शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: September 16, 2016 03:17 IST

चौकात पार्क केलेली कार हटविण्यास सांगितल्यामुळे एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

आरोपी ठाण्यातून गायब : चार दिवसांतील तिसरी घटना नागपूर : चौकात पार्क केलेली कार हटविण्यास सांगितल्यामुळे एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी सकाळी झांशी राणी चौकात घडली. गुन्हा दाखल करण्याची माहिती होताच आरोपी युवक सीताबर्डी पोलीस ठाण्यातून गायब झाला. यामुळे पोलिसांत खळबळ उडाली. तुषार वर्मा असे आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार तुषारने सकाळी ६.३५ वाजता झांशी राणी चौकातील पेट्रोल पंपाच्या ‘कॉर्नर’वर आपली कार पार्क केली होती. झांशी राणी चौकात सकाळच्या वेळी आॅटोचालक आणि अवैध प्रवासी वाहनांची मोठी गर्दी होत असते. यासंबंधात तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. घटनेच्या वेळी एपीआय अमोल चव्हाण सहकाऱ्यांसह चौकातील वाहनांना बाजूला करीत होते. शिपाई ओंकार आणि नीलेशने तुषारला सुद्धा त्याचे वाहन (कार) हटविण्यास सांगितले. परंतु तुषारने नकार देत तो पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. पोलीस कर्मचारी त्याचे चालान करून लागले असता तो असभ्य वागणुकीवर उतरला. दरम्यान अमोल नावाचा शिपाई या घटनेची मोबाईल रेकॉर्डिंग करीत होता. ते पाहून तुषारला आणखी राग आला. तो मोबाईल हिसकवण्याच्या प्रयत्नात अमोलला धक्का-बुक्की करू लागला. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना पाहून घेण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या सूचनेवर सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस तुषारला ठाण्यात घेऊन गेले. एपीआय चव्हाण आणि त्यांचे सहकारी सुद्धा ठाण्यात पोहोचले. घटनेची माहिती होताच तुषारचे मित्रही ठाण्यात पोहोचले. यामुळे ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तुषार मित्रांशी बोलत होता. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तो गायब झाला. तुषार गायब झाल्याचे माहिती होताच ठाण्यात खळबळ उडाली. तो गायब होईल याची पोलिसांना कल्पना नव्हती. त्यामुळे पोलिसांची चांगलीच फजिती झाली. पोलिसांवर दबाव वाढल्याने सायंकाळी तुषार पोलिसांच्या हाती लागला. सीताबर्डी पोलिसांनी तुषारच्या विरुद्ध पोलिसांना मारहाण व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. मागील चार दिवसात पोलिसांना मारहाण करण्याची ही तिसरी घटना आहे. सोमवारी रात्री कळमना पोलीस ठाण्याचे एपीआय अरविंद पवार यांच्यावर रमण असोफा आणि त्याचा भाऊ रजन असोफा याने हल्ला केला होता. डिप्टी सिग्नल निवासी असोफा बंधू त्यांचे तिसरे बंधू ऋषभला चोरीच्या संशयात ठाण्यात आणले असल्याने दुखावले होते. ऋषभचा शेजारी राजकुमार कुंगवानी यांनी आपल्या तक्रारीमध्ये ऋषभवर चोरीचा संशय घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी ऋषभला ठाण्यात आणले होते.(प्रतिनिधी) ...तर पोलिसांनी काय करावे? ४सकाळी ६ ते १० या वेळात झांशी राणी चौकात वाहतूक पोलिसांची विशेषत्वाने नेमणूक करून आॅटो व अवैध प्रवासी वाहतूक हटविली जाते. पोलिसांच्या या कारवाईला मदत करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. परंतु पोलिसांच्या कारवाईला सहकार्य करण्याऐवजी काही लोक त्यात खोट काढू लागतात. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पदभार स्वीकारताच शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी एका विशेष चमूच्या माध्यमातून आढावा घेत सुधारण्यासाठी पाऊल उचलले आहे. या अंतर्गत झांशी राणी चौकात सकाळी ६ वाजेपासून पोलीस तैनात केले जात आहे. तेव्हा नागरिकांकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अगोदरच वातावरण तणावपूर्ण आहे.