शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरून उडाला खबऱ्यांचा विश्वास

By admin | Updated: September 15, 2016 02:42 IST

पोलीस विभागात खबऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळेच गुन्हे जगतात होत असलेल्या घडामोडींची पोलिसांना माहिती होते.

आपसी प्रतिस्पर्धा : वापर होत असल्याने बसले शांत जगदीश जोशी नागपूरपोलीस विभागात खबऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळेच गुन्हे जगतात होत असलेल्या घडामोडींची पोलिसांना माहिती होते. त्यांच्या माहितीच्या आधारावर पोलीस मोठमोठ्या प्रकरणांचा उलगडा करतात. तसेच अनेक गुन्हेगारांचे ‘प्लॅन’ फेल पाडले जातात. परंतु मागील काही दिवसांपासून पोलिसांवरून खबऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. खबऱ्यांच्या विरोधातील कारवाई, खून आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील स्पर्धा याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. पोलिसांचे बहुतांश खबरे हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेच असतात. गुन्हेगारी सोडल्यानंतर पोलीस अशा लोकांचा वापर करीत असतात. गुन्हेगारी लोकांशी असलेले संबंध, संपर्क आणि अनुभवामुळे त्यांना गुन्हेगारी जगताची माहिती मिळत असते. याच माहितीसाठी पोलीसही त्यांना योग्य परतावा देत असते. सण-उत्सवादरम्यान खबऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांच्या आवश्यकतेकडेही पोलिसांना लक्ष द्यावे लागते. त्यामुळे अनेकदा छोटा-मोठा मटका किंवा जुगार अड्डा चालवण्याची खबऱ्यांना पोलिसांची मूक सहमती असते. त्यामुळेच खबरे आपल्या जीवावर उदार होऊन गुन्हेगारी जगताची माहिती मिळवित असतात. परंतु मागील काही दिवसांपासून खबऱ्यांचा अभाव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील स्पर्धेमुळे परिस्थिती खराब झाली आहे. पोलीस ठाण्यातील डीबी (डिटेक्शन) ची वेगवेगळी चमू असते. तपासात यश मिळविण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा असते. अशा वेळी एखाद्या खबऱ्याने एका चमूला माहिती दिली तर दुसरी चमू नाराज होते. यातूनच खबऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते. एकीकडे पोलीस कारवाई होत आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारांकडूनही त्यांना धोका आहे. त्यामुळे खबरे मागील काही दिवसांपासून शांत बसले आहेत.म्हणून माहिती मिळाली नाही नागपूर : गेल्या ९ सप्टेंबर रोजी खंडणी वसुलीवरून सक्करदरा येथील बुधवार बाजारात कुख्यात गुन्हेगार आशिष राऊत मारला गेला. तो दीड महिन्यापूर्वीच तुरुंगातून सुटला. तेव्हापासून तो या परिसरात दहशत पसरवत होता. बुधवार बाजारात पोलिसांची नेहमी गस्त असते. परंतु खबऱ्यांचे नेटवर्क नसल्याने पोलिसांना दीड महिन्यांपासून सुरूअसलेल्या या प्रकरणाची माहितीच मिळाली नाही.