शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

किसान अधिकार अभियानाचे ‘थाळी वाजवा’

By admin | Updated: December 20, 2014 02:31 IST

आश्वासन देऊन पाच दिवस होऊनही किसान अधिकारी अभियानाच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी आमंत्रित न केल्यामुळे किसान अधिकार ...

नागपूर : आश्वासन देऊन पाच दिवस होऊनही किसान अधिकारी अभियानाच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी आमंत्रित न केल्यामुळे किसान अधिकार अभियानाचा मोर्चा आज पुन्हा मॉरिस कॉलेज टी पॉईंटवर धडकला. दिवसभर मोर्चात सहभागी आंदोलनकर्त्यांनी थाळी वाजवा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.किसान अधिकार अभियानाच्या वतीने पाच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सेवाग्राम ते नागपूर असा पायी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी २५ हजार आर्थिक मदत देऊन चार हेक्टरपर्यंत मदत करावी, कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, दुष्काळाच्या स्थितीतील शेतकऱ्यांना शेतीतील पिकांच्या पूर्व मशागतीसाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे व उर्वरित कामासाठी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत मजुरीचा अंतर्भाव करून शेतकऱ्यांना मदत करावी, दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे मागील १० वर्षाचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, वर्धा, बुलढाणा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी काढून देण्यास सहकार्य करावे आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या होत्या. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोर्चास्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिष्टमंडळाला चर्चेस बोलविण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला होता. आज पुन्हा किसान अधिकार अभियानाचा मोर्चा मॉरिस कॉलेजवर पोहोचला. मोर्चेकऱ्यांनी हातात ताट, वाटी घेऊन दिवसभर थाळी वाजवा आंदोलन केले.