राम महाजन, सचिव, महात्मा फुले सब्जी व फ्रूट अडतिया असोसिएशन.
स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्याने अन्य जिल्ह्यातून वा राज्यातून भाज्या ऑर्डरने मागवाव्या लागत आहेत. अशी स्थिती जास्त दिवस राहणार नाही. ऑक्टोबरनंतरच भाज्या स्वस्त होतील.
नंदकिशोर गौर, अध्यक्ष, कळमना बाजार युवा सब्जी असोसिएशन.
सर्वच भाज्या ४० ते ५० रुपये किलो असल्याने स्वयंपाकघरात कडधान्याचा उपयोग करीत आहे. कोथिंबीर व मेथी १०० रुपयांवर पोहोचली आहे. ठोक बाजारातही भाज्या महागच असल्याने अर्धा वा एक किलोसाठी जाणे परवडत नाही.
साधना मोरघडे, गृहिणी.
यंदा पावसाळ्याच्या अखेरीस भाज्यांचे भाव आकाशाला पोहोचले आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात बजेट वाढले आहे. भाज्या दररोज भाव पाहून खरेदी करतो. अर्धा किलो भाजीसाठी २५ रुपये द्यावे लागतात. भाज्या महाग आहेत.
प्रतिभा देवघरे, गृहिणी.