शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

पोलिसांवरून उडाला खबऱ्यांचा विश्वास

By admin | Updated: September 15, 2016 02:42 IST

पोलीस विभागात खबऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळेच गुन्हे जगतात होत असलेल्या घडामोडींची पोलिसांना माहिती होते.

आपसी प्रतिस्पर्धा : वापर होत असल्याने बसले शांत जगदीश जोशी नागपूरपोलीस विभागात खबऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळेच गुन्हे जगतात होत असलेल्या घडामोडींची पोलिसांना माहिती होते. त्यांच्या माहितीच्या आधारावर पोलीस मोठमोठ्या प्रकरणांचा उलगडा करतात. तसेच अनेक गुन्हेगारांचे ‘प्लॅन’ फेल पाडले जातात. परंतु मागील काही दिवसांपासून पोलिसांवरून खबऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. खबऱ्यांच्या विरोधातील कारवाई, खून आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील स्पर्धा याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. पोलिसांचे बहुतांश खबरे हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेच असतात. गुन्हेगारी सोडल्यानंतर पोलीस अशा लोकांचा वापर करीत असतात. गुन्हेगारी लोकांशी असलेले संबंध, संपर्क आणि अनुभवामुळे त्यांना गुन्हेगारी जगताची माहिती मिळत असते. याच माहितीसाठी पोलीसही त्यांना योग्य परतावा देत असते. सण-उत्सवादरम्यान खबऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांच्या आवश्यकतेकडेही पोलिसांना लक्ष द्यावे लागते. त्यामुळे अनेकदा छोटा-मोठा मटका किंवा जुगार अड्डा चालवण्याची खबऱ्यांना पोलिसांची मूक सहमती असते. त्यामुळेच खबरे आपल्या जीवावर उदार होऊन गुन्हेगारी जगताची माहिती मिळवित असतात. परंतु मागील काही दिवसांपासून खबऱ्यांचा अभाव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील स्पर्धेमुळे परिस्थिती खराब झाली आहे. पोलीस ठाण्यातील डीबी (डिटेक्शन) ची वेगवेगळी चमू असते. तपासात यश मिळविण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा असते. अशा वेळी एखाद्या खबऱ्याने एका चमूला माहिती दिली तर दुसरी चमू नाराज होते. यातूनच खबऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते. एकीकडे पोलीस कारवाई होत आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारांकडूनही त्यांना धोका आहे. त्यामुळे खबरे मागील काही दिवसांपासून शांत बसले आहेत.म्हणून माहिती मिळाली नाही नागपूर : गेल्या ९ सप्टेंबर रोजी खंडणी वसुलीवरून सक्करदरा येथील बुधवार बाजारात कुख्यात गुन्हेगार आशिष राऊत मारला गेला. तो दीड महिन्यापूर्वीच तुरुंगातून सुटला. तेव्हापासून तो या परिसरात दहशत पसरवत होता. बुधवार बाजारात पोलिसांची नेहमी गस्त असते. परंतु खबऱ्यांचे नेटवर्क नसल्याने पोलिसांना दीड महिन्यांपासून सुरूअसलेल्या या प्रकरणाची माहितीच मिळाली नाही.