामुळे पोलिसांत खळबळ उडाली. तुषार वर्मा असे आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार तुषारने सकाळी ६.३५ वाजता झांशी राणी चौकातील पेट्रोल पंपाच्या ‘कॉर्नर’वर आपली कार पार्क केली होती. झांशी राणी चौकात सकाळच्या वेळी आॅटोचालक आणि अवैध प्रवासी वाहनांची मोठी गर्दी होत असते. यासंबंधात तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. घटनेच्या वेळी एपीआय अमोल चव्हाण सहकाऱ्यांसह चौकातील वाहनांना बाजूला करीत होते. शिपाई ओंकार आणि नीलेशने तुषारला सुद्धा त्याचे वाहन (कार) हटविण्यास सांगितले. परंतु तुषारने नकार देत तो पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. पोलीस कर्मचारी त्याचे चालान करून लागले असता तो असभ्य वागणुकीवर उतरला. दरम्यान अमोल नावाचा शिपाई या घटनेची मोबाईल रेकॉर्डिंग करीत होता. ते पाहून तुषारला आणखी राग आला. तो मोबाईल हिसकवण्याच्या प्रयत्नात अमोलला धक्का-बुक्की करू लागला. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना पाहून घेण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या सूचनेवर सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस तुषारला ठाण्यात घेऊन गेले. एपीआय चव्हाण आणि त्यांचे सहकारी सुद्धा ठाण्यात पोहोचले. घटनेची माहिती होताच तुषारचे मित्रही ठाण्यात पोहोचले. यामुळे ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तुषार मित्रांशी बोलत होता. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तो गायब झाला. तुषार गायब झाल्याचे माहिती होताच ठाण्यात खळबळ उडाली. तो गायब होईल याची पोलिसांना कल्पना नव्हती. त्यामुळे पोलिसांची चांगलीच फजिती झाली. पोलिसांवर दबाव वाढल्याने सायंकाळी तुषार पोलिसांच्या हाती लागला. सीताबर्डी पोलिसांनी तुषारच्या विरुद्ध पोलिसांना मारहाण व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. मागील चार दिवसात पोलिसांना मारहाण करण्याची ही तिसरी घटना आहे. सोमवारी रात्री कळमना पोलीस ठाण्याचे एपीआय अरविंद पवार यांच्यावर रमण असोफा आणि त्याचा भाऊ रजन असोफा याने हल्ला केला होता. डिप्टी सिग्नल निवासी असोफा बंधू त्यांचे तिसरे बंधू ऋषभला चोरीच्या संशयात ठाण्यात आणले असल्याने दुखावले होते. ऋषभचा शेजारी राजकुमार कुंगवानी यांनी आपल्या तक्रारीमध्ये ऋषभवर चोरीचा संशय घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी ऋषभला ठाण्यात आणले होते.(प्रतिनिधी) ...तर पोलिसांनी काय करावे? ४सकाळी ६ ते १० या वेळात झांशी राणी चौकात वाहतूक पोलिसांची विशेषत्वाने नेमणूक करून आॅटो व अवैध प्रवासी वाहतूक हटविली जाते. पोलिसांच्या या कारवाईला मदत करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. परंतु पोलिसांच्या कारवाईला सहकार्य करण्याऐवजी काही लोक त्यात खोट काढू लागतात. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पदभार स्वीकारताच शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी एका विशेष चमूच्या माध्यमातून आढावा घेत सुधारण्यासाठी पाऊल उचलले आहे. या अंतर्गत झांशी राणी चौकात सकाळी ६ वाजेपासून पोलीस तैनात केले जात आहे. तेव्हा नागरिकांकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अगोदरच वातावरण तणावपूर्ण आहे.